शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

कावेरी नदीच्या पाण्यावरुन कर्नाटकमध्ये पेटला संघर्ष

By admin | Updated: September 6, 2016 15:23 IST

कावेरी नदीचं पाणी तामिळनाडूला सोडण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरुन कर्नाटकमध्ये संघर्ष पेटला आहे. शेतकरी आणि काही संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली

- ऑनलाइन लोकमत
मंड्या, दि. 6 - कावेरी नदीचं पाणी तामिळनाडूला सोडण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरुन कर्नाटकमध्ये संघर्ष पेटला आहे. शेतकरी आणि काही संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. बंगळुरु - म्हैसूर हायवेवरही सुरु असलेल्या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी तामिळनाडूमधील शेतक-यांची परिस्थिती सुधारण्यासाठी पुढील 10 दिवस कावेरी नदीतून पाणी रोज 15 हजार क्युसेक्स पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. 
 
कावेरी नदीवरुन राजकारण सुरु झालं असून मुख्य केंद्र असलेल्या मंड्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहे. आंदोलकांनी अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरुन जाळपोळ केली तसंच धरणा आंदोलन करत अनेक ठिकाणी वाहतूक अडवली. कावेरी नदी परिसरात कायदा - सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 
 
आंदोलनकांनी सरकारी कार्यालयात घुसून तोडफोडदेखील केला आहे. अनेक सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचा-याची उपस्थिती कमी होती असं पोलिसांनी सांगितलं आहे. परिस्थिती चिघळत असल्याने कृष्णराजनगर धरण परिसरात प्रतिबंधक आदेश जारी करण्यात आले असून नऊ सप्टेंबरपर्यत प्रवेशही बंद करण्यात आला आहे. 
म्हैसूरु आणि हस्सन जिल्ह्यातही आंदोलन झाले असून कर्नाटकने पाणी न सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे पुतळेही अनेक ठिकाणी जाळण्यात आले. सरकारने लोकांना शांत राहून कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केलं आहे.