शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कावड यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी,१० ठार

By admin | Updated: August 11, 2015 02:56 IST

झारखंडच्या देवघर जिल्ह्यातील भगवान शिवाच्या वैद्यनाथबाबा धाममध्ये श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी होऊन १० ठार, तर ३० जण जखमी झाले.

देवघर : झारखंडच्या देवघर जिल्ह्यातील भगवान शिवाच्या वैद्यनाथबाबा धाममध्ये श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी होऊन १० ठार, तर ३० जण जखमी झाले. मृतांमध्ये नऊ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.राज्याचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी ५० हजारांच्या मदतीची घोषणा केली. तसेच घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रांचीपासून ३५० कि. मी. दूर देवघरस्थित बाबा धाममध्ये दुसरा श्रावणी सोमवार असल्यामुळे भाविकांची गर्दी उसळली होती. लाखोंच्या संख्येत कावड यात्रेकरू या ठिकाणी आले होते. शिवलिंगाच्या जलाभिषेकासाठी रात्रीपासूनच रांगा लागल्या होत्या. याचदरम्यान पहाटे ४ च्या सुमारास देवघर मंदिरानजीक बेला बागानस्थित दुर्गा मंदिरात रांगेत पुढे जाण्याच्या चढाओढीतून चेंगराचेंगरी झाली. मंदिरापासून तीन कि.मी. अंतरावर चेंगराचेंगरीची ही घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी चेंगराचेंगरीच्या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले. (वृत्तसंस्था)उत्तर भारतात श्रावण मास सुरू झाला आहे. या महिन्यात देवघर बाबा धाम येथे भाविकांची मोठी गर्दी उसळते. श्रावणी सोमवारी एकाच दिवशी दोन ते तीन लाख भाविक शिवलिंगाचे दर्शन घेतात.गृहमंत्री राजनाथसिंह यांनी लोकसभेत चेंगराचेंगरीची ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगत मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. देवघर येथे भाविकांची मोठी गर्दी आहे. राज्य सरकारकडून अतिरिक्त दलांची मागणी करण्यात आली असल्याने या ठिकाणी त्वरित शीघ्र कृतिदल पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.