शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

नावे वगळलेल्या मतदारांसाठी पुन्हा खास संधी

By admin | Updated: July 6, 2014 01:47 IST

गेल्या दोन वर्षात मतदारयाद्यांमध्ये सुधारणा करताना मुंबईसह महाराष्ट्रातील सुमारे 3क् लाख मतदारांची नावे मतदारयाद्यांमधून ‘चुकीने’ वगळली गेल्याची कबुली निवडणूक आयोगाने प्रथम दिली

नवी दिल्ली: गेल्या दोन वर्षात मतदारयाद्यांमध्ये सुधारणा करताना मुंबईसह महाराष्ट्रातील सुमारे 3क् लाख मतदारांची नावे मतदारयाद्यांमधून ‘चुकीने’ वगळली गेल्याची कबुली निवडणूक आयोगाने प्रथम दिली असून या चुकीचे परिमाजर्न करण्यासाठी वगळल्या गेलेल्या या मतदारांना नावनोंदणीची खास संधी देण्याचे आयोगाने ठरविले आहे.
याद्यांमधून नावे गहाळ झालेल्या या मतदारांमध्ये सुमारे 14 लाख मतदार एकच्या मुंबईतील असल्याचे निवडणूक आयोगाचे म्हणणो आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुंबई, पुण्यात मतदारांची नावे याद्यांमधून मोठय़ा प्रमाणावर वगळली गेल्याचे स्पष्ट झाले होते व ओळखपत्र असूनही त्यांना मतदान न करता आल्याने मोठा गोंधळ उडाला होता.
पावसाळ्य़ानंतर होणा:या राज्य विधानसभा निवडणुकीच्या वेळी पुन्हा असा गोंधळ होऊ नये यासाठी उपाय योजण्याचे आयोगाने त्यावेळी सांगितले होते. त्यानुसार 9 ते 3क् जून दरम्यान मतदार नोंदणीची विशेष मोहीम हाती घेण्यात आली. मात्र ही मोहीम सर्वसाधारण स्वरूपाची होती व ज्यांची नावे आधी यादीत होती व नंतर वगळली गेली अशा मतदारांसाठी त्यात विशेष भर नव्हता. मात्र आता यादीतून वगळल्या गेलेल्या या मतदारांची नावे
 नोंदवून घेण्यासाठी निवडणूक आयोग विशेष प्रयत्न करणार असून त्यासाठी पूर्वी कधीही अनुसरला नाही, असा मार्ग आयोग स्वीकारणार आहे.
आयोगाच्या सूत्रंनुसार 
नावे वगळलेल्या या 3क् लाख मतदारांना आयोगाकडून व्यक्तिगत 
पत्रे पाठविली जाणार आहेत. या पत्रमध्ये नाव नोंदवून घेण्याचे आवाहन केलेले असेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
पूर्वीच्या पत्त्यावर पत्र
वगळल्या गेलेल्या मतदारांचे आधी जेव्हा यादीत नाव होते त्यावेळी नोंदलेल्या पत्यावर आयोग ही पत्रे पाठविणार आहे. जे मतदार अजूनही पूर्वीच्या त्याच पत्त्यावर राहात असतील त्यांना ही पत्रे मिळतील. ज्यांनी दरम्यानच्या काळात वास्तव्याचे ठिकाण बदलले असेल त्यांना ही पत्रे मिळणार नाहीत व याद्यांमध्ये सुधारणा करताना अशा मतदाराचे नाव योग्यपणो वगळले गेले होते, असे मानले जाईल, असेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले.
 
च्नावे वगळल्या मतदारांसाठी आयोगाकडून असा उपक्रम आयोगाकडून प्रथम राबविला जात आहे. जास्तीत जास्त मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे यासाठी प्रोत्साहन देण्याच्या आयोगाच्या कटिबद्धतेशी हे सुसंगतच आहे, असे  निवडणूक आयोगाचे  महासंचालक अक्षय राऊत यांनी दिली.