शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

'ते' गांधीजींना हटवून RSSला देशाचं प्रतीक बनवू पाहतायत- सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 13:33 IST

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

नवी दिल्लीः काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी महात्मा गांधींवर स्तुतिसुमनं उधळत त्यांनी भाजपा सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. आज सर्वांसाठीच एक ऐतिहासिक दिवस आहे. 150 वर्षांपूर्वी महात्मा गांधींसारख्या महापुरुषाचा या धरतीवर जन्म झाला. गांधीजींचं नाव घेणं सोपं आहे, पण त्यांच्या मार्गवरून चालणं अवघड असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.मागील पाच वर्षांत जे झालं ते आता पाहिलं असतं तर बापूसुद्धा दुःखी झाले असते, देशासमोर बेरोजगारीचं संकट दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे, महिलादेखील देशात सुरक्षित नाहीत. गेल्या काही वर्षांपासून साम-दाम-दंड-भेदचा वापर करून ते स्वतःला फार ताकदवान समजतात. स्वतःच्या सत्तेच्या नशेत धुंद असलेल्यांना गांधीजींच्या निस्वार्थी सेवेचं मूल्य काय समजणार आहे. नव्या भारताच्या निर्मितीसाठी नेहरू, शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंह राव यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. सोनिया गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही जोरदार हल्लाबोल केला आहे. काही जण महात्मा गांधींच्या ऐवजी RSSला देशाचं प्रतीक बनवू पाहत आहेत. परंतु हे शक्य नाही.आमच्या देशाचा पाया गांधीजींच्या विचारावर ठेवण्यात आला आहे. महात्मा गांधींच्या विचारांना छेद देऊन स्वतःच्या मार्गानं चालणारे याआधीही बरेच होऊन गेले. तरीही भारत कधीही भरकटला नाही. कारण आपला देशच गांधी विचारांच्या आधारवर उभा आहे. काही जण गांधी विचारांच्या विपरीत वागण्याचा प्रयत्न करत आहेत. जे लोक असत्याचा आधार घेऊनच राजकारण करत आलेत, त्यांना गांधीजी सत्याचे पुजारी होते हे कसं समजणार. ज्यांची सत्तेसाठी सर्वकाही करण्याची तयारी आहे, त्यांना गांधीजींच्या अहिंसेचं महत्त्व कसं काय कळणार आहे. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीMahatma Gandhiमहात्मा गांधी