खान्देशसह विदर्भाला वादळाचा तडाखा
By admin | Updated: June 3, 2014 00:59 IST
केळीचे कोट्यवधीचे नुकसान : वीज पडून दोघांचा मृत्यू, वाघाडीत सात गुरे ठार
खान्देशसह विदर्भाला वादळाचा तडाखा
केळीचे कोट्यवधीचे नुकसान : वीज पडून दोघांचा मृत्यू, वाघाडीत सात गुरे ठारधुळे/नंदुरबार : धुळे जिलत वादळी पावसाने सोमवारी दुपारी थैमान मांडले. विशेषत: शिरपूर व शिंदखेडा तालुक्यातील बहुतांश गावांना मोठा तडाखा बसला. वाघाडी येथे वीज कोसळून सात गुरे ठार झाली. दोंडाईचा येथे गारपीट झाली. शहादा व नंदुरबार तालुक्याला वादळ व पावसाने सोमवारी सायंकाळी झोडपले. परिवर्धा येथे वीज पडून दिपक अशोक नरभवर (20) या युवकाचा मृत्यू झाला. शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे गारपीट झाली. तत्पूर्वी वादळाने थैमान माजविले. वर्शी परिसरातही तासाभरापेक्षा अधिक वेळ वादळाने थैमान माजविले. नंदुरबार जिलत दिवसभराच्या अस उकाड्यानंतर सायंकाळी चार वाजेच्या सुमारास अचानक ढग भरून आले. सोसाट्याचा वार्याने वादळाचे रूप धारण केले. त्यामुळे केळी व पपईचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. बुलडाणा जिलच्या शेळगावमध्ये सोमवारी दुपारपासून जिलत वादळी पावसाने अनेक गावांसह शहराला झोडपले. यात चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ येथील सोपानराव रामकृष्ण गावडे (46) या शेतकर्याच्या अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडली.वादळात उडालेल्या टीनपत्र्याने इसम ठार उमरखेड (यवतमाळ) : वादळात उडालेल्या टीनपत्र्याने घरात बसलेला सय्यद उस्मान सय्यद जलाल (48) हे जागीच ठार झाले. ही घटना यवतमाळ जिलतील चातारी येथे सोमवारी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास घडली. एवढेच नव्हे तर वादळाचा प्रचंड तडाखा चातारीसह परिसरातील पाच गावांना बसला. त्यामध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे. सोमवारी सायंकाळी अचानक प्रचंड वादळाला प्रारंभ झाला. अनेकांच्या घरावरील टीनपत्रे उडाले. वादळापासून बचावासाठी अनेकांनी घरांचा आसरा घेतला. सय्यद उस्मान आपल्या घरात वादळापासून बचावासाठी बसून होता. मात्र या वादळात त्यांच्या घरावरील टीनपत्रे उडाली. काही टीनपत्रे घरात कोसळून सय्यद उस्मानच्या डोक्यावर आदळली. त्यात जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. (प्रतिनिधी)