शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

विद्यार्थ्यांसाठीही नोकरीआधी ‘एक्झिट’ परीक्षा?

By admin | Updated: January 9, 2017 04:05 IST

‘एमबीबीएस’ विद्यार्थ्यांना पदवीनंतर डॉक्टरी व्यवसायाची प्रत्यक्ष सनद देण्याआधी त्यांची ‘एक्झिट’ परीक्षा घेण्याच्या प्रस्तावानंतर आता तसाच विचार

नवी दिल्ली : ‘एमबीबीएस’ विद्यार्थ्यांना पदवीनंतर डॉक्टरी व्यवसायाची प्रत्यक्ष सनद देण्याआधी त्यांची ‘एक्झिट’ परीक्षा घेण्याच्या प्रस्तावानंतर आता तसाच विचार अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या बाबतीत अ.भा. तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) करीत असून परिषदेच्या येत्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत यावर विचार व्हायचा आहे.परिषदेने तसा निर्णय घेऊन नियम केल्यास सरकारी व खासगी अशा दोन्ही प्रकारच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या बाजारात पदार्पण करण्यासाठी केवळ पदवी असणे पुरेसे होणार नाही. त्यांना पदवीच्या शेवटच्या वर्षात, त्यांचे ज्ञान नोकरीच्या दृष्टीने कितपत उपयुक्त आहे याचे मूल्यमापन करणारी, एक स्वतंत्र परीक्षाही द्यावी लागेल. ही परीक्षा सर्वांना सक्तीची असेल व त्या परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या कामगिरीची माहिती त्यांना जेथे नोकरी मिळू शकते अशा संभाव्य मालकांना उपलब्ध करून दिली जाईल.देशात अभियांत्रिकी पदवी व पदविका अभ्यासक्रम शिकविणाऱ्या सुमारे तीन हजार संस्था आहेत व त्यातून दरवर्षी सात लाख पदवीधर इंजिनीयर उत्तीर्ण होऊन बाहेर पडतात. परंतु त्यापैकी जेमतेम २० ते ३० टक्के विद्यार्थ्यांनाच चांगली नोकरी मिळू शकते. या विद्यार्थ्यांकडे पुस्तकी ज्ञान असले तरी प्रत्यक्ष उद्योग-धंद्यांना आवश्यक असलेले व्यावहारिक कौशल्य, कल आणि काही तरी वेगळा विचार करण्याची प्रवृत्ती नसल्याने पदवी असूनही असे विद्यार्थी शिक्षण असूनही नोकरीक्षम ठरत नाहीत.केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाच्या सूत्रांनुसार देशातील अभियांत्रिकी शिक्षणाचा घसरत चाललेला दर्जा हेही याचे कारण आहे. अशी परीक्षा घेतल्याने विद्यार्थ्यांनाही नोकरीच्या बाजारातील आपले स्थान कळेल व कोणत्या शिक्षण संस्था व्यवहार्य शिक्षण देण्यात कमी पडतात हेही समोर येईल.याच पार्श्वभूमीवर सरकारने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने ‘ग्रॅज्युएट अ‍ॅप्टिट्युट टेस्ट इन इंजिनियरिंग’ (गेट) ही परीक्षा अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सक्तीची करण्याची शिफारस केली होती. सध्या ही परीक्षा प्रामुख्याने देशातील आयआयटींमध्ये एम. टेकच्या प्रवेशांसाठी वापरली जाते. (लोकमत न्यूज नेटवर्क)