शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

कठोर निवडणूक कायद्यासाठी आयोगाची जोरदार बॅटिंग

By admin | Updated: March 30, 2015 23:07 IST

निवडणुकीत राजकीय निधीच्या नावावर काळ्या पैशाच्या वापराला अटकाव घालण्यासाठी कठोर कायदा आणण्याच्या बाजूने निवडणूक आयोगाने जोरदार बॅटिंग केली.

नवी दिल्ली : निवडणुकीत राजकीय निधीच्या नावावर काळ्या पैशाच्या वापराला अटकाव घालण्यासाठी कठोर कायदा आणण्याच्या बाजूने निवडणूक आयोगाने जोरदार बॅटिंग केली. निवडणूक सुधारणा घडवून आणण्यासाठी सरकारी निधीचा वापर अशक्य असल्याचे आयोगाने याआधीच स्पष्ट केले आहे. सोमवारी दिवसभराच्या चर्चासत्रात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला.मुख्य निवडणूक आयुक्त एच. एस. ब्रह्मा यांनी लोकशाही पद्धतीत निवडणुकीत काळ्या पैशाचा मुक्तपणे वापर होत असल्यास त्यामुळे निर्माण होणारे असंतुुलन रोखण्यासाठी कठोर कायद्याची गरज अधोरेखित केली.निवडणूक सुधारणांबाबत राजकीय, वित्त आणि विधि आयोगाच्या शिफारशींवर चर्चेसाठी आयोजित एक दिवसाच्या ‘सल्लामसलत’ बैठकीचे उद्घाटन करताना योग्य उत्तरदायित्वाची बाब पाहता देशाला राजकीय निधीबाबत कठोर कायदा आणण्याची गरज असल्याचे ब्रह्मा यांनी स्पष्ट केले. काळा पैसा, धनशक्ती (मनी पॉवर) आणि त्यापाठोपाठ मनगटी ताकदीच्या (मसल पॉवर) जोरावर निवडणूक प्रक्रियेत असंतुलन निर्माण केले जात असेल, तर ते निकोप लोकशाहीसाठी चांगले नाही. काळा पैसा लोकशाहीवर अतिक्रमण करीत असेल, तर त्यामुळे उमेदवारांना समान संधी दिली जात नाही. पैशाच्या बळावर मते मिळतातच असे नाही; मात्र इतरांच्या तुलनेत खर्च जास्त करणाऱ्याचा हात वरच राहतो, असे ते म्हणाले.आंध्र प्रदेशात विधानसभा निवडणुकीत उमेदवारांनी १५ कोटी रुपयांपर्यंत खर्च केल्याचे वृत्त आहे. त्यांच्याकडे पैसा कुठून येतो आणि कुठे जातो? असा आश्चर्यमिश्रित सवालही त्यांनी केला. धनशक्तीच्या मुद्यावर राजकीय पक्षांनी दिलेला प्रतिसाद पाहता पैशाच्या वारेमाप वापराला आळा घातला जावा यावर राजकीय पक्षांनी सहमती दर्शविली आहे.