शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कुणाला पैशाची तर कुणाला परिवाराची चिंता - मोदींचा घणाघात

By admin | Updated: January 2, 2017 17:39 IST

उत्तर प्रदेशमध्ये सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसून तयार झालेल्या भारतीय जनता पक्षाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत विराट सभेचे आयोजन करून शक्तिप्रदर्शन केले.

 ऑनलाइन लोकमत

लखनऊ, दि. 2 -   लाखोंच्या उपस्थितीत झालेल्या परिवर्तन सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस, बहुजन समाजावादी पक्ष आणि सपवर नाव न घेता घणाघाती टीका करत उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले. "उत्तर प्रदेशमध्ये वेगवेगळे पक्ष आपापले स्वार्थ साधण्यात गुंतले आहेत,  राज्यात नाममात्र उरलेला पक्ष आपल्या नेत्यासाठी राजकीय जमीन तयार करण्यासाठी धडपडतो आहे. तर एक पक्ष पैसे कुठल्या बँकेत जमा करायचे या चिंतेत आहे. या बँकेतून त्या बँकेत त्यांची पळपळ सुरू आहे, तर आणखी एक पक्ष आपले तुटणारे कुटुंब कसे वाचवाचये या चिंतेत आहे." अशा शब्दात मोदींनी काँग्रेस, बसप, सपवर टीका केली.  
यावेळी उत्तर प्रदेशमध्ये सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसून तयार झालेल्या भारतीय जनता पक्षाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत विराट सभेचे आयोजन करून शक्तिप्रदर्शन केले. यावेळी मोदींनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री यांच्या आठवणीने सभेला सुरुवात केली. 
कुटुंबकलहाने ग्रासलेला समाजवादी पक्ष, उत्तर प्रदेशच्या सत्तेत पुनरागमन करण्यासाठी मोर्चेबांधणी करत असलेला बसप आणि आपल्या अस्तित्वाची लढाई लढत असलेल्या काँग्रेसला मोदींनी आपल्या खास शैलीत लक्ष्य केले. "सप आणि बसपचे कुठल्याही गोष्टीवर एकमत होत नाही, पण  मोदींना हटवण्यावर त्यांचे एकमत आहे.  मी काळेधन हटवा, काळा पैसा हटवा, असे सांगत आहे, तर माझे विरोधक म्हणताहेत की मोदींनाच हटवा. देशाला संबोधित करताना योजनांची घोषणा केली, तेव्हाही काही लोकांना अडचण झाली. मोदीने पैसे घेतले तरी यांना त्रास आणि दिले तरीही यांना त्रास होतो." अशी टीका मोदींनी केली. 
यावेळी सध्या कौटुंबिक वादात अडकलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावरही मोदींनी टीका केली. "केंद्र सरकारकडून पूर्ण सहकार्य मिळाल्यानंतरही उत्तर प्रदेश सरकारला शेतकऱ्यांकडून धान्यखरेदीला वेळ मिळत नाही. हे योग्य नाही.  उत्तर प्रदेशची स्थिती बदलण्यासाठी राज्यात सत्तपरिवर्तन आवश्यक आहे,"  असे मोदी म्हणाले.  तसेच मला कुण्या हायकमांडच्या घरी जावे लागत नाही,  देशातील सव्वाशे कोटी जनताच माझी हायकमांड आहे, असा टोलाही मोदींनी लागवला.
"उत्तर प्रदेशमध्ये भाजप गेल्या 14 वर्षांपासून सत्तेबाहेर आहे, पण भाजपचा हा वनवास राज्याच्या विकासाचा वनवास ठरला आहे. जनतेकडून उत्तर प्रदेशमधील भाजपाच्या सरकारांची, आताच्या सरकारांशी तुलना  होते. देशाचा विकास व्हावा. देशातून गरिबी मिटावी, ही आमची इच्छा. मात्र जोपर्यंत उत्तर प्रदेशचा विकास होत नाही तोपर्यंत हे शक्य होणार नाही. देशाचा विकास होण्यासाठी उत्तर प्रदेशचा विकास होणे आवश्यक आहे," असे मोदीनी सांगितले.  मात्र सत्तापरिवर्तन करताना अल्पमतातील सरकार बनवू नका तर  पूर्ण बहुमताने भाजपच्या हाती सत्ता द्या असे आवाहनही त्यांनी केले. 
 
 Hindustan ka bhagya badalne ke liye pehli shart hai ki humein Uttar Pradesh ka bhaagya badalna padega: PM Modi pic.twitter.com/1KfgUQO3FN