शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

नोटाबंदीनंतर RBIच्या प्रतिमेला तडा, कर्मचा-यांचे उर्जित पटेलांना पत्र

By admin | Updated: January 14, 2017 12:25 IST

नोटाबंदीनंतरच्या घटनाक्रमांमुळे अपमान सहन करावा लागत असल्याचे सांगत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कर्मचा-यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - नोटाबंदीनंतरच्या घटनाक्रमांमुळे अपमान सहन करावा लागत असल्याचे सांगत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कर्मचा-यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आरबीआयच्या कर्मचा-यांनी नोटाबंदीसह अन्य निर्णयांना विरोध करणारे पत्रच गर्व्हनर उर्जित पटेल यांना लिहिले आहे.  सरकारचे निर्णय हे रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता, वैधानिक आणि व्यवहाराच्या कार्यकक्षेत हस्तक्षेप करणारे असल्याचे कर्मचा-यांनी या पत्रात नमूद केले आहे.   
 
अर्थ मंत्रालयाकडून संस्थेच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे आरबीआयच्या कर्मचा-यांनी संताप व्यक्त केला आहे. रिझर्व्ह बँकेच्या कारभारातील अर्थमंत्रालयाचा गरजेपेक्षा अधिक हस्तक्षेप हा कर्मचा-यांसाठी अपमानास्पद असून हा हस्तक्षेप तातडीने थांबवण्यात यावा, असेदेखील या पत्रात म्हटले आहे. शिवाय, रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्तताचे रक्षण करण्याचे पाऊल गव्हर्नर यांनी तातडीने उचलावे, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. 
दरम्यान, यानंतर रिझर्व्ह बँकेतील चलन साठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडून संयुक्त सचिवाची नेमणूक होणार असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर आक्षेप नोंदवत कर्मचा-यांच्या संघटनेने कारभारात हस्तक्षेप होत असल्याचे आरोप करत उर्जित पटेल यांना पत्र पाठवले आहे. 
अनेक दशकांपासून रिझर्व्ह बँकेची कार्यक्षमता आणि स्वतंत्र कारभाराची ओळख त्यांच्या मेहनती कर्मचा-यांमुळे कायम आहे. मात्र संयुक्त सचिव नियुक्तीच्या विषयामुळे यावर परिणाम होत असल्याची खंत कर्मचा-यांनी व्यक्त केली आहे. या पत्रावर ऑल इंडिया रिझर्व्ह बँक कर्मचारी असोसिएशनचे समीर घोष, ऑल इंडिया रिझर्व्ह बँक वर्कर्स फेडरेशनचे सूर्यकांत महाडिक, ऑल इंडिया रिझर्व्ह बँक ऑफिसर्स असोसिएशनचे सी.एम.पॉलसिस आणि आरबीआय ऑफिसर्स असोसिएशनचे आर.एन. यांची स्वाक्षरी आहे. 
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर वाय. व्ही. रेड्डी आणि बिमल जलान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.  दरम्यान, कर्मचा-यांच्या पत्राबाबत आरबीआय गर्व्हनर उर्जित पटेल कशा पद्धतीने आपली भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.