शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

चीनचा सामना करण्यासाठी भारत तयार करतोय खास मिसाईल

By admin | Updated: July 13, 2017 13:20 IST

भारत एक अशी मिसाईल तयार करत आहे, ज्यामुळे दक्षिण भारतातून चीनवर हल्ला करण्यास मदत मिळेल

ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 13 -  भारताचं संपुर्ण लक्ष चीनकडे असून त्यादृष्टीनेच आण्विक शस्त्राचं आधुनिकीकरण केलं जात असून आपल्या आण्विक धोरणातही बदल केले जात आहेत. याआधी भारताचं लक्ष पाकिस्तानकडे असायचं, जे चीनकडे वळलं आहे असा दावा अमेरिकेच्या दोन प्रसिद्ध आण्विक तज्ञांनी केला आहे. ऑनलाइन मॅगजीन "आफ्टर मिडनाईट"च्या जुलै-ऑगस्टच्या अंकात यासंबंधी लेख छापण्यात आला आहे. भारत एक अशी मिसाईल तयार करत आहे, ज्यामुळे दक्षिण भारतातून चीनवर हल्ला करण्यास मदत मिळेल असाही दावा या लेखात करण्यात आला आहे. 
 
आणखी वाचा
 
"इंडियन न्युक्लिअर फोर्स 2017" शिर्षकाखाली लिहिण्यात आलेल्या आपल्या लेखात हॅन्स एम क्रिस्टिन्स आणि रॉबर्ट एक नॉरिस यांनी सांगितलं आहे की, "अंदाजानुसार भारताकडे जवळपास 150 ते 200 न्यूक्लिअर वॉरहेड तयार करण्यासाठी पुरेशा प्रमाणात प्लूटोनिअम उपलब्ध आहे. मात्र त्यांनी फक्त 120 ते 130 वॉरहेड तयार केले आहेत. दोन्ही तज्ञांनी दावा केला आहे की, नेहमी पाकिस्तानला लक्षात ठेवून तयार करण्यात येणारं भारताचं आण्विक धोरण आता चीनवर जास्त जोर देत आहे". 
 
भारताने जवळपास 600 किलो प्लूटोनिअमची निर्मिती केली असून 150 ते 200 वॉरहेड तयार करण्यासाठी ते पुरेसं आहे. मात्र अद्यापपर्यंत सर्व प्लूटोनिअमचा वापर करण्यात आला नसल्याचंही लेखात सांगितलं आहे.
 
लेखात सांगण्यात आलं आहे की, आण्विक शस्त्र विकसित करण्यामागचा भारताचा मुख्य उद्देश म्हणजे पाकिस्तानपासून आपलं रक्षण करणं आहे. मात्र आता ज्याप्रकारे आण्विक शस्त्रांचं आधुनिकीकरण केलं जात आहे ते पाहता भारत भविष्यात चीनला लक्षात ठेवून वाटचाल करत आहे. तज्ञांनी दर्शवलेल्या अंदाजानुसार, भारताजवळ सात आण्विक शस्त्र उपलब्ध आहेत. यामधील विमानातून चालवली जाणारी दोन,  जमिनीवरुन मारा करणारी चार तर समुद्रातून चालवली जाणारी एक बॅलिस्टीक मिसाईल आहे. 
 
लेखात सांगण्यात आलं आहे की, किमान अजून चार प्रणालींवर काम केलं जात असून, वेगाने त्यांचं आधुनिकीकरण केलं जात आहे. लवकरच ही क्षेणणास्त्र भारत तैनात करेल असंही सांगण्यात आलं आहे.