शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

एफटीआयआयचे विद्यार्थी गुन्हेगार नाहीत - राहुल गांधी

By admin | Updated: August 19, 2015 13:45 IST

एफटीआयआयचे विद्यार्थी गुन्हेगार नसल्याचे सांगत मौन, निलंबन व अटक हाच मोदींच्या 'अच्छे दिन'चा मंत्र आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - पोलिसांनी मध्यरात्री एफटीआयआयच्या कॅम्पसमध्ये शिरून विद्यार्थ्यांना अटक केल्याप्रकरणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ' एफटीआयआयचे विद्यार्थी गुन्हेगार नसल्याचे सांगत गप्प करा, निलंबित करा व अटक करा हाच मोदींच्या  'अच्छे दिन'चा मंत्र आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. एफटीआयआयचे  संचालक प्रशांत पाठरांबे यांनी विद्यार्थ्यांविरोधात दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी काल रात्री सव्वाच्या सुमारास कॅम्पसमध्ये प्रवेश करून ५ विद्यार्थ्यांना अटक करत त्यांना डेक्कन जिमखाना पोलिस स्थानकात नेले. पोलिसांच्या या कारवाईचा सर्वत्र निषेध होत असून हा वाद आणखीनच चिघळला आहे.
त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनीही या घटनेबद्दल नाराजी नोंदवली आहे. ' मोदीजी, ( एफटीआयआयचे) हे विद्यार्थी गुन्हेगार नाहीत. गप्प करा,निलंबित करा व अटक करा हाच मोदींच्या 'अच्छे दिन'चा मंत्र आहे' असे ट्विट करत राहुल यांनी सरकारवर टीका केली आहे. यापूर्वीही राहुल यांनी एफटीआयआच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला होता. गेल्या महिन्यात आंदोलनाच्या ५० व्या दिवशी राहुल यांनी पुण्यात विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी  शिक्षण संस्था तसेच अन्य संस्थांमध्ये भाजपा हस्तक्षेप करत असून विद्यार्थ्यांवर संघाचे विचार लादण्याचा प्रयत्न सुरू आहेत अशी टीका करत त्यांनी एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला. 
गजेंद्र चौहान यांची निवड गुणवत्तेवर झाला नसल्याचा आरोप करत चौहान यांच्यासह नियामक मंडळाच्या सदस्यांची नियुक्ती रद्द करावी, या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनीही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत गजेंद्र चौहान यांना पद सोडण्याचा सल्ला दिला. मात्र चौहान हे पायउतार होण्यास तयार नसून दुसरीकडे विद्यार्थीही त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत.