शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

नावे वगळलेल्या मतदारांसाठी पुन्हा खास संधी

By admin | Updated: July 6, 2014 01:47 IST

गेल्या दोन वर्षात मतदारयाद्यांमध्ये सुधारणा करताना मुंबईसह महाराष्ट्रातील सुमारे 3क् लाख मतदारांची नावे मतदारयाद्यांमधून ‘चुकीने’ वगळली गेल्याची कबुली निवडणूक आयोगाने प्रथम दिली

नवी दिल्ली: गेल्या दोन वर्षात मतदारयाद्यांमध्ये सुधारणा करताना मुंबईसह महाराष्ट्रातील सुमारे 3क् लाख मतदारांची नावे मतदारयाद्यांमधून ‘चुकीने’ वगळली गेल्याची कबुली निवडणूक आयोगाने प्रथम दिली असून या चुकीचे परिमाजर्न करण्यासाठी वगळल्या गेलेल्या या मतदारांना नावनोंदणीची खास संधी देण्याचे आयोगाने ठरविले आहे.
याद्यांमधून नावे गहाळ झालेल्या या मतदारांमध्ये सुमारे 14 लाख मतदार एकच्या मुंबईतील असल्याचे निवडणूक आयोगाचे म्हणणो आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुंबई, पुण्यात मतदारांची नावे याद्यांमधून मोठय़ा प्रमाणावर वगळली गेल्याचे स्पष्ट झाले होते व ओळखपत्र असूनही त्यांना मतदान न करता आल्याने मोठा गोंधळ उडाला होता.
पावसाळ्य़ानंतर होणा:या राज्य विधानसभा निवडणुकीच्या वेळी पुन्हा असा गोंधळ होऊ नये यासाठी उपाय योजण्याचे आयोगाने त्यावेळी सांगितले होते. त्यानुसार 9 ते 3क् जून दरम्यान मतदार नोंदणीची विशेष मोहीम हाती घेण्यात आली. मात्र ही मोहीम सर्वसाधारण स्वरूपाची होती व ज्यांची नावे आधी यादीत होती व नंतर वगळली गेली अशा मतदारांसाठी त्यात विशेष भर नव्हता. मात्र आता यादीतून वगळल्या गेलेल्या या मतदारांची नावे
 नोंदवून घेण्यासाठी निवडणूक आयोग विशेष प्रयत्न करणार असून त्यासाठी पूर्वी कधीही अनुसरला नाही, असा मार्ग आयोग स्वीकारणार आहे.
आयोगाच्या सूत्रंनुसार 
नावे वगळलेल्या या 3क् लाख मतदारांना आयोगाकडून व्यक्तिगत 
पत्रे पाठविली जाणार आहेत. या पत्रमध्ये नाव नोंदवून घेण्याचे आवाहन केलेले असेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
पूर्वीच्या पत्त्यावर पत्र
वगळल्या गेलेल्या मतदारांचे आधी जेव्हा यादीत नाव होते त्यावेळी नोंदलेल्या पत्यावर आयोग ही पत्रे पाठविणार आहे. जे मतदार अजूनही पूर्वीच्या त्याच पत्त्यावर राहात असतील त्यांना ही पत्रे मिळतील. ज्यांनी दरम्यानच्या काळात वास्तव्याचे ठिकाण बदलले असेल त्यांना ही पत्रे मिळणार नाहीत व याद्यांमध्ये सुधारणा करताना अशा मतदाराचे नाव योग्यपणो वगळले गेले होते, असे मानले जाईल, असेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले.
 
च्नावे वगळल्या मतदारांसाठी आयोगाकडून असा उपक्रम आयोगाकडून प्रथम राबविला जात आहे. जास्तीत जास्त मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे यासाठी प्रोत्साहन देण्याच्या आयोगाच्या कटिबद्धतेशी हे सुसंगतच आहे, असे  निवडणूक आयोगाचे  महासंचालक अक्षय राऊत यांनी दिली.