शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

संविधान चर्चेत ठिणग्या

By admin | Updated: November 27, 2015 03:31 IST

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भारतीय संविधानाप्रति प्रतिबद्धता व्यक्त करण्यासाठी झालेल्या विशेष चर्चेलाही राजकीय रंग चढले आणि सत्ताधारी व विरोधकांच्या मनात जोरदार ठिणग्या उडाल्या.

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भारतीय संविधानाप्रति प्रतिबद्धता व्यक्त करण्यासाठी झालेल्या विशेष चर्चेलाही राजकीय रंग चढले आणि सत्ताधारी व विरोधकांच्या मनात खदखदणाऱ्या असंतोषाच्या जोरदार ठिणग्या उडाल्या. भाजपा-काँग्रेसदरम्यान शाब्दिक चकमकी, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. चर्चेला सुरुवात करताना गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केलेल्या भाषणाला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अतिशय संयत स्वरात मुद्देसूद पण सडेतोड उत्तर दिले. ‘राज्यघटनेच्या निर्मितीत ज्यांचे योगदान नाही, घटनेविषयी ज्यांना आस्था नाही तेच लोक त्याच्या वचनबद्धतेची चर्चा करीत त्याचे अग्रणीही बनू पाहत आहेत. यापेक्षा मोठा विनोद कोणता’ असा सवालही सोनियांनी केला. सेक्युलर शब्दावर हल्ला चढवीत राजनाथसिंहांनी भाषणात डॉ. आंबेडकरांचे गुणगान केले; मात्र राज्यघटनेच्या निर्मितीत स्वातंत्र्य चळवळीचे व पंडित नेहरूंचे योगदान जणू नाममात्रच होते, असे काही ओझरते उल्लेख केले. त्यावर काँग्रेसजनांचा संताप होणे स्वाभाविकच होते.‘सेक्युलर’चा दुरुपयोगराजकारणात सेक्युलर शब्दाचा सर्वाधिक दुरुपयोग झाला आहे. त्याचा हिंदी अर्थ धर्मनिरपेक्ष नसून पंथनिरपेक्ष आहे. राजकारणातून धर्मनिरपेक्ष हा शब्दच हद्दपार झाला पाहिजे. आमीरचे नाव न घेता आंबेडकरांचे स्मरण करीत राजनाथसिंह म्हणाले, बाबासाहेबांना आयुष्यात तिरस्कार आणि अपमान सहन करावा लागला, मात्र त्यांनी देश सोडून जाण्याची भाषा केली नाही. त्याानंतर सहिष्णुतेच्या मुद्द्यावरही खडाजंगी होणे क्रमप्राप्तच होते.घटनेतील मूल्यांवर राजरोस हल्लेराजनाथसिंह यांच्या विश्लेषणाचा समाचार घेताना सोनिया म्हणाल्या, आजचा दिवस आनंदाचा, तितकाच दु:खाचाही. राज्यघटनेच्या ज्या आदर्शांनी, परंपरांनी आणि सिद्धान्तांनी भारतीय लोकशाहीला वर्षानुवर्षे प्रेरणा दिली त्यावर आज धोक्याची काळी छाया आहे. राज्यघटनेच्या आदर्शांवर राजरोस हल्ले चढवले जात आहेत. काही महिन्यांत आपण सर्वांनी जे पाहिले, जे अनुभवले, ते राज्यघटनेच्या मूळ भावनेच्याच विरोधात आहे. भारतीय राज्यघटनेची निर्मिती हा अनेक दशकांच्या संघर्षाचा इतिहास आहे. या संघर्षाचे नेतृत्व केले होते महात्मा गांधींनी. स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेच्या निर्मितीला ३ वर्षे लागली. प्रारूप तयार केले डॉ. आंबेडकरांच्या समितीने. तथापि इतिहासाची पाने चाळली तर लक्षात येईल की नेहरू, पटेल, डॉ. राजेंद्रप्रसाद, आझादांसह घटना समितीतल्या मान्यवरांच्या विचारांची छाप या दस्तऐवजांवर आहे. यात काँग्रेसचा इतिहास आपोआपच जोडला गेला आहे.