शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

एफटीआयआयचे विद्यार्थी गुन्हेगार नाहीत - राहुल गांधी

By admin | Updated: August 19, 2015 13:45 IST

एफटीआयआयचे विद्यार्थी गुन्हेगार नसल्याचे सांगत मौन, निलंबन व अटक हाच मोदींच्या 'अच्छे दिन'चा मंत्र आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - पोलिसांनी मध्यरात्री एफटीआयआयच्या कॅम्पसमध्ये शिरून विद्यार्थ्यांना अटक केल्याप्रकरणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ' एफटीआयआयचे विद्यार्थी गुन्हेगार नसल्याचे सांगत गप्प करा, निलंबित करा व अटक करा हाच मोदींच्या  'अच्छे दिन'चा मंत्र आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. एफटीआयआयचे  संचालक प्रशांत पाठरांबे यांनी विद्यार्थ्यांविरोधात दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी काल रात्री सव्वाच्या सुमारास कॅम्पसमध्ये प्रवेश करून ५ विद्यार्थ्यांना अटक करत त्यांना डेक्कन जिमखाना पोलिस स्थानकात नेले. पोलिसांच्या या कारवाईचा सर्वत्र निषेध होत असून हा वाद आणखीनच चिघळला आहे.
त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनीही या घटनेबद्दल नाराजी नोंदवली आहे. ' मोदीजी, ( एफटीआयआयचे) हे विद्यार्थी गुन्हेगार नाहीत. गप्प करा,निलंबित करा व अटक करा हाच मोदींच्या 'अच्छे दिन'चा मंत्र आहे' असे ट्विट करत राहुल यांनी सरकारवर टीका केली आहे. यापूर्वीही राहुल यांनी एफटीआयआच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला होता. गेल्या महिन्यात आंदोलनाच्या ५० व्या दिवशी राहुल यांनी पुण्यात विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी  शिक्षण संस्था तसेच अन्य संस्थांमध्ये भाजपा हस्तक्षेप करत असून विद्यार्थ्यांवर संघाचे विचार लादण्याचा प्रयत्न सुरू आहेत अशी टीका करत त्यांनी एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला. 
गजेंद्र चौहान यांची निवड गुणवत्तेवर झाला नसल्याचा आरोप करत चौहान यांच्यासह नियामक मंडळाच्या सदस्यांची नियुक्ती रद्द करावी, या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनीही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत गजेंद्र चौहान यांना पद सोडण्याचा सल्ला दिला. मात्र चौहान हे पायउतार होण्यास तयार नसून दुसरीकडे विद्यार्थीही त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत.