शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

संसद बनतेय संघर्षाचा आखाडा

By admin | Updated: August 15, 2015 02:24 IST

लोकशाहीचा वारसा आपल्याला मिळाला असला तरी तो जपण्यासाठीही सदैव जागरूक राहण्याची गरज आहे. आज लोकशाहीच्या संस्था तणावाखाली आहेत. संसद हे चर्चा

नवी दिल्ली : लोकशाहीचा वारसा आपल्याला मिळाला असला तरी तो जपण्यासाठीही सदैव जागरूक राहण्याची गरज आहे. आज लोकशाहीच्या संस्था तणावाखाली आहेत. संसद हे चर्चा आणि मत-मतांतराचे व्यासपीठ न राहता संघर्षाचा आखाडा झाला आहे, अशी चिंता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी व्यक्त केली. राजकीय पक्ष आणि जनतेने या गंभीर मुद्द्यावर चिंतन करून उपाययोजना करावी, असे आवाहनही त्यांनी केले. सुधारणात्मक उपाययोजना आतून यायला हव्यात, यावरही त्यांनी भर दिला.स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात संसदेचे पावसाळी अधिवेशन सरकार आणि विरोधकांच्या संघर्षात वाया गेल्याची खंत राष्ट्रपतींनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली. लोकशाही ही भारतीय राज्यघटनेने देशाला दिलेली अमूल्य देणगी आहे. गेल्या ६८ वर्षांत आपली लोकशाही एक जिवंत लोकशाही म्हणून विकसित झाली आहे. तिची पाळेमुळे भक्कम आहेत, पण पालवी मरगळू लागली आहे. त्यामुळे आता लोकशाहीच्या नवीनीकरणाची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. १९४७ मध्ये भारतवासीयांचे स्वप्न साकारणाऱ्या थोरांकडे आपण आज आदराने बघतो आहोत. आपण आता पावले उचलली नाहीत तर सात दशकानंतर आपल्या भावी पिढ्या उत्तराधिकारी आपल्याकडे सन्मान आणि आदराने बघतील काय, या प्रश्नाचे उत्तर सोपे नसले तरी, प्रश्न विचारायलाच हवा, असेही प्रणव मुखर्जी म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)दहशतवाद हाणून पाडू...आमच्या शेजारी देशांनी भारतविरोधी कारवायांसाठी त्यांच्या भूमीचा वापर करू देऊ नये. दहशतवाद खपवून न घेण्याचे भारताचे धोरण असून, अस्थैर्य आणि अशांतता निर्माण करण्यासाठी आमच्या सीमेत होणारी घुसखोरी समर्थपणे हाणून पाडली जाईल, असा स्पष्ट इशारा राष्ट्रपती मुखर्जी यांनी पाकिस्तानचा नामोल्लेख टाळत दिला.