शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

मोफत गॅस कनेक्शनच्या ‘उज्ज्वला’ योजनेचा प्रारंभ

By admin | Updated: May 2, 2016 01:58 IST

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पाच कोटी एलपीजी कनेक्शन(घरगुती गॅस)देण्यासाठी आठ हजार कोटी रुपयांच्या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे उद्घाटन केले. यापूर्वीच्या

बलिया (उ.प्र.) : दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पाच कोटी एलपीजी कनेक्शन(घरगुती गॅस)देण्यासाठी आठ हजार कोटी रुपयांच्या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे उद्घाटन केले. यापूर्वीच्या सरकारांनी गरिबांच्या घरांऐवजी मतपेटींवर लक्ष केंद्रित करीत निव्वळ घोषणा दिल्या होत्या, असा आरोप करतानाच त्यांनी जागतिक कामगारदिनानिमित्त ‘लेबर्स युनाइट द वर्ल्ड’ हा नारा दिला.कामगारदिनाचे औचित्य साधत त्यांनी उत्तर प्रदेशातील बलिया येथे उज्ज्वला योजनेचा प्रारंभ करताना त्यांनी रालोआ सरकारने कामगारांच्या कल्याणासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती देत स्वत:ला कामगार क्रमांक एक असे संबोधले. केवळ मतपेटींवर डोळा ठेवून योजना बनविल्या जातील तोपर्यंत गरिबी संपणार नाही. गरिबांना अधिकार बहाल केल्याने दारिद्र्याशी लढण्याची ताकद मिळेल आणि तेव्हाच गरिबी संपुष्टात येईल. त्यांना शिक्षण, नोकऱ्या, घरे, पिण्याचे पाणी आणि विजेसह संसाधने आणि संधी पुरविल्या जाव्या. आमचे सरकार गरिबांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी काम करीत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.गॅस कनेक्शन महिलांच्या नावेपंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांतील महिलांच्या नावे मोफत एलपीजी कनेक्शन पुरविले जातील. पहिल्यावर्षी दीड कोटी कनेक्शन दिले जातील. येत्या तीन वर्षांत पाच कोटी गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट गाठले जाईल. स्वातंत्र्यानंतरच्या ६० वर्षांत केवळ १३ कोटी गॅस कनेक्शन पुरविण्यात आल्याचे सांगत मोदींनी तुलनात्मक लेखाजोखा मांडला. २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या योजनेसाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून कोणतेही रक्कम जमा न करता गरिबांना गॅस कनेक्शन मिळेल, अशी माहितीही त्यांनी दिली.‘लेबर्स युनाइट द वर्ल्ड’ नवा नाराजगभरातील कामगारांनी एकजूट व्हावे याऐवजी कामगार जगाला जोडतील(लेबर्स युनाइट द वर्ल्ड) हा नवा नारा देताना ते म्हणाले की, २१ शतकातील बदलत्या परिस्थितीत या मंत्रासोबतच जगाला जोडण्याची गरज आहे. कामगारांचा घाम हा सर्वात मोठा दुवा ठरावा. कामगारच जगाला एकत्र ठेवू शकतात. कामगारांना एकत्र ठेवण्याचा नारा देणारे लोक जगभरात आपला पाया गमावत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.५० वर्षांनंतर शिफारसपूर्तीउत्तर प्रदेशाने देशाला आठ पंतप्रधान दिले; मात्र या राज्यातील गरिबी का हटली नाही? जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना उत्तर प्रदेशातील घाझीपूरच्या खासदाराने पूर्व उत्तर प्रदेशातील गरिबीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर स्थापन झालेल्या आयोगाने अनेक शिफारशी केल्या. त्या शिफारशींचे काय झाले ते देवालाच माहीत. त्यापैकी एक शिफारस घाझीपूर आणि मऊ या गावांना रेल्वेने जोडण्याची होती. त्यानंतर ५० वर्षे उलटली. आम्ही हा रेल्वेमार्ग उभारत एका शिफारशीची पूर्तता करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.(वृत्तसंस्था)