शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

कुणाला पैशाची तर कुणाला परिवाराची चिंता - मोदींचा घणाघात

By admin | Updated: January 2, 2017 17:39 IST

उत्तर प्रदेशमध्ये सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसून तयार झालेल्या भारतीय जनता पक्षाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत विराट सभेचे आयोजन करून शक्तिप्रदर्शन केले.

 ऑनलाइन लोकमत

लखनऊ, दि. 2 -   लाखोंच्या उपस्थितीत झालेल्या परिवर्तन सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस, बहुजन समाजावादी पक्ष आणि सपवर नाव न घेता घणाघाती टीका करत उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले. "उत्तर प्रदेशमध्ये वेगवेगळे पक्ष आपापले स्वार्थ साधण्यात गुंतले आहेत,  राज्यात नाममात्र उरलेला पक्ष आपल्या नेत्यासाठी राजकीय जमीन तयार करण्यासाठी धडपडतो आहे. तर एक पक्ष पैसे कुठल्या बँकेत जमा करायचे या चिंतेत आहे. या बँकेतून त्या बँकेत त्यांची पळपळ सुरू आहे, तर आणखी एक पक्ष आपले तुटणारे कुटुंब कसे वाचवाचये या चिंतेत आहे." अशा शब्दात मोदींनी काँग्रेस, बसप, सपवर टीका केली.  
यावेळी उत्तर प्रदेशमध्ये सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसून तयार झालेल्या भारतीय जनता पक्षाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत विराट सभेचे आयोजन करून शक्तिप्रदर्शन केले. यावेळी मोदींनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री यांच्या आठवणीने सभेला सुरुवात केली. 
कुटुंबकलहाने ग्रासलेला समाजवादी पक्ष, उत्तर प्रदेशच्या सत्तेत पुनरागमन करण्यासाठी मोर्चेबांधणी करत असलेला बसप आणि आपल्या अस्तित्वाची लढाई लढत असलेल्या काँग्रेसला मोदींनी आपल्या खास शैलीत लक्ष्य केले. "सप आणि बसपचे कुठल्याही गोष्टीवर एकमत होत नाही, पण  मोदींना हटवण्यावर त्यांचे एकमत आहे.  मी काळेधन हटवा, काळा पैसा हटवा, असे सांगत आहे, तर माझे विरोधक म्हणताहेत की मोदींनाच हटवा. देशाला संबोधित करताना योजनांची घोषणा केली, तेव्हाही काही लोकांना अडचण झाली. मोदीने पैसे घेतले तरी यांना त्रास आणि दिले तरीही यांना त्रास होतो." अशी टीका मोदींनी केली. 
यावेळी सध्या कौटुंबिक वादात अडकलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावरही मोदींनी टीका केली. "केंद्र सरकारकडून पूर्ण सहकार्य मिळाल्यानंतरही उत्तर प्रदेश सरकारला शेतकऱ्यांकडून धान्यखरेदीला वेळ मिळत नाही. हे योग्य नाही.  उत्तर प्रदेशची स्थिती बदलण्यासाठी राज्यात सत्तपरिवर्तन आवश्यक आहे,"  असे मोदी म्हणाले.  तसेच मला कुण्या हायकमांडच्या घरी जावे लागत नाही,  देशातील सव्वाशे कोटी जनताच माझी हायकमांड आहे, असा टोलाही मोदींनी लागवला.
"उत्तर प्रदेशमध्ये भाजप गेल्या 14 वर्षांपासून सत्तेबाहेर आहे, पण भाजपचा हा वनवास राज्याच्या विकासाचा वनवास ठरला आहे. जनतेकडून उत्तर प्रदेशमधील भाजपाच्या सरकारांची, आताच्या सरकारांशी तुलना  होते. देशाचा विकास व्हावा. देशातून गरिबी मिटावी, ही आमची इच्छा. मात्र जोपर्यंत उत्तर प्रदेशचा विकास होत नाही तोपर्यंत हे शक्य होणार नाही. देशाचा विकास होण्यासाठी उत्तर प्रदेशचा विकास होणे आवश्यक आहे," असे मोदीनी सांगितले.  मात्र सत्तापरिवर्तन करताना अल्पमतातील सरकार बनवू नका तर  पूर्ण बहुमताने भाजपच्या हाती सत्ता द्या असे आवाहनही त्यांनी केले. 
 
 Hindustan ka bhagya badalne ke liye pehli shart hai ki humein Uttar Pradesh ka bhaagya badalna padega: PM Modi pic.twitter.com/1KfgUQO3FN