शहरं
Join us  
Trending Stories
1
Smriti Mandhana : "आता पुढे जाण्याची वेळ आलीय, मला हे प्रकरण..."; स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं!
2
नाईट क्लबमध्ये बेली डान्स सुरु होता, वरून आगीचे गोळे पडू लागले...; आग सिलिंडरने नाही तर... गोव्याचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर...
3
फक्त १२% नव्हे! EPFO मध्ये 'या' नियमानुसार जमा करता येतात जास्तीचे पैसे; निवृत्तीनंतर मिळेल मोठा फंड
4
गोवा आग प्रकरणात मोठी कारवाई; क्लबच्या मालकाला अटक, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
5
गोव्यातील क्लब दुर्घटनेनंतर मोठा प्रश्न! गॅस स्फोटात विम्याचे नियम काय? 'या' चुकीमुळे ५० लाखांचे कवच गमावले!
6
आनंदाची बातमी! ऑफिस आवर्सनंतर बॉस फोन करून त्रास देऊ शकणार नाही; लेबर कोडनंतर संसदेत मोठी तयारी...
7
इलॉन मस्कची 'SpaceX' रचणार इतिहास! कंपनीचे मूल्य ७२ लाख कोटींवर पोहोचणार? OpenAI चा रेकॉर्ड मोडणार
8
Video: यशस्वीने विराटला केक भरवला, रोहितकडे येताच हिटमॅन म्हणाला- 'नको रे, परत जाड होईल...'
9
इंडिगोच्या घोळाचा आमदारांनांही फटका, नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या अनेक आमदारांची तिकिटं रद्द
10
IND vs SA : टॉस जिंकला नसता तर... विराट-अर्शदीपचा 'सेंच्युरी पे सेंच्युरी' व्हिडिओ व्हायरल
11
अरे व्वा! WhatsApp Call रेकॉर्डिंगसाठी थर्ड-पार्टी Appची गरज नाही! फक्त एक सेटिंग बदला
12
मेट्रोनं प्रवास करणाऱ्या भारतीय युवकाचं एका व्हायरल फोटोनं आयुष्य पालटलं; जाणून घ्या सत्य काय?
13
हायव्होल्टेज ड्रामा! "मी तिच्यासोबत नवरा बनून राहीन"; ३ मुलांच्या आईच्या प्रेमात वेडी झाली तरुणी
14
Video: उद्योगपतीच्या मुलीच्या लग्नात ३ खासदारांचा स्टेजवर डान्स; 'ओम शांती ओम' गाण्यावर थिरकले
15
Goa Night Club Fire: म्युझिक, डान्स फ्लोअरवर १०० जण आणि...आग लागली तेव्हा काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने दिली धक्कादायक माहिती
16
संधी गमावू नका! PNB च्या या खास एफडीमध्ये फक्त १ लाख जमा करा, मिळेल २३,८७२ रुपयांपर्यंत निश्चित व्याज
17
अग्नितांडव! २५ जणांचा जीव घेणारा क्लब 'असा' होता; आत-बाहेर येण्यासाठी एकमेव लाकडी पूल अन्...
18
कमाल! AI ने वाचवला व्यक्तीचा जीव; डॉक्टरांनी घरी पाठवलं, पण Grok ने ओळखला जीवघेणा आजार
19
अलास्का-कॅनडा सीमेवर ७.० तीव्रतेचा भूकंप; धक्क्याने हादरली अमेरिका
20
सुमारे १५७३ लोकांनी 'वेट लॉस इंजेक्शन' बंद केले, वजन पुन्हा वाढू लागले? संशोधनात धक्कादायक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

काही शक्ती देशात अस्थिरता निर्माण करण्याच्या प्रयत्नात - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 11:08 IST

देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एकतानगर येथे असलेल्या पटेल पुतळ्याच्या (स्टॅच्यू ऑफ युनिटी) ठिकाणी पंतप्रधान मोदी यांनी भेट दिली व पटेल यांना आदरांजली अर्पण केली.

एकतानगर : देश व विदेशातील काही शक्ती या भारतामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा, तसेच साऱ्या जगात देशाची प्रतिमा नकारात्मक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा शहरी नक्षलवाद्यांची ओळख पटवून त्यांना उघडे पाडा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जनतेला केले. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एकतानगर येथे असलेल्या पटेल पुतळ्याच्या (स्टॅच्यू ऑफ युनिटी) ठिकाणी पंतप्रधान मोदी यांनी भेट दिली व पटेल यांना आदरांजली अर्पण केली.

याप्रसंगी मोदी म्हणाले की, भारताच्या वाढत्या सामर्थ्यामुळे देश व विदेशातील काही शक्ती आपल्या देशाच्या आर्थिक हिताला बाधा आणू इच्छितात. जगभरातील गुंतवणूकदारांच्या मनात भारताबद्दल नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा या लोकांचा प्रयत्न आहे. चुकीच्या माहितीच्या आधारे काही लोक लष्करावर टीका करतात, तसेच लष्करामध्ये फुटीरतेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न आहेत. (वृत्तसंस्था)

‘काही जणांचे दुही माजविण्याचे काम’ नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, काही लोक नेहमी लोकशाही, राज्यघटनेबद्दल बोलत असतात व प्रत्यक्षात ते देशात दुही माजविण्याचे काम करतात. या शहरी नक्षलवाद्यांची कारस्थाने जनतेने वेळीच ओळखावीत. नक्षलवाद संपवत आणला आहे. आता शहरी नक्षलवाद डोके वर काढत आहे. त्यांच्या विरोधात लढा देणे आवश्यक आहे. गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे देशातील नक्षलवादी चळवळ आता अखेरचा श्वास घेत आहे. पटेल यांची १५०वी जयंती देश दोन वर्षे साजरी करणार आहे, असेही माेदी म्हणाले.

‘योजनांमध्ये ऐक्याचा विचार’पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आमच्या केंद्र सरकारने अमलात आणलेल्या योजनेमध्ये देशातील ऐक्याचा प्राधान्याने विचार केला आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान आवास योजना, जीएसटी आदी योजनांचा उल्लेख केला.  भारतीय राज्यघटनेच्या तरतुदी जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात अडथळे ठरणारे ३७० कलम आमच्या सरकारने रद्द केले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर तेथील मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच भारतीय राज्यघटनेला स्मरून आपल्या पदाची शपथ घेतली. ही मोठी घटना आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी