शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बुधवारपासून अधिक मासास प्रारंभ

By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST

ठाणे : बुधवार म्हणजे १७ जूनपासून अधिक आषाढ महिन्याचा प्रारंभ होत असून गुरुवारी १६ जुलै रोजी अधिक आषाढ महिना संपणार असल्याचे पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी सांगितले.

ठाणे : बुधवार म्हणजे १७ जूनपासून अधिक आषाढ महिन्याचा प्रारंभ होत असून गुरुवारी १६ जुलै रोजी अधिक आषाढ महिना संपणार असल्याचे पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी सांगितले.
ऋतू हे सूर्यावर अवलंबून असतात, तर आपले सण, व्रतवैकल्ये चंद्रावर अवलंबून असतात. सण, व्रतवैकल्ये ठराविक ऋतूत येण्यासाठी चांद्र-सौर पद्धतीचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यामुळेच अधिक मास येत असतो. अधिक मासानंतर नीज मास येत असतो. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्याकरिता ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटे आणि ४६ सेकंद लागतात. त्यालाच सौरवर्ष म्हटले जाते. चंद्राला पृथ्वीभोवती १२ प्रदक्षिणा पूर्ण करण्याकरिता ३५४ दिवस ८ तास ४८ मिनिटे आणि २४ सेकंद एवढा कालावधी लागतो. त्यामुळे दरवर्षी चांद्र-सौर वर्षाच्या काळात सुमारे ११ तिथींचा फरक पडत जातो. सुमारे तीन वर्षांनी अधिक महिना येतो. एका राशीत सूर्य असताना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ झाला की, पहिला तो अधिक मास आणि दुसरा तो नीज मास समजला जातो. दोन अधिक मासांत जास्तीतजास्त ३५ तर कमीतकमी २७ महिन्यांचा कालावधी जातो. यापूर्वी २०१२ मध्ये भाद्रपद अधिक मास आला होता. या वर्षी आषाढ अधिक मास तर २०१८ मध्ये ज्येष्ठ, २०२० मध्ये आश्विन, २०२३ मध्ये श्रावण, २०२६ मध्ये ज्येष्ठ तर २०२९ मध्ये चैत्र अधिक मास येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अधिक मासात दान देण्यास सांगितले आहे. आषाढ अधिक मास आला असताना कोकिळा व्रत करण्यास सांगितले आहे. गुरुवार, ३० जुलैपासून शनिवार, २९ ऑगस्टपर्यंत कोकिळा व्रत करावयाचे आहे. कोकीळ पक्ष्याचा आवाज ऐकून उपास सोडण्यास सांगितले आहे. गावात कोकीळ पक्षी असावा, असा त्यामागचा उद्देश असू शकतो, असे त्यांनी सांगितले.
................
वाचली - नारायण जाधव