शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'ते' गांधीजींना हटवून RSSला देशाचं प्रतीक बनवू पाहतायत- सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 13:33 IST

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

नवी दिल्लीः काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी महात्मा गांधींवर स्तुतिसुमनं उधळत त्यांनी भाजपा सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. आज सर्वांसाठीच एक ऐतिहासिक दिवस आहे. 150 वर्षांपूर्वी महात्मा गांधींसारख्या महापुरुषाचा या धरतीवर जन्म झाला. गांधीजींचं नाव घेणं सोपं आहे, पण त्यांच्या मार्गवरून चालणं अवघड असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.मागील पाच वर्षांत जे झालं ते आता पाहिलं असतं तर बापूसुद्धा दुःखी झाले असते, देशासमोर बेरोजगारीचं संकट दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे, महिलादेखील देशात सुरक्षित नाहीत. गेल्या काही वर्षांपासून साम-दाम-दंड-भेदचा वापर करून ते स्वतःला फार ताकदवान समजतात. स्वतःच्या सत्तेच्या नशेत धुंद असलेल्यांना गांधीजींच्या निस्वार्थी सेवेचं मूल्य काय समजणार आहे. नव्या भारताच्या निर्मितीसाठी नेहरू, शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंह राव यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. सोनिया गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही जोरदार हल्लाबोल केला आहे. काही जण महात्मा गांधींच्या ऐवजी RSSला देशाचं प्रतीक बनवू पाहत आहेत. परंतु हे शक्य नाही.आमच्या देशाचा पाया गांधीजींच्या विचारावर ठेवण्यात आला आहे. महात्मा गांधींच्या विचारांना छेद देऊन स्वतःच्या मार्गानं चालणारे याआधीही बरेच होऊन गेले. तरीही भारत कधीही भरकटला नाही. कारण आपला देशच गांधी विचारांच्या आधारवर उभा आहे. काही जण गांधी विचारांच्या विपरीत वागण्याचा प्रयत्न करत आहेत. जे लोक असत्याचा आधार घेऊनच राजकारण करत आलेत, त्यांना गांधीजी सत्याचे पुजारी होते हे कसं समजणार. ज्यांची सत्तेसाठी सर्वकाही करण्याची तयारी आहे, त्यांना गांधीजींच्या अहिंसेचं महत्त्व कसं काय कळणार आहे. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीMahatma Gandhiमहात्मा गांधी