शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

स्वबळावर लढण्यासाठी पक्षाला मजबूत करा

By admin | Updated: July 3, 2016 00:45 IST

औरंगाबाद : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढायचे असेल तर गट आणि सर्कल पातळीवर पक्ष मजबूत केला पाहिजे,

औरंगाबाद : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढायचे असेल तर गट आणि सर्कल पातळीवर पक्ष मजबूत केला पाहिजे, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शनिवारी येथे जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले.औरंगाबाद शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणूकपूर्व तयारी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार, शहराध्यक्ष नामदेव पवार, आ. सुभाष झांबड, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी आमदार कल्याण काळे, माजी आमदार नितीन पाटील, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष केशवराव औताडे, पक्षाचे निरीक्षक नतीकोद्दीन खतीब, पक्षाचे सरचिटणीस किशोर बोरकर आदींची उपस्थिती होती. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील पक्षाच्या सदस्यांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अनेक सदस्यांनी आगामी निवडणुकीत कोणाबरोबरही आघाडी नको, स्वबळावरच निवडणुका लढवाण्यात, अशी भूमिका मांडली. त्याचा उल्लेख करून खा. चव्हाण म्हणाले की, स्वबळावर लढायचे असेल तर खाली पक्ष मजबूत असला पाहिजे. आम्ही मुंबईहून उमेदवार लादणार नाही, मात्र जिल्हा काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेस एखाद्या उमेदवारासंबंधीची माहिती पडताळून निर्णय घेईल. जात प्रमाणपत्र वैध असणाऱ्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी दिली जाईल. जात प्रमाणपत्र वैध नसेल तर उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. पक्ष़ातर्फे महिनाभरात जिल्हा व प्रदेशस्तरावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी अर्ज स्वीकृती होईल, असे ते म्हणाले. कार्यकर्त्यांची हजेरीयावेळी मेळाव्यात खा. चव्हाण यांनी कोणते जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका सदस्य अनुपस्थित आहेत, याची हजेरी घेतली. अनुपस्थित सदस्यांना पुढची निवडणूक लढवायची नाही, असे दिसत असून, त्यांचा विचार केला जाणार नाही, असा इशारा दिला. पक्षाच्या कार्यक्रमाला सर्वांची हजेरी आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.झांबड यांचा इशारायावेळी आ. सुभाष झांबड यांनी कार्यकर्त्यांच्या बाबतीत परखड मत व्यक्त केले. पक्षाची स्थिती चांगली असल्याचे जे लोक सांगत आहेत ते पक्षाची फसवणूक करीत आहेत. पक्षाची स्थिती खराब नाही मात्र प्रत्यक्षात खूप काम करण्याची गरज आहे. ४सिल्लोड, फुलंब्री वगळता इतर तालुक्यात मोठे काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. आ. सत्तार यांनीही कार्यकर्त्यांनी झटून काम केल्यास निश्चित यश मिळेल, असे स्पष्ट केले. यावेळी खा. चव्हाण यांनी मराठवाड्यात चांगला पाऊस पडू दे, अशी ईश्वराजवळ प्रार्थना केली. त्यांनी सर्वांना शब-ए- कद्र तसेच रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. आ. सत्तार, आ. झांबड तसेच नामदेव पवार यांनीही सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. कौमी एकता हे आपल्या देशाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. शांतता आणि सौहार्दाच्या मार्गानेच देश चालला पाहिजे, असे मत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शनिवारी पक्षातर्फे आयोजित इफ्तार कार्यक्रमात केले.४औरंगाबाद शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे बीड बायपासवरील पटेल लॉन्सवर हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार, आ. सुभाष झांबड, शहराध्यक्ष नामदेव पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी आमदार कल्याण काळे, केशवराव औताडे, सुरेशदादा पाटील, फिरोज पटेल, शब्बीर पटेल, माजी आमदार सुरेश जेथलिया, मिलिंद पाटील आदींसह पक्षाचे कार्यकर्ते आणि मुस्लिम समुदायातील नागरिक उपस्थित होते.