शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
2
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
3
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
4
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
5
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
6
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
7
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
8
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
9
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
10
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
11
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
12
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
13
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
14
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
15
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
16
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
17
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
18
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
19
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
20
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!

स्वबळावर लढण्यासाठी पक्षाला मजबूत करा

By admin | Updated: July 3, 2016 00:45 IST

औरंगाबाद : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढायचे असेल तर गट आणि सर्कल पातळीवर पक्ष मजबूत केला पाहिजे,

औरंगाबाद : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढायचे असेल तर गट आणि सर्कल पातळीवर पक्ष मजबूत केला पाहिजे, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शनिवारी येथे जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले.औरंगाबाद शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणूकपूर्व तयारी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार, शहराध्यक्ष नामदेव पवार, आ. सुभाष झांबड, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी आमदार कल्याण काळे, माजी आमदार नितीन पाटील, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष केशवराव औताडे, पक्षाचे निरीक्षक नतीकोद्दीन खतीब, पक्षाचे सरचिटणीस किशोर बोरकर आदींची उपस्थिती होती. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील पक्षाच्या सदस्यांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अनेक सदस्यांनी आगामी निवडणुकीत कोणाबरोबरही आघाडी नको, स्वबळावरच निवडणुका लढवाण्यात, अशी भूमिका मांडली. त्याचा उल्लेख करून खा. चव्हाण म्हणाले की, स्वबळावर लढायचे असेल तर खाली पक्ष मजबूत असला पाहिजे. आम्ही मुंबईहून उमेदवार लादणार नाही, मात्र जिल्हा काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेस एखाद्या उमेदवारासंबंधीची माहिती पडताळून निर्णय घेईल. जात प्रमाणपत्र वैध असणाऱ्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी दिली जाईल. जात प्रमाणपत्र वैध नसेल तर उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. पक्ष़ातर्फे महिनाभरात जिल्हा व प्रदेशस्तरावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी अर्ज स्वीकृती होईल, असे ते म्हणाले. कार्यकर्त्यांची हजेरीयावेळी मेळाव्यात खा. चव्हाण यांनी कोणते जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका सदस्य अनुपस्थित आहेत, याची हजेरी घेतली. अनुपस्थित सदस्यांना पुढची निवडणूक लढवायची नाही, असे दिसत असून, त्यांचा विचार केला जाणार नाही, असा इशारा दिला. पक्षाच्या कार्यक्रमाला सर्वांची हजेरी आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.झांबड यांचा इशारायावेळी आ. सुभाष झांबड यांनी कार्यकर्त्यांच्या बाबतीत परखड मत व्यक्त केले. पक्षाची स्थिती चांगली असल्याचे जे लोक सांगत आहेत ते पक्षाची फसवणूक करीत आहेत. पक्षाची स्थिती खराब नाही मात्र प्रत्यक्षात खूप काम करण्याची गरज आहे. ४सिल्लोड, फुलंब्री वगळता इतर तालुक्यात मोठे काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. आ. सत्तार यांनीही कार्यकर्त्यांनी झटून काम केल्यास निश्चित यश मिळेल, असे स्पष्ट केले. यावेळी खा. चव्हाण यांनी मराठवाड्यात चांगला पाऊस पडू दे, अशी ईश्वराजवळ प्रार्थना केली. त्यांनी सर्वांना शब-ए- कद्र तसेच रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. आ. सत्तार, आ. झांबड तसेच नामदेव पवार यांनीही सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. कौमी एकता हे आपल्या देशाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. शांतता आणि सौहार्दाच्या मार्गानेच देश चालला पाहिजे, असे मत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शनिवारी पक्षातर्फे आयोजित इफ्तार कार्यक्रमात केले.४औरंगाबाद शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे बीड बायपासवरील पटेल लॉन्सवर हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार, आ. सुभाष झांबड, शहराध्यक्ष नामदेव पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी आमदार कल्याण काळे, केशवराव औताडे, सुरेशदादा पाटील, फिरोज पटेल, शब्बीर पटेल, माजी आमदार सुरेश जेथलिया, मिलिंद पाटील आदींसह पक्षाचे कार्यकर्ते आणि मुस्लिम समुदायातील नागरिक उपस्थित होते.