शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा प्रकल्पावरून प्रशासन धारेवर मनपा : गाळे करारासाठी होणार विशेष महासभा; आयुक्तांच्या उपस्थितीतच बैठक घेण्याची सूचना

By admin | Updated: December 9, 2015 23:56 IST

जळगाव : मनपाने बीओटी तत्त्वावर दिलेला घनकचरा प्रकल्प दोन वर्षांपासून बंदच असून तो सुरू करण्यासाठी काय प्रयत्न केले असा जाब विचारत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. अखेर उपायुक्तांनी प्रकल्प ताब्यात घेण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन सभागृहाला दिले.

जळगाव : मनपाने बीओटी तत्त्वावर दिलेला घनकचरा प्रकल्प दोन वर्षांपासून बंदच असून तो सुरू करण्यासाठी काय प्रयत्न केले असा जाब विचारत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. अखेर उपायुक्तांनी प्रकल्प ताब्यात घेण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन सभागृहाला दिले.
आरोग्य विभागासाठी १४व्या वित्त आयोगांतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी वाहने घेण्याचा प्रस्ताव महासभेत प्रशासनाने सादर केला. तो मंजूर करण्यात आला. त्यावरील चर्चेत भाजपाचे गटनेते डॉ.अश्वीन सोनवणे यांनी घनकचरा प्रकल्प २ वर्षांपासून बंद पडला आहे. प्रकल्पाच्या जागेवर कचर्‍याचे मोठे ढीग साचले आहेत. प्रकल्प सुरू करण्याबाबत काय कार्यवाही केली? अशी विचारणा केली. आरोग्याधिकारी उदय पाटील यांनी सांगितले की प्रकल्प बंद केल्याने मक्तेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच अंतिम नोटीस बजावण्यात आली. प्रकल्प पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. लवादक नेमण्याबाबत पत्र दिले आहे.
त्यावर डॉ.सोनवणे यांनी प्रकल्प ताब्यात का घेतला नाही? दरवेळी तेच ते सांगतात. भविष्यात प्रकल्प सुरू करावयाचा तर सगळी मशिनरी चोरीस गेली आहे.
त्यावर उपायुक्तांनी प्रकल्पाची बाब न्यायालयात गेल्यास लवादक नेमण्यास अडचण येईल. म्हणून प्रशासन लवाद नेमण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. त्यावर ल‹ा यांनी प्रकल्प २ वर्षांपासून बंद असताना लवादक नेमण्यासाठी काय कारवाई केली? आयुक्त स्वत: जर लवादक आहेत. तर तातडीने निर्णय घेऊन प्रकल्प ताब्यात का घेतला नाही? त्यावर उपायुक्तांनी विधी विभागाचा अभिप्राय घेऊन प्रकल्प तत्काळ सुरू करण्यात येईल, असे सांगितले.
विधी विभागाचा अभिप्राय कशाला?
मनपाने विधी सल्लागारांची नियुक्ती केली आहे. मात्र त्याचा उपयोग विषय लांबणीवर टाकण्यासाठी केला जात आहे. प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीत विधी विभागाचा अभिप्राय मागितला जात आहे. सफाई मक्त्याचा ठराव झाला. त्यावरही विधी विभागाचे मत मागविण्याची काय आवश्यकता होती? आज २ वर्षांपासून घनकचरा प्रकल्प बंद असताना दोन वर्षात विधी विभागाचा सल्ला का मागितला गेला नाही? असा सवाल केला. मनपा आयुक्तच लवादक असल्याची तरतूद असल्याने मनपा एकतर्फी निकाल देऊन प्रकल्प ताब्यात का घेत नाही? त्यावर मक्तेदाराला आक्षेप असेल तर न्यायालयात जाईल. प्रकल्प तातडीने ताब्यात घेऊन बीओटी तत्वावर देण्याची कार्यवाही करा, असे बजावले. अखेर उपायुक्तांनी प्रकल्प तातडीने सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन सभागृहात दिले.