शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

सुपरव्होटला पाठविली राज्य सुपरव्होट

By admin | Updated: January 31, 2017 02:06 IST

उद्धव ठाकरे :मुख्यमंत्र्यांवर पलटवार

उद्धव ठाकरे :मुख्यमंत्र्यांवर पलटवार

मुंबई : शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युती संपुष्टात आल्यानंतर अपेक्षेप्रमाणे दोन्ही पक्षांत शाब्दिक कलगीतुरे रंगू लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारच्या भाजपा मेळाव्यात शिवसेनेवर जोरदार प्रहार केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय प्रतिउत्तर काय देतात याबाबत उत्सुकता होती. उद्धव यांनी मात्र, फार काही बोलणार नाही, नाहीतर घसा बसेल, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.
मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित आंबेरकर यांच्यासह उल्हासनगर येथील विद्यमान नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले. या पक्षप्रवेशानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणावर काहीही बोलयाचे नाही, असे उद्धव यांनी सांगितले. भाजपाला काय टीका करायची ती करु द्या, आपण आपले काम घेऊन लोकांपुढे जाऊ, असे शिवसैनिकांना सांगितले आहे. आम्ही आमची मुंबई घडवल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची एक प्रतिमा होती, मात्र ती आता मलिन झाली आहे. आता ते गुंडाचे मंत्री आहेत का असा प्रश्न पडतो. मी मांडलेल्या पारदर्शकतेच्या मुद्यावर कोणीच बोलत नाही, आता अच्छे दिनबद्दलही कोणी बोलताना दिसत नाही. भाजपा मेळाव्याला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घसा बसला होता. त्यावर, फार काही बोलणार नाही, नाहीतर माझा घसा बसेल अशी भीती वाटते, अशी कोपरखळी उद्धव यांनी मारली.
यावेळी उद्धव यांनी मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनाही लक्ष्य केले. लाल किल्ल्यावर भाषण केले म्हणून कोणी पंतप्रधान होत नाही. तसे स्वत:ला कृष्ण म्हणवून कोण कृष्ण बनत नाही किंवा स्वत:ला पांडव म्हटल्याने पांडव होता येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. आशिष शेलार यांनी शिवसेनेची तुलना कौरवांशी, उद्धव यांची दुर्योधनाशी तर भाजपाची पांडवांशी अप्रत्यक्ष तुलना केली होती. त्यावर कालचा सारा प्रकार कोकणातील दशावतार असावा असे वाटते, अशा शब्दात उद्धव यांनी भाजपाच्या मेळाव्याची खिल्ली उडवली.
केंद्रात सत्ता आल्यापासून अयोध्येत राम मंदिर बनेल असे भाजपाला वाटते. कदाचित हरवलेल्या विटा त्यांना सापडत असतील, त्यामुळे राम मंदिर बांधायला सुरुवात होईल, असा टोलाही उद्धव यांनी लगावला. आता सगळ्यांचे मुखवटे उतरले आहेत आणि खरे चेहरे समोर आले आहेत, असे सांगतानाच मुंबई-ठाणेकरांना दिलेली वचने पाळणार असल्याचे आश्वासनही उद्धव यांनी दिले. (प्रतिनिधी)

निरुमम यांचे भाजपाशी संधान, काँग्रेस संपवण्याचा डाव- आंबेरकर
महापालिका निवडणुकीच्या तोडंावर मुंबई काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते आणि देवेंद्र आंबेरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. देवेंद्र आंबेरकर हे ज्येष्ठ काँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे क˜र समर्थक मानले जातात. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या हुकूमशाही कारभारामुळे काँगेसला सोडचिठ्ठी दिल्याचे आंबेरकर यांनी सांगितले. यावेळी उल्हासनगर येथील विद्यमान नगरसेवक मीना सोंडे , पुष्पा बागुल, किशोरी बनवारी आणि विजय पाटील यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
निरुपम यांच्यामुळे मुंबईतील मराठी माणूस काँग्रेसपासून दुरावत आहे. संपूर्ण पक्ष संपवण्याची तयारी निरुपम यांनी चालविली आहे. भाजपाशी संधान साधून पद्धतशीरपणे मराठी नेत्यांना बाजूला करण्याचे उद्योग निरुपम यांनी चालविल्याचा आरोप आंबेरकर यांनी केला.
निरुपम यांच्याकडून कामत गटाला बाजूला सारले जात असल्याने सध्या पक्षात अस्वस्थता आहे. त्यामुळे कामत गटातील नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेना आणि भाजपात डेरेदाखल होण्याचा सपाटा लावला आहे. मुंबई काँग्रेमधील वाद मिटविण्यासाठी ज्येष्ठ काँग्रेस नेते भुपिंदर हुड्डा यांनी अलीकडेच मुंबई दौरा केला होता. यावेळी वाद मिटविण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्याला पुरेसे यश आले नसल्याचे चित्र आहे.
अभिनेते धर्मेंद्र यांनी स्वत: भुपिंदर हुड्डा यांना फोन करुन मला तिकीट देऊ नका, असे सांगितले होते. भाजपाला हाताशी धरुन काँग्रेसच्या चांगल्या उमेदवारांना तिकीट न देण्याचे कट-कारस्थान निरुपम यांना रचल्याचा आरोपही आंबेरकरांनी केला.
यापुर्वी काँग्रेसच्या कामत गटातील स्थायी समितीच्या सदस्या वकारुन्नीसा अन्सारी यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्या एमआयएममध्ये जाणार असून त्यांना एमआयएमकडून प्रभाग क्रमांक २२३ मधून उमेदवारीही देण्यात आली आहे. निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसमधील या गळतीने पक्षात चिंतेचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)