शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

बुरहान वानीचं उदात्तीकरण बंद करा, भारताचा पाकिस्तानला इशारा

By admin | Updated: July 10, 2017 09:14 IST

हिजबूल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला शहीद बनवण्याचा प्रयत्न करु नका असं सांगत भारताने पाकिस्तानला सुनावलं आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - हिजबूल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला शहीद बनवण्याचा प्रयत्न करु नका असं सांगत भारताने पाकिस्तानला सुनावलं आहे. गतवर्षी 8 जुलै रोजी भारतीय लष्कराच्या जवानांनी बुरहान वानीचा खात्मा केला होता. बुरहान वानीचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करणा-या पाकिस्तान सरकारला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागले यांनी खडे बोल सुनावले आहेत.
 
आणखी वाचा 
चीनच्या धमकीला ठेंगा, भारतीय लष्कराने डोकालममध्ये गाडले तंबू
जी-20 सदस्य देशांनी केला दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचा संकल्प
 
"आधी पाकिस्तानचं परराष्ट्र मंत्रालय जे लष्कर-ए-तोयबा सांगायचं तेच बोलत होतं. आता पाकिस्तानचे लष्कर प्रमुख बुरहान वानीचं उदात्तीकरण करत आहेत. पाकिस्तानकडून मिळणा-या दहशतवाद समर्थनाचा सर्वांनी निषेध करायला हवा", असं ट्विट गोपाळ बागले यांनी केलं आहे. 
 
पाकिस्तान लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी दहशतवादी बुरहान वानीचं कौतुक केलं होतं. इतकंच नाही तर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरिफ यांनीदेखील बुरहान वानीला श्रद्धांजली वाहिली. त्याचा मृत्यू काश्मीर खो-यातील स्वातंत्र्याच्या लढाईल बळ देईल असंही ते बोलले होते. याच पार्श्वभुमीवर गोपाळ बागले यांनी हे वक्तव्य केलं आहे. 
 
जर्मनीतील जी20 परिषदेत दहशतवादाविरोधात भूमिका मांडण्यात आल्यानंतर पाकिस्तानने बुरहान वानीचं कौतुक केलं आहे. जर्मनीतील हॅम्बर्ग येथे सुरू असलेल्या जी-20 संमेलनातील सर्व नेत्यांनी दहशतवादाविरोधात आपली स्पष्ट भूमिका मांडली होती. संमेलनाच्या शेवटी प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात जी-20 नेत्यांनी जगभरातील दहशतवादी कारवायांचा तीव्र शब्दात निषेध केला होता. तसेच दहशत आणि दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणाऱ्यांविरोधात एकजूट करण्याची घोषणा केली होती. 
 
दरम्यान, पाकिस्तानने सलग दुस-या दिवशी शस्त्रसंधी उल्लंघन केल्याचा आरोप करत इस्लमाबादमधील भारतीय उप-उच्चायुक्तांना समन्स बजावला आहे. नियंत्रण रेषेवर भारताकडून शस्त्रसंधी उल्लंघन केलं असून, फायरिंगमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. चिरीकोट आणि सतवाल सेक्टरमध्ये शनिवारी भारतीय जवानांकडून करण्यात आलेल्या फायरिंगमध्ये तीन सामान्य लोकंचा मृत्यू झाल्याचाही दावा करण्यात आला होता. 
 
पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे डायरेक्टर जनरल (दक्षिण आशिया आणि सार्क) मोहम्मद फैसल यांनी हे समन्स बजावलं असून, भारतीय जवानांकडून करण्यात आलेल्या गोळीबाराचा निषेध केला आहे. भारतीय जवान जाणुनबुजून स्थानिकांना टार्गट करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भारतीय अधिका-यांनी मात्र पाकिस्तानचा दावा फेटाळून लावत पुंछ आणि कृष्णघाटी सेक्टरमध्ये सर्वात आधी पाकिस्तान जवानांनी गोळीबार सुरु केला होता, आम्ही फक्त प्रत्युत्तर दिलं असं सांगितलं आहे. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात दोन भारतीयांचा मृत्यू झाला असून, भारताने यासंबंधी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.