राज्य-थोडक्यात-विदर्भ
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
राज्य-थोडक्यात-विदर्भ
राज्य-थोडक्यात-विदर्भ
राज्य-थोडक्यात-विदर्भटपाल कार्यालयाची मागणी धूळ खाततुमसर : महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या अंतिम सीमेवरील आदिवासीबहुल परिक्षेत्रातील ३ हजार २४२ ग्रामीण जनतेचे भवितव्य भरकटत असून विकास प्रवाहाच्या झोतात आलेले नाही. याच आदिवासीबहुल भागात २० वर्षांपासून टपाल कार्यालयाची मागणी धूळ खात पडली आहे.अंगणवाडी इमारतीला दोन वर्षात तडेआरमोरी : तालुक्यातील वडधा येथे दोन वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या अंगणवाडीच्या इमारतीला तडे गेले आहेत. त्यामुळे अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या बालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. निकृष्ट बांधकामामुळे शासनाचा लाखो रूपयांचा निधी पाण्यात गेल्याबद्दल खंत व्यक्त केली जात आहे.दारूबंदी मंडळाच्या महिलांना धमकीवर्धा- दारूबंदी मंडळाच्या सदस्य महिला घरासमोरून जात असल्याचे पाहून चिडलेल्या दांपत्याने धमकी दिल्याची घटना पवनार येथे रविवारी घडली. संगीता धाकतोड या मंडळाच्या सदस्यांसह नामदेव सातघरे यांच्या घरासमोरून जात होत्या. दरम्यान नामदेव सातघरे आणि त्याची पत्नी नंदा सातघरे यांनी या महिलांना अडवून यापुढे घरासमोरून जाल तर पाहून घेऊ, अशी धमकी दिली. याप्रकरणी धाकतोड यांच्या तक्रारीवरून सेवाग्राम पोलिसांनी सातघरे दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.दोघांचा आजन्म कारावास रद्दनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अमरावती येथील हत्याप्रकरणात दोन आरोपींची आजन्म कारावासाची शिक्षा रद्द केली आहे. अनिल बबनराव पटवर्धन (३६), रा. चांदूर रेल्वे (जि. अमरावती) व दादाराव हरिदास इंदुरकर (३७), रा. खडकी (अकोला) अशी आरोपींची नावे आहेत. मृताचे नाव प्रेमकुमार जोशी होते. ५ नोव्हेंबर २००७ रोजी कान्हा अपार्टमेंटमध्ये आरोपींनी जोशी यांना हात-पाय दोरखंडाने बांधून जाळल्याचा आरोप होता. आरोपींनी सात हजार चौरस फुटाचा प्लॉट हडपण्यासाठी हे कृत्य केल्याचे जोशी यांनी मृत्यूपूर्व बयानात सांगितले होते. पतीची जन्मठेप कायमनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पत्नीची हत्या करणाऱ्या पतीची जन्मठेप कायम ठेवली आहे. ही घटना वर्धा जिल्ह्यातील आहे. शरद केशव नेरीकर (४०) असे आरोपीचे नाव असून तो मानोरा, ता. हिंगणघाट येथील रहिवासी आहे. मृताचे नाव सुरेखा होते. ५ फेब्रुवारी २०१० रोजी आरोपी सुरेखाला तिच्या माहेरगावातून सोबत घेऊन गेला होता. ९ फेब्रुवारी २०१० रोजी धामणगावाजवळ सुरेखाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला होता. शरदला सुरेखाच्या चारित्र्यावर संशय होता. तरुणीचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू नागपूर : कळमन्यातील कामनानगर क्रॉसिंगवर रेल्वेची धडक बसल्यामुळे पुष्पा उमनलाल यादव (वय १८, रा. विजयनगर) हिचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ७.२० वाजता ही घटना उघडकीस आली. तिचा भाऊ ओकेश (वय २३) याच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.