शहरं
Join us  
Trending Stories
1
कपडे फाडले; लाथा मारल्या, धमकी दिली, जगतापांनी आयोगाला दिलेल्या तक्रार अर्जात धक्कादायक बाबी समोर
2
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
3
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
4
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
5
लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  
6
४ ग्रह, ४ राजयोग: १० राशींवर लक्ष्मी प्रसन्न, भरघोस भरभराट; बक्कळ पैसा, बंपर लाभ, वरदान काळ!
7
धक्कादायक! गाण्याचा आवाज कमी करायला सांगितल्याने पती चिडला, पत्नीवर फेकले टॉयलेट क्लीनर
8
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बनवले तरुणींचे अश्लील व्हिडीओ; ७ आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
9
ऑपरेशन सिंदूर: सैन्याने IPS अधिकाऱ्याचा सन्मान का केला? पाकिस्तानचा रहीम यार खान एअरबेस जवळच होता...
10
बुलेट ट्रेनचं देशातील पहिलं रेल्वे स्टेशन बांधून तयार, या दोन स्थानकांदरम्यान धावणार पहिली ट्रेन
11
Somavati Amavasya 2025: पितरांच्या फोटोची जागा तर अयोग्य नाही? सोमवती अमवास्येला करा बदल!
12
कोसळल्या धारा...! केरळमध्ये मान्सून दाखल झाला; महाराष्ट्रात कधी पोहोचणार...
13
Nuclear Weapon : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं नुकसान झालं? पाकचं परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय... 
14
"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर
15
Corona Virus : मास्क लावायला हवा का, बूस्टर डोसची गरज आहे का, कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट किती संसर्गजन्य?
16
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
17
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी
18
अरे देवा! तरुणाला चष्मा न लावणं पडलं महागात; ५०० रुपयांऐवजी गमावले तब्बल ९० हजार
19
ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे बेल्जियमच्या भावी राजकुमारीचे शिक्षण धोक्यात; कोण आहे एलिझाबेथ?
20
Hit And Run : विक्रोळीत भरधाव वेगाने येणारा टँकर दुचाकीवर धडकला; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू, चालक फरार

विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2015 02:14 IST

प्रश्नपत्रिका फुटल्याने अखिल भारतीय मेडिकल प्रवेशपूर्व चाचणी परीक्षा (२०१५-१६) पुन्हा घेणे हा ‘अंतिम उपाय’ आहे,

पेपरफुटीवर याचिका : मेडिकल प्रवेशपूर्व परीक्षेचे भवितव्य अनिश्चितनवी दिल्ली : प्रश्नपत्रिका फुटल्याने अखिल भारतीय मेडिकल प्रवेशपूर्व चाचणी परीक्षा (२०१५-१६) पुन्हा घेणे हा ‘अंतिम उपाय’ आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. मात्र आम्ही खुल्या मनाने याचा निर्णय करू, अशी पुस्तीही खंडपीठाने जोडली आहे. त्यामुळे ही परीक्षा पुन्हा होणार की काय, या चिंतेने सहा लाख विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. ३ मे रोजी आॅल इंडिया प्री मेडिकल-प्री डेंटल एन्ट्रन्स टेस्ट (एआयपीएमटी) घेण्यात आली होती. या परीक्षेतील फुटलेले पेपर काही डॉक्टरांना मिळाल्याचे तसेच विविध राज्यांमधून ७५ मोबाइल फोनवरून १२३ प्रश्नांची आन्सर की प्रसारित झाल्याचे उघड झाले होते. देशभरातील अनेक विद्यार्थ्यांना याची उत्तरे मिळाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केल्यानंतर ही परीक्षाच रद्द करावी, अशी याचिका दाखल करण्यात आली. परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे. मोठ्या प्रमाणावरील या गैरप्रकारामुळे लाभान्वित झालेल्यांचा शोध घेण्यात यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आता हरियाणा पोलिसांना दिले आहेत.ही एआयपीएमटी परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी काही पालकांनी केलेली आहे. पुन्हा परीक्षा घेणे हा अंतिम उपाय आहे. तरीही त्याचा आम्ही खुल्या मनाने विचार करीत आहोत, असे न्या. ए. के. सिकरी आणि न्या. उदय यु. लळित यांच्या अवकाशकालीन पीठाने म्हटले आहे. म्हणजेच तूर्तास एआयपीएमटी परीक्षा पुन्हा घेतली जाण्याची शक्यता न्यायालयाने फेटाळलेली नाही. या प्रकरणी हरियाणा पोलिसांना सहकार्य करण्याचे निर्देशही न्यायालयाने राज्यांच्या सक्तवसुली संचालनालयांना आणि मोबाइल कंपन्यांना दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ मे रोजी होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)‘सहा लाख लोकांना पुन्हा परीक्षेला बसण्यासाठी का सांगण्यात यावे? या गैरप्रकाराचा लाभ झालेल्यांची संख्या आम्ही शोधून काढलीच पाहिजे,’ असे मतप्रदर्शनही न्यायालयाने सुनावणीदरम्यान केले.च्या परीक्षेतील फुटलेले पेपर काही डॉक्टरांना मिळाल्याचे तसेच विविध राज्यांमधून ७५ मोबाइल फोनवरून १२३ प्रश्नांची आन्सर की प्रसारित झाल्याचे उघड झाले होते. च्देशभरातील अनेक विद्यार्थ्यांना याची उत्तरे मिळाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केल्यानंतर ही परीक्षाच रद्द करावी, अशी याचिका दाखल करण्यात आली.