शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मोफत गॅस कनेक्शनच्या ‘उज्ज्वला’ योजनेचा प्रारंभ

By admin | Updated: May 2, 2016 01:58 IST

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पाच कोटी एलपीजी कनेक्शन(घरगुती गॅस)देण्यासाठी आठ हजार कोटी रुपयांच्या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे उद्घाटन केले. यापूर्वीच्या

बलिया (उ.प्र.) : दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पाच कोटी एलपीजी कनेक्शन(घरगुती गॅस)देण्यासाठी आठ हजार कोटी रुपयांच्या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे उद्घाटन केले. यापूर्वीच्या सरकारांनी गरिबांच्या घरांऐवजी मतपेटींवर लक्ष केंद्रित करीत निव्वळ घोषणा दिल्या होत्या, असा आरोप करतानाच त्यांनी जागतिक कामगारदिनानिमित्त ‘लेबर्स युनाइट द वर्ल्ड’ हा नारा दिला.कामगारदिनाचे औचित्य साधत त्यांनी उत्तर प्रदेशातील बलिया येथे उज्ज्वला योजनेचा प्रारंभ करताना त्यांनी रालोआ सरकारने कामगारांच्या कल्याणासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती देत स्वत:ला कामगार क्रमांक एक असे संबोधले. केवळ मतपेटींवर डोळा ठेवून योजना बनविल्या जातील तोपर्यंत गरिबी संपणार नाही. गरिबांना अधिकार बहाल केल्याने दारिद्र्याशी लढण्याची ताकद मिळेल आणि तेव्हाच गरिबी संपुष्टात येईल. त्यांना शिक्षण, नोकऱ्या, घरे, पिण्याचे पाणी आणि विजेसह संसाधने आणि संधी पुरविल्या जाव्या. आमचे सरकार गरिबांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी काम करीत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.गॅस कनेक्शन महिलांच्या नावेपंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांतील महिलांच्या नावे मोफत एलपीजी कनेक्शन पुरविले जातील. पहिल्यावर्षी दीड कोटी कनेक्शन दिले जातील. येत्या तीन वर्षांत पाच कोटी गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट गाठले जाईल. स्वातंत्र्यानंतरच्या ६० वर्षांत केवळ १३ कोटी गॅस कनेक्शन पुरविण्यात आल्याचे सांगत मोदींनी तुलनात्मक लेखाजोखा मांडला. २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या योजनेसाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून कोणतेही रक्कम जमा न करता गरिबांना गॅस कनेक्शन मिळेल, अशी माहितीही त्यांनी दिली.‘लेबर्स युनाइट द वर्ल्ड’ नवा नाराजगभरातील कामगारांनी एकजूट व्हावे याऐवजी कामगार जगाला जोडतील(लेबर्स युनाइट द वर्ल्ड) हा नवा नारा देताना ते म्हणाले की, २१ शतकातील बदलत्या परिस्थितीत या मंत्रासोबतच जगाला जोडण्याची गरज आहे. कामगारांचा घाम हा सर्वात मोठा दुवा ठरावा. कामगारच जगाला एकत्र ठेवू शकतात. कामगारांना एकत्र ठेवण्याचा नारा देणारे लोक जगभरात आपला पाया गमावत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.५० वर्षांनंतर शिफारसपूर्तीउत्तर प्रदेशाने देशाला आठ पंतप्रधान दिले; मात्र या राज्यातील गरिबी का हटली नाही? जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना उत्तर प्रदेशातील घाझीपूरच्या खासदाराने पूर्व उत्तर प्रदेशातील गरिबीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर स्थापन झालेल्या आयोगाने अनेक शिफारशी केल्या. त्या शिफारशींचे काय झाले ते देवालाच माहीत. त्यापैकी एक शिफारस घाझीपूर आणि मऊ या गावांना रेल्वेने जोडण्याची होती. त्यानंतर ५० वर्षे उलटली. आम्ही हा रेल्वेमार्ग उभारत एका शिफारशीची पूर्तता करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.(वृत्तसंस्था)