शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

मध्य प्रदेशात पाच बाबा-महाराज बनले राज्यमंत्री, राज्य सरकारचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 05:55 IST

वर्षाअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारने पाच हिंदू धार्मिक नेत्यांना मंगळवारी राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल केला. नर्मदानंद महाराज, हरिहरानंद महाराज, कम्प्युटर बाबा, भय्यू महाराज व पंडित योगेंद्र महंत यांना नर्मदा नदीच्या संवर्धन समितीवर नियुक्त करून, त्यांना सरकारने राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे.

भोपाळ - वर्षाअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारने पाच हिंदू धार्मिक नेत्यांना मंगळवारी राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल केला. नर्मदानंद महाराज, हरिहरानंद महाराज, कम्प्युटर बाबा, भय्यू महाराज व पंडित योगेंद्र महंत यांना नर्मदा नदीच्या संवर्धन समितीवर नियुक्त करून, त्यांना सरकारने राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे.लोकांच्या धार्मिक भावनांचा राजकीय लाभासाठी वापर करून घेण्याचा भाजपाचा हा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा स्वत:च पापांतून मुक्त व्हायचा प्रयत्न आहे. नर्मदेच्या संवर्धनाकडे चौहान यांनीच दुर्लक्ष केले आहे. राज्य सरकारने नदीच्या काठावर सहा कोटी झाडे लावल्याचा दावा असून, संतांनी ती झाडे शोधून काढावीत, असे काँग्रेसचे प्रवक्ते पंकज चतुर्वेदी म्हणाले.भाजपाचे प्रवक्ते रजनीश अग्रवाल यांनी मात्र काँग्रेसला संतांविषयी आदर आवडत नाही, असे म्हटले आहे. नर्मदेचे संवर्धन व पर्यावरणाचे काम करता यावे, यासाठी संतांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)माझ्या कामाचे बक्षीस मिळालेकम्प्युटर बाबा म्हणाले की, राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला गेला, यात चूक काय आहे? आमच्या कामाचे आम्हाला बक्षीस मिळाले आहे. कम्प्युटर बाबाने नर्मदा नदीच्या संवर्धन कामात झालेल्या प्रचंड भ्रष्टाचाराला उघड करण्यासाठी, या आधी नर्मदा घोटाळा रथयात्रा काढण्याची घोषणा केली होती.पंडित योगेंद्र महंत : मध्य प्रदेशात सुरू असलेल्या नर्मदा भ्रष्टाचार आंदोलनाचे पंडित योगेंद्र महंत समन्वयक आहेत. नदी संवर्धनात सरकारने मोठा भ्रष्टाचार केल्याचा व वनीकरणासाठी निर्धारित केलेला निधी सरकारने इतर कामांसाठी वापरल्याचा आरोप त्यांनी केला होता. अमेरिकेतून चालविल्या जाणाºया विश्व ब्राह्मण संघाच्या मध्य प्रदेश शाखेचे ते अध्यक्ष आहेत, अशी माहिती त्यांच्या फेसबुक पेजवर दिलेली आहे.हरिहरानंद महाराज : मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेल्या ‘नमामी देवी नर्मदे सेवा यात्रा’ उपक्रमातील हरिहरानंद महाराज हे प्रमुख नेते आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सुरू केलेल्या या यात्रेने ३,३४४ किलोमीटरचा प्रवास करीत, १,१०० गावांना भेटी दिल्या आहेत. मे २०१७ मध्ये या यात्रेचा समारोप झाला.भय्यूजी महाराजमूळ नाव उदयसिंग देशमुख. यांनी पूर्वी मॉडेलिंग केले आहे. त्यांचा अत्याधुनिक सोयी असलेला सूर्याेदय आश्रम इंदूरमध्ये आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिवंगत विलासराव देशमुख, शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, गायिका लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, मिलिंद गुणाजी आदींनी आश्रमाला भेट दिली आहे. अनेक ज्येष्ठ नेते यांचा सल्ला घेतात. त्यांची स्वत:ची वेबसाइट आहे. अण्णा हजारे यांच्या २०११ सालच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात ते सहभागी होते. एका अभिनेत्याने केलेल्या फसवणुकीच्या आरोपामुळे ते वादात सापडले होते.कम्प्युटर बाबा : यांचे मूळ नाव आहे, स्वामी नामदेव त्यागी. आपला मेंदू कम्प्युटरपेक्षा अधिक वेगाने चालतो, असा यांचा दावा आहे. ते टेक्नोसॅव्ही आहेत. गेल्या वर्षी त्यांनी मंदिराच्या कारभारात मध्य प्रदेश सरकार ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप केला होता. त्यांना २०१४च्या कुंभमेळ्यात हेलिकॉप्टर उतरविण्याची परवानगी मिळाली होती. नर्मदा संवर्धनाच्या कामातील भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी ‘नर्मदा घोटाळा रथयात्रा’ काढण्याच्या तयारीत असतानाच ते राज्यमंत्री झाले आहेत.नर्मदानंद महाराज : हे महाराज हनुमानाचे कट्टर भक्त आहेत. रामनवमीसारख्या सणानिमित्त महाराज दरवर्षी राज्यभर भव्य रॅलींचे आयोजन करीत असतात. या रॅलींना लाभत असलेल्या प्रतिसादामुळे ते संपूर्ण मध्य प्रदेशात लोकप्रिय असल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशnewsबातम्या