शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंका आणि जर्मनीचाही भारताला पाठिंबा

By admin | Updated: October 5, 2016 16:54 IST

उरी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या कारवाईला समर्थन देत रानिल विक्रमसिंघे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तणाव कमी करण्यासाठी गरज असलेली सर्व पावलं उचलली आहेत असं सांगत कौतुक केलं

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - सीमारेषेपलीकडचा दहशतवाद हा मुख्य मुद्दा असून सार्क देशांनी यावर चर्चा करणं गरजेचं असल्याचं श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे बोलले आहेत. उरी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या कारवाईला समर्थन देत रानिल विक्रमसिंघे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तणाव कमी करण्यासाठी गरज असलेली सर्व पावलं उचलली आहेत असं सांगत कौतुक केलं. तसंच युद्द हा पर्याय नसल्याचंही रानिल विक्रमसिंघे बोलले आहेत. 
 
चीनसोबत आमचे व्यवहारिक संबंध असून कोणतेही लष्करी संबंध नसल्याचं रानिल विक्रमसिंघे यांनी यावेळी स्पष्ट केलं. याअगोदर नेपाळनेही सार्क देशांनी आपल्या भुमीचा उपयोग दहशतवादासाठी करु नये असं आवाहन केलं होतं. भारत आणि इतर देशांनी सार्कमध्ये सहभागी न होण्याची भुमिका घेतल्यानंतर इस्लमाबादमधील आयोजित सार्क परिषद रद्द करण्यात आली होती. 
 
जर्मनीनेही भारताच्या कारवाईला पाठिंबा दर्शवला असून ' आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे कोणत्याही देशाला दहशतवादापासून स्वत:ला वाचवण्याचा हक्क आहे', असं  जर्मनीचे भारतातील राजदूत डॉ. मार्टिन ने यांनी सांगितलं आहे.