शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आवश्यक परवानगीनंतरच योजनांना प्रारंभ (भाग १)

By admin | Updated: December 19, 2014 22:56 IST

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : नागपूर मेट्रोच्या कामाचे प्रयत्न योग्य दिशेने

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : नागपूर मेट्रोच्या कामाचे प्रयत्न योग्य दिशेने
नागपूर : शासनातर्फे अनेक कल्याणकारी योजना आणि प्रकल्पांना प्रारंभ केला जातो पण या योजना पूर्ण करण्यासाठी विलंब होतो. योजनांना प्रारंभ करण्यापूर्वी विविध विभागांकडून संपूर्ण परवानगी न घेताच कामाला सुरुवात केली जाते. त्यामुळे योजना पूर्ण करण्यासाठी विलंब होतो. भविष्यात आवश्यक परवानगी मिळाल्याशिवाय योजनांचे कंत्राटच देण्यात येणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नागपुरातील निवडक संपादकांशी अनौपचारिक चर्चा करताना फडणवीस यांना योजनांच्या विलंबाबाबत आणि त्यामुळे प्रकल्पांच्या किमती वाढत असल्याबद्दल विचारणा करण्यात आली. यामुळे लोकांना मनस्ताप सहन करावा लागतो. यासंदर्भात शासनातर्फे काय उपाय करण्यात येत आहेत? या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. विविध विभागांच्या परवानगीअभावी अनेक योजना रखडतात आणि त्यांना विलंब होतो, ही बाब त्यांनी मान्य केली. यावेळी त्यांनी मुंबई हायपर लिंक परियोजनेचेही उदाहरण दिले. या योजनेसाठी दोन वेळा कंत्राट काढल्यानंतरही कुणीही कंत्राटदार समोर आला नाही. परियोजनेसाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली नसल्याने ही योजना रखडली आहे. शासनातर्फे दिघी आणि जयगड पोर्टच्या निर्माणकार्यासाठी पायाभूत सुविधा उभ्या करण्यात आल्या नाहीत. या पायाभूत सुविधांसाठी शासनाची प्राथमिकता असेल. करंजा पोर्टचे काम दोन वर्षात सुरू होईल. महाराष्ट्राच्या समुद्री किनाऱ्यांच्या भरपूर उपयोगातून किनारेआर्थिकदृष्ट्या लाभदायी करण्याचाही शासनाचा प्रयत्न असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.
--------
वास्तविकता शून्य
छोट्या शहरांचा विकास करण्याची योजना तयार आहे पण छोट्या शहरांमध्ये आर्थिक स्रोतांची उपलब्धता जवळपास नाही. छोट्या शहरांची प्रगती करण्यासाठी विकासाचा प्रवाह छोट्या शहरांकडे वळविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे लहान शहरांमध्येही पायाभूत सुविधा निर्माण होतील. केंद्रातर्फे स्मार्ट सिटीची परियोजना तयार झाल्यावर त्यावरही राज्य शासन काम करेल. केंद्राच्या सल्ल्याप्रमाणेच स्मार्ट सिटीसाठी काम क रण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
---
कोळसा वाहतुकीवर अकारण खर्च
राज्यात कोळशाच्या कमतरतेमुळे कुठलाही वीज प्रकल्प बंद नाही. पण प्रकल्पांजवळ कोळसा उपलब्ध असताना दूरून कोळसा मागविण्यात येत असल्याने अकारण वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. हा खर्च आम्ही कमी केला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. ही वाहतूक जाणून करण्यात येत होती का? या प्रश्नावर त्यांनी मौन साधले.
-------