शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Parliamentary Awards: राज्यांनी व्हॅट घटवून जनतेला इंधन दरवाढीतून दिलासा द्यावा: हरदीपसिंह पुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2023 10:18 IST

हरदीपसिंह पुरी यांनी ‘लाेकमत नॅशनल काॅन्क्लेव्ह’मध्ये बाेलताना केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर २०२१ व मे २०२२ मध्ये इंधनावरील उत्पादनशुल्कात कपात केल्यामुळे पेट्रोलच्या किमती अनुक्रमे १३ व १६ रूपयांनी कमी झाल्या. त्याचवेळी राज्य सरकारांनी व्हॅटमध्ये कपात करून जनतेला दिलासा देण्याचे आवाहन करण्यात आले होते. तथापि, बिगर भाजपशासित राज्यांनी केवळ राजकारणासाठी त्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. परिणामी, भाजपशासित व बिगर भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोलच्या दरात १५ रूपयांची तफावत आहे. ती दूर करण्यासाठी विरोधी पक्षांच्या राज्य सरकारांनी आतातरी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी ‘लाेकमत नॅशनल काॅन्क्लेव्ह’मध्ये बाेलताना केले. 

केंद्रात गृहनिर्माण व शहरी विकास खातेही सांभाळणारे हरदीपसिंह पुरी परिषदेच्या सातव्या सत्रात बोलत होते. सीएनएन न्यूज-१८ च्या शिवानी गुप्ता यांनी त्यांच्याशी संवाद साधला. पुरी म्हणाले की, इंधनाचे दर आवाक्यात राहावेत यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. तथापि, राज्यांनी व्हॅट कमी केल्यास जनतेला अधिक दिलासा मिळेल. रशियाकडून तेल खरेदी करण्यावरून स्पष्ट झाले, की माेदी सरकार काेणत्याही देशांच्या दबावात काम करीत नाही. पूर्वी आपण रशियाकडून अत्यल्प तेल खरेदी करीत हाेताे. कारण, जवळच्या अरब देशांमधून स्वस्तात तेल मिळत हाेते. आता रशियाकडून स्वस्त तेल मिळत असल्याने ती खरेदी वाढविली आहे. भारत ही मोठी बाजारपेठ असल्याने एक प्रकारे आपण मार्केट कार्ड खेळत आहोत. त्यामुळे पाश्चिमात्य देशांनी नाराज हाेण्याचे कारण नाही. 

लाेकशाही धाेक्यात आल्याच्या काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरोपाला उत्तर देताना पुरी यांनी गांधींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उलट, काॅंग्रेसने लाेकशाहीला अनेकदा नख लावले आहे. खरेतर परदेशात जाऊन देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधींना त्यांचा पक्षच बाहेर काढील. कारण, त्यांच्याच पक्षाला ते डाेईजड झाले आहेत, अशी टीका पुरी यांनी केली. काॅंग्रेस अशीच कुरघाेड्या करीत राहिली तर २०२४ मध्ये आम्ही त्यांच्यापेक्षा अधिक जागा जिंकू, असा दावा त्यांनी केला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Lokmatलोकमतlokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड