शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

हायस्पीड रेल्वेचा वेग ताशी ३५० किलोमीटर

By admin | Updated: December 20, 2015 22:56 IST

भारत आणि जपान यांच्या सहकार्याने तयार होणाऱ्या मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेमार्गाच्या बांधकामाला २०१७ पासून प्रारंभ होईल

नवी दिल्ली : भारत आणि जपान यांच्या सहकार्याने तयार होणाऱ्या मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेमार्गाच्या बांधकामाला २०१७ पासून प्रारंभ होईल आणि २०२३ च्या प्रारंभी देशाची पहिली बुलेट ट्रेन धावताना दिसण्याची शक्यता आहे. या रेल्वेचा कमाल वेग ताशी ३५० कि. मी. असेल.जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांच्या भारत दौऱ्यात उभय देशांमध्ये झालेल्या करारानुसार या ५०८ कि. मी. लांबीचा हायस्पीड रेल्वेमार्ग, स्थानके आणि अन्य सुविधांचे निर्माणकार्य पाच वर्षांत पूर्ण केले जाईल. त्याशिवाय एक ते दीड वर्षे पूर्वतयारीसाठी लागतील, असे रेल्वे मंडळाच्या सूत्रांनी सांगितले.करारानुसार मुंबईच्या बांद्रा-कुर्ला संकुलात रेल्वेस्थानक बनविले जाईल. ही बुलेट ट्रेन या स्थानकावरून भुयारी मार्गाने महानगराबाहेर निघेल आणि काही उंचीवर बांधलेल्या रेल्वेमार्गाने धावत अहमदाबाद येथे पोहोचेल. तेथे अहमदाबाद हेच मुख्य स्थानक असेल, जेथे प्रवाशांना पुढच्या प्रवासासाठी दुसऱ्या रेल्वेगाड्या पकडता येतील. साबरमती येथे गाडीचे यार्ड तयार केले जाईल आणि रेल्वेमार्ग शहरी भागांतील पुलांवरून जाईल.प्रारंभी जपानहून १० ते १२ रँक मागविण्यात येतील आणि नंतर मेक इन इंडियांतर्गत त्यांची संख्या वाढविण्यात येईल. प्रारंभी हे रँक १० डब्यांचे असतील आणि त्यात ७५० प्रवासी बसू शकतील. त्यानंतर १६ डब्यांचे रँक चालविण्यात येतील. हे रँक मेट्रोच्या धर्तीवर इलेक्ट्रिक मल्टिपल युनिटसारखेच असतील आणि ते अवघ्या काही सेकंदातच पूर्ण वेग पकडतील. या रेल्वेमार्गाचा किमान २७ कि.मी.चा भाग सुरुंगाचा, १२२ कि.मी.चा भाग पुलांचा आणि उर्वरित भाग जमिनीवर राहील. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सुरत, भडोच, बडोदा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती अशी एकूण १२ रेल्वेस्थानके असतील.