शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

हिंसक गोरक्षकांवर होणार कठोर कारवाई, पंतप्रधान मोदींचा इशारा

By admin | Updated: July 16, 2017 14:54 IST

गोरक्षेच्या नावावर देशात होत असलेल्या हिंसक घटनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा तीव्र संताप व्यक्त केला आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16- गोरक्षेच्या नावावर देशात होत असलेल्या हिंसक घटनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा तीव्र संताप व्यक्त केला आहे. देशात गोरक्षेची भावना आहे. मात्र हिंसक गोरक्षकांवर कठोर कारवाई होणार असल्याचे मोदी यांनी सांगितले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित सर्वपक्षीय बैठकीत मोदींनी हा इशारा दिला आहे. 
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत मोदींनी गोरक्षकांसह विविध मुद्द्यांवर आपले मत स्पष्ट केले. या बैठकीनंतर भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, " मोदींनी हिंसक गोरक्षकांबाबत कठोर भूमिका घेतली आहे, ते म्हणाले की, देशात गोरक्षेबाबत भावना आहे. मात्र गोरक्षेसाठी कोणत्याही प्रकारची हिंसा खपवून घेतली जाणार नाही. हिंसक गोरक्षकांवर कठोर कारवाई करण्यात येईल. राज्य सरकारांनी हिंसक गोरक्षकांवर कारवाई करावी." गेल्या काही काळापासून गोरक्षकांकडून गोमांस बाळगल्याच्या संशयावरून अनेकांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच त्यात अनेकांचा बळीसुद्धा गेला आहे. याआधीही मोदींनी साबरमती आश्रमाच्या शताब्दी महोत्सवात बोलताना गोरक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे मंजूर नाही. हे महात्मा गांधींनाही मान्य नव्हते", असे म्हटले होते. अधिक वाचा
 
(नरभक्षकाप्रमाणे आहेत स्वयंघोषित गोरक्षक : रामदास आठवले )( गोरक्षक मोकाट! गोमांस बाळगल्याच्या संशयावरून अजून एकाची हत्या )(गोरक्षकांची आता काश्मीरमध्येही झुंडशाही )दरम्यान, मोदींनी या बैठकीत देशात जीएसटी यशस्वीरीत्या लागू झाल्याबद्दल सर्व पक्षांचे अभिनंदन केले. तसेच पूर्वोत्तर भारतात आलेल्या पुराबाबत पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. तसेच 9 ऑगस्ट रोजी छोडो भारत आंदोलनाच्या 75व्या वर्धापन दिनी संसदेत चर्चा व्हायला हवी, असा प्रस्तावही मोदींनी ठेवल्याचे अनंत कुमार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.