शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

कठोर निवडणूक कायद्यासाठी आयोगाची जोरदार बॅटिंग

By admin | Updated: March 30, 2015 23:07 IST

निवडणुकीत राजकीय निधीच्या नावावर काळ्या पैशाच्या वापराला अटकाव घालण्यासाठी कठोर कायदा आणण्याच्या बाजूने निवडणूक आयोगाने जोरदार बॅटिंग केली.

नवी दिल्ली : निवडणुकीत राजकीय निधीच्या नावावर काळ्या पैशाच्या वापराला अटकाव घालण्यासाठी कठोर कायदा आणण्याच्या बाजूने निवडणूक आयोगाने जोरदार बॅटिंग केली. निवडणूक सुधारणा घडवून आणण्यासाठी सरकारी निधीचा वापर अशक्य असल्याचे आयोगाने याआधीच स्पष्ट केले आहे. सोमवारी दिवसभराच्या चर्चासत्रात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला.मुख्य निवडणूक आयुक्त एच. एस. ब्रह्मा यांनी लोकशाही पद्धतीत निवडणुकीत काळ्या पैशाचा मुक्तपणे वापर होत असल्यास त्यामुळे निर्माण होणारे असंतुुलन रोखण्यासाठी कठोर कायद्याची गरज अधोरेखित केली.निवडणूक सुधारणांबाबत राजकीय, वित्त आणि विधि आयोगाच्या शिफारशींवर चर्चेसाठी आयोजित एक दिवसाच्या ‘सल्लामसलत’ बैठकीचे उद्घाटन करताना योग्य उत्तरदायित्वाची बाब पाहता देशाला राजकीय निधीबाबत कठोर कायदा आणण्याची गरज असल्याचे ब्रह्मा यांनी स्पष्ट केले. काळा पैसा, धनशक्ती (मनी पॉवर) आणि त्यापाठोपाठ मनगटी ताकदीच्या (मसल पॉवर) जोरावर निवडणूक प्रक्रियेत असंतुलन निर्माण केले जात असेल, तर ते निकोप लोकशाहीसाठी चांगले नाही. काळा पैसा लोकशाहीवर अतिक्रमण करीत असेल, तर त्यामुळे उमेदवारांना समान संधी दिली जात नाही. पैशाच्या बळावर मते मिळतातच असे नाही; मात्र इतरांच्या तुलनेत खर्च जास्त करणाऱ्याचा हात वरच राहतो, असे ते म्हणाले.आंध्र प्रदेशात विधानसभा निवडणुकीत उमेदवारांनी १५ कोटी रुपयांपर्यंत खर्च केल्याचे वृत्त आहे. त्यांच्याकडे पैसा कुठून येतो आणि कुठे जातो? असा आश्चर्यमिश्रित सवालही त्यांनी केला. धनशक्तीच्या मुद्यावर राजकीय पक्षांनी दिलेला प्रतिसाद पाहता पैशाच्या वारेमाप वापराला आळा घातला जावा यावर राजकीय पक्षांनी सहमती दर्शविली आहे.