शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

स्वबळावर लढण्यासाठी पक्षाला मजबूत करा

By admin | Updated: July 3, 2016 00:45 IST

औरंगाबाद : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढायचे असेल तर गट आणि सर्कल पातळीवर पक्ष मजबूत केला पाहिजे,

औरंगाबाद : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढायचे असेल तर गट आणि सर्कल पातळीवर पक्ष मजबूत केला पाहिजे, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शनिवारी येथे जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले.औरंगाबाद शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणूकपूर्व तयारी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार, शहराध्यक्ष नामदेव पवार, आ. सुभाष झांबड, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी आमदार कल्याण काळे, माजी आमदार नितीन पाटील, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष केशवराव औताडे, पक्षाचे निरीक्षक नतीकोद्दीन खतीब, पक्षाचे सरचिटणीस किशोर बोरकर आदींची उपस्थिती होती. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील पक्षाच्या सदस्यांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अनेक सदस्यांनी आगामी निवडणुकीत कोणाबरोबरही आघाडी नको, स्वबळावरच निवडणुका लढवाण्यात, अशी भूमिका मांडली. त्याचा उल्लेख करून खा. चव्हाण म्हणाले की, स्वबळावर लढायचे असेल तर खाली पक्ष मजबूत असला पाहिजे. आम्ही मुंबईहून उमेदवार लादणार नाही, मात्र जिल्हा काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेस एखाद्या उमेदवारासंबंधीची माहिती पडताळून निर्णय घेईल. जात प्रमाणपत्र वैध असणाऱ्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी दिली जाईल. जात प्रमाणपत्र वैध नसेल तर उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. पक्ष़ातर्फे महिनाभरात जिल्हा व प्रदेशस्तरावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी अर्ज स्वीकृती होईल, असे ते म्हणाले. कार्यकर्त्यांची हजेरीयावेळी मेळाव्यात खा. चव्हाण यांनी कोणते जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका सदस्य अनुपस्थित आहेत, याची हजेरी घेतली. अनुपस्थित सदस्यांना पुढची निवडणूक लढवायची नाही, असे दिसत असून, त्यांचा विचार केला जाणार नाही, असा इशारा दिला. पक्षाच्या कार्यक्रमाला सर्वांची हजेरी आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.झांबड यांचा इशारायावेळी आ. सुभाष झांबड यांनी कार्यकर्त्यांच्या बाबतीत परखड मत व्यक्त केले. पक्षाची स्थिती चांगली असल्याचे जे लोक सांगत आहेत ते पक्षाची फसवणूक करीत आहेत. पक्षाची स्थिती खराब नाही मात्र प्रत्यक्षात खूप काम करण्याची गरज आहे. ४सिल्लोड, फुलंब्री वगळता इतर तालुक्यात मोठे काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. आ. सत्तार यांनीही कार्यकर्त्यांनी झटून काम केल्यास निश्चित यश मिळेल, असे स्पष्ट केले. यावेळी खा. चव्हाण यांनी मराठवाड्यात चांगला पाऊस पडू दे, अशी ईश्वराजवळ प्रार्थना केली. त्यांनी सर्वांना शब-ए- कद्र तसेच रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. आ. सत्तार, आ. झांबड तसेच नामदेव पवार यांनीही सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. कौमी एकता हे आपल्या देशाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. शांतता आणि सौहार्दाच्या मार्गानेच देश चालला पाहिजे, असे मत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शनिवारी पक्षातर्फे आयोजित इफ्तार कार्यक्रमात केले.४औरंगाबाद शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे बीड बायपासवरील पटेल लॉन्सवर हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार, आ. सुभाष झांबड, शहराध्यक्ष नामदेव पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी आमदार कल्याण काळे, केशवराव औताडे, सुरेशदादा पाटील, फिरोज पटेल, शब्बीर पटेल, माजी आमदार सुरेश जेथलिया, मिलिंद पाटील आदींसह पक्षाचे कार्यकर्ते आणि मुस्लिम समुदायातील नागरिक उपस्थित होते.