शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यांना ‘कर’लॉटरी!

By admin | Updated: February 25, 2015 02:54 IST

१४व्या वित्त आयोगाचा अहवाल केंद्र सरकारने स्वीकारला आहे. त्यानुसार केंद्रीय करांमध्ये राज्यांचा वाटा १0 टक्क्यांनी वाढवून ४२ टक्के करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : १४व्या वित्त आयोगाचा अहवाल केंद्र सरकारने स्वीकारला आहे. त्यानुसार केंद्रीय करांमध्ये राज्यांचा वाटा १0 टक्क्यांनी वाढवून ४२ टक्के करण्यात आला आहे. याशिवाय २0१५-१६ या आर्थिक वर्षात राज्यांना १.७८ लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल केंद्राकडून मिळणार आहे. शिफारशींमुळे राज्यांना आता अतिरिक्त निधी उपलब्ध होणार आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर वाय. व्ही. रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली वित्त आयोगाने आपला अहवाल तयार केला आहे. महसुलाची चणचण असलेल्या ११ राज्यांना ४८,९0६ कोटी रुपयांचे अर्थसाह्य देण्याची शिफारस आयोगाने केली आहे. या राज्यांत विभाजनानंतरचे आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर या राज्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. हा निधी २0१५-१६ या वर्षातच अदा करावयाचा आहे. २0२0 पर्यंत एकूण १.९४ लाख कोटींचा निधी केंद्राकडून अदा होणार आहे. २0१५-१६ या आर्थिक वर्षात राज्यांना एकूण ५.२६ लाख कोटी रुपयांचा वाटा मिळेल. २0१४-१५ या वर्षात  ही रक्कम ३.८४ लाख कोटी होती. याचाच अर्थ राज्यांना घसघशीत १.७८ लाख कोटींची अतिरिक्त वाढ मिळाली आहे. संपूर्ण पाच वर्षांच्या काळात म्हणजेच २0१९-२0 सालापर्यंत राज्यांचा एकूण महसुली वाटा ३९.४८ लाख कोटींचा असेल. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वित्त आयोगाचा अहवाल संसदेत सादर केला. त्यानंतर एका पत्रकार परिषदेत त्यांनी, वित्त आयोगाचा अहवाल केंद्र सरकारने स्वीकारला आहे, असे जाहीर केले. रालोआ सरकार संघीय प्रणालीबाबत कटिबद्ध आहे, हेच यावरून दिसून येते आणि राज्यांना अधिक निधी मिळणार याचा आम्हाला आनंद आहे, असे वित्तमंत्री म्हणाले. वित्त आयोगाच्या शिफारशींमुळे राज्यांना अतिरिक्त निधी उपलब्ध होणार असून, त्यातून राज्यांना आपल्या गरजेनुसार विकासकामे करता येऊ शकतील, असे मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. केंद्रीय करांत राज्यांचा वाटा याआधी ३२ टक्के होता. वित्त आयोगाच्या शिफारशीनंतर तो आता ४२ टक्के होईल. याशिवाय पाच वर्षांत पंचायती आणि महानगरपालिकांसाठी २.८७ लाख कोटींचा अतिरिक्त निधी केंद्राकडून मिळेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)