शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

मध्य प्रदेशात पाच बाबा-महाराज बनले राज्यमंत्री, राज्य सरकारचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 05:55 IST

वर्षाअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारने पाच हिंदू धार्मिक नेत्यांना मंगळवारी राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल केला. नर्मदानंद महाराज, हरिहरानंद महाराज, कम्प्युटर बाबा, भय्यू महाराज व पंडित योगेंद्र महंत यांना नर्मदा नदीच्या संवर्धन समितीवर नियुक्त करून, त्यांना सरकारने राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे.

भोपाळ - वर्षाअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारने पाच हिंदू धार्मिक नेत्यांना मंगळवारी राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल केला. नर्मदानंद महाराज, हरिहरानंद महाराज, कम्प्युटर बाबा, भय्यू महाराज व पंडित योगेंद्र महंत यांना नर्मदा नदीच्या संवर्धन समितीवर नियुक्त करून, त्यांना सरकारने राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे.लोकांच्या धार्मिक भावनांचा राजकीय लाभासाठी वापर करून घेण्याचा भाजपाचा हा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा स्वत:च पापांतून मुक्त व्हायचा प्रयत्न आहे. नर्मदेच्या संवर्धनाकडे चौहान यांनीच दुर्लक्ष केले आहे. राज्य सरकारने नदीच्या काठावर सहा कोटी झाडे लावल्याचा दावा असून, संतांनी ती झाडे शोधून काढावीत, असे काँग्रेसचे प्रवक्ते पंकज चतुर्वेदी म्हणाले.भाजपाचे प्रवक्ते रजनीश अग्रवाल यांनी मात्र काँग्रेसला संतांविषयी आदर आवडत नाही, असे म्हटले आहे. नर्मदेचे संवर्धन व पर्यावरणाचे काम करता यावे, यासाठी संतांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)माझ्या कामाचे बक्षीस मिळालेकम्प्युटर बाबा म्हणाले की, राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला गेला, यात चूक काय आहे? आमच्या कामाचे आम्हाला बक्षीस मिळाले आहे. कम्प्युटर बाबाने नर्मदा नदीच्या संवर्धन कामात झालेल्या प्रचंड भ्रष्टाचाराला उघड करण्यासाठी, या आधी नर्मदा घोटाळा रथयात्रा काढण्याची घोषणा केली होती.पंडित योगेंद्र महंत : मध्य प्रदेशात सुरू असलेल्या नर्मदा भ्रष्टाचार आंदोलनाचे पंडित योगेंद्र महंत समन्वयक आहेत. नदी संवर्धनात सरकारने मोठा भ्रष्टाचार केल्याचा व वनीकरणासाठी निर्धारित केलेला निधी सरकारने इतर कामांसाठी वापरल्याचा आरोप त्यांनी केला होता. अमेरिकेतून चालविल्या जाणाºया विश्व ब्राह्मण संघाच्या मध्य प्रदेश शाखेचे ते अध्यक्ष आहेत, अशी माहिती त्यांच्या फेसबुक पेजवर दिलेली आहे.हरिहरानंद महाराज : मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेल्या ‘नमामी देवी नर्मदे सेवा यात्रा’ उपक्रमातील हरिहरानंद महाराज हे प्रमुख नेते आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सुरू केलेल्या या यात्रेने ३,३४४ किलोमीटरचा प्रवास करीत, १,१०० गावांना भेटी दिल्या आहेत. मे २०१७ मध्ये या यात्रेचा समारोप झाला.भय्यूजी महाराजमूळ नाव उदयसिंग देशमुख. यांनी पूर्वी मॉडेलिंग केले आहे. त्यांचा अत्याधुनिक सोयी असलेला सूर्याेदय आश्रम इंदूरमध्ये आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिवंगत विलासराव देशमुख, शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, गायिका लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, मिलिंद गुणाजी आदींनी आश्रमाला भेट दिली आहे. अनेक ज्येष्ठ नेते यांचा सल्ला घेतात. त्यांची स्वत:ची वेबसाइट आहे. अण्णा हजारे यांच्या २०११ सालच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात ते सहभागी होते. एका अभिनेत्याने केलेल्या फसवणुकीच्या आरोपामुळे ते वादात सापडले होते.कम्प्युटर बाबा : यांचे मूळ नाव आहे, स्वामी नामदेव त्यागी. आपला मेंदू कम्प्युटरपेक्षा अधिक वेगाने चालतो, असा यांचा दावा आहे. ते टेक्नोसॅव्ही आहेत. गेल्या वर्षी त्यांनी मंदिराच्या कारभारात मध्य प्रदेश सरकार ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप केला होता. त्यांना २०१४च्या कुंभमेळ्यात हेलिकॉप्टर उतरविण्याची परवानगी मिळाली होती. नर्मदा संवर्धनाच्या कामातील भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी ‘नर्मदा घोटाळा रथयात्रा’ काढण्याच्या तयारीत असतानाच ते राज्यमंत्री झाले आहेत.नर्मदानंद महाराज : हे महाराज हनुमानाचे कट्टर भक्त आहेत. रामनवमीसारख्या सणानिमित्त महाराज दरवर्षी राज्यभर भव्य रॅलींचे आयोजन करीत असतात. या रॅलींना लाभत असलेल्या प्रतिसादामुळे ते संपूर्ण मध्य प्रदेशात लोकप्रिय असल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशnewsबातम्या