शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

बुरहान वानीचं उदात्तीकरण बंद करा, भारताचा पाकिस्तानला इशारा

By admin | Updated: July 10, 2017 09:14 IST

हिजबूल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला शहीद बनवण्याचा प्रयत्न करु नका असं सांगत भारताने पाकिस्तानला सुनावलं आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - हिजबूल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला शहीद बनवण्याचा प्रयत्न करु नका असं सांगत भारताने पाकिस्तानला सुनावलं आहे. गतवर्षी 8 जुलै रोजी भारतीय लष्कराच्या जवानांनी बुरहान वानीचा खात्मा केला होता. बुरहान वानीचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करणा-या पाकिस्तान सरकारला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागले यांनी खडे बोल सुनावले आहेत.
 
आणखी वाचा 
चीनच्या धमकीला ठेंगा, भारतीय लष्कराने डोकालममध्ये गाडले तंबू
जी-20 सदस्य देशांनी केला दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचा संकल्प
 
"आधी पाकिस्तानचं परराष्ट्र मंत्रालय जे लष्कर-ए-तोयबा सांगायचं तेच बोलत होतं. आता पाकिस्तानचे लष्कर प्रमुख बुरहान वानीचं उदात्तीकरण करत आहेत. पाकिस्तानकडून मिळणा-या दहशतवाद समर्थनाचा सर्वांनी निषेध करायला हवा", असं ट्विट गोपाळ बागले यांनी केलं आहे. 
 
पाकिस्तान लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी दहशतवादी बुरहान वानीचं कौतुक केलं होतं. इतकंच नाही तर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरिफ यांनीदेखील बुरहान वानीला श्रद्धांजली वाहिली. त्याचा मृत्यू काश्मीर खो-यातील स्वातंत्र्याच्या लढाईल बळ देईल असंही ते बोलले होते. याच पार्श्वभुमीवर गोपाळ बागले यांनी हे वक्तव्य केलं आहे. 
 
जर्मनीतील जी20 परिषदेत दहशतवादाविरोधात भूमिका मांडण्यात आल्यानंतर पाकिस्तानने बुरहान वानीचं कौतुक केलं आहे. जर्मनीतील हॅम्बर्ग येथे सुरू असलेल्या जी-20 संमेलनातील सर्व नेत्यांनी दहशतवादाविरोधात आपली स्पष्ट भूमिका मांडली होती. संमेलनाच्या शेवटी प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात जी-20 नेत्यांनी जगभरातील दहशतवादी कारवायांचा तीव्र शब्दात निषेध केला होता. तसेच दहशत आणि दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणाऱ्यांविरोधात एकजूट करण्याची घोषणा केली होती. 
 
दरम्यान, पाकिस्तानने सलग दुस-या दिवशी शस्त्रसंधी उल्लंघन केल्याचा आरोप करत इस्लमाबादमधील भारतीय उप-उच्चायुक्तांना समन्स बजावला आहे. नियंत्रण रेषेवर भारताकडून शस्त्रसंधी उल्लंघन केलं असून, फायरिंगमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. चिरीकोट आणि सतवाल सेक्टरमध्ये शनिवारी भारतीय जवानांकडून करण्यात आलेल्या फायरिंगमध्ये तीन सामान्य लोकंचा मृत्यू झाल्याचाही दावा करण्यात आला होता. 
 
पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे डायरेक्टर जनरल (दक्षिण आशिया आणि सार्क) मोहम्मद फैसल यांनी हे समन्स बजावलं असून, भारतीय जवानांकडून करण्यात आलेल्या गोळीबाराचा निषेध केला आहे. भारतीय जवान जाणुनबुजून स्थानिकांना टार्गट करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भारतीय अधिका-यांनी मात्र पाकिस्तानचा दावा फेटाळून लावत पुंछ आणि कृष्णघाटी सेक्टरमध्ये सर्वात आधी पाकिस्तान जवानांनी गोळीबार सुरु केला होता, आम्ही फक्त प्रत्युत्तर दिलं असं सांगितलं आहे. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात दोन भारतीयांचा मृत्यू झाला असून, भारताने यासंबंधी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.