शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत?
3
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
4
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
5
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
6
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
7
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
8
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
9
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
10
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
11
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
12
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
13
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
14
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
15
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
16
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
17
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
18
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
19
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
20
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय

बुरहान वानीचं उदात्तीकरण बंद करा, भारताचा पाकिस्तानला इशारा

By admin | Updated: July 10, 2017 09:14 IST

हिजबूल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला शहीद बनवण्याचा प्रयत्न करु नका असं सांगत भारताने पाकिस्तानला सुनावलं आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - हिजबूल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला शहीद बनवण्याचा प्रयत्न करु नका असं सांगत भारताने पाकिस्तानला सुनावलं आहे. गतवर्षी 8 जुलै रोजी भारतीय लष्कराच्या जवानांनी बुरहान वानीचा खात्मा केला होता. बुरहान वानीचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करणा-या पाकिस्तान सरकारला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागले यांनी खडे बोल सुनावले आहेत.
 
आणखी वाचा 
चीनच्या धमकीला ठेंगा, भारतीय लष्कराने डोकालममध्ये गाडले तंबू
जी-20 सदस्य देशांनी केला दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचा संकल्प
 
"आधी पाकिस्तानचं परराष्ट्र मंत्रालय जे लष्कर-ए-तोयबा सांगायचं तेच बोलत होतं. आता पाकिस्तानचे लष्कर प्रमुख बुरहान वानीचं उदात्तीकरण करत आहेत. पाकिस्तानकडून मिळणा-या दहशतवाद समर्थनाचा सर्वांनी निषेध करायला हवा", असं ट्विट गोपाळ बागले यांनी केलं आहे. 
 
पाकिस्तान लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी दहशतवादी बुरहान वानीचं कौतुक केलं होतं. इतकंच नाही तर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरिफ यांनीदेखील बुरहान वानीला श्रद्धांजली वाहिली. त्याचा मृत्यू काश्मीर खो-यातील स्वातंत्र्याच्या लढाईल बळ देईल असंही ते बोलले होते. याच पार्श्वभुमीवर गोपाळ बागले यांनी हे वक्तव्य केलं आहे. 
 
जर्मनीतील जी20 परिषदेत दहशतवादाविरोधात भूमिका मांडण्यात आल्यानंतर पाकिस्तानने बुरहान वानीचं कौतुक केलं आहे. जर्मनीतील हॅम्बर्ग येथे सुरू असलेल्या जी-20 संमेलनातील सर्व नेत्यांनी दहशतवादाविरोधात आपली स्पष्ट भूमिका मांडली होती. संमेलनाच्या शेवटी प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात जी-20 नेत्यांनी जगभरातील दहशतवादी कारवायांचा तीव्र शब्दात निषेध केला होता. तसेच दहशत आणि दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणाऱ्यांविरोधात एकजूट करण्याची घोषणा केली होती. 
 
दरम्यान, पाकिस्तानने सलग दुस-या दिवशी शस्त्रसंधी उल्लंघन केल्याचा आरोप करत इस्लमाबादमधील भारतीय उप-उच्चायुक्तांना समन्स बजावला आहे. नियंत्रण रेषेवर भारताकडून शस्त्रसंधी उल्लंघन केलं असून, फायरिंगमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. चिरीकोट आणि सतवाल सेक्टरमध्ये शनिवारी भारतीय जवानांकडून करण्यात आलेल्या फायरिंगमध्ये तीन सामान्य लोकंचा मृत्यू झाल्याचाही दावा करण्यात आला होता. 
 
पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे डायरेक्टर जनरल (दक्षिण आशिया आणि सार्क) मोहम्मद फैसल यांनी हे समन्स बजावलं असून, भारतीय जवानांकडून करण्यात आलेल्या गोळीबाराचा निषेध केला आहे. भारतीय जवान जाणुनबुजून स्थानिकांना टार्गट करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भारतीय अधिका-यांनी मात्र पाकिस्तानचा दावा फेटाळून लावत पुंछ आणि कृष्णघाटी सेक्टरमध्ये सर्वात आधी पाकिस्तान जवानांनी गोळीबार सुरु केला होता, आम्ही फक्त प्रत्युत्तर दिलं असं सांगितलं आहे. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात दोन भारतीयांचा मृत्यू झाला असून, भारताने यासंबंधी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.