शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

विरोधकांच्या काही सुधारणा मान्य

By admin | Updated: March 9, 2015 23:39 IST

भूसंपादन सुधारित विधेयक शेतकरीविरोधी असून भांडवलवाद्यांच्या फायद्यासाठी शेतकरी आणि आदिवासींच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न झाल्यास देशात

नवी दिल्ली : भूसंपादन सुधारित विधेयक शेतकरीविरोधी असून भांडवलवाद्यांच्या फायद्यासाठी शेतकरी आणि आदिवासींच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न झाल्यास देशात नक्षलवादाची समस्या पुन्हा डोके वर काढेल, असा इशारा विरोधकांनी मोदी सरकारला दिला आहे. विरोधकांनी सुचविलेल्या काही सुधारणा विधेयकात स्वीकारल्या जातील, असे संसदीय कार्यमंत्री वेंकय्या नायडू यांनी लोकसभेत चर्चेत हस्तक्षेप करताना स्पष्ट केले.भूसंपादन, पुनर्वसन, पुनर्व्यवस्थापनात उचित प्रतिकार आणि पारदर्शकता अधिकार तसेच योग्य मोबदला (सुधारित) विधेयक २०१५ वरील वादळी चर्चेत हस्तक्षेप करताना नायडू म्हणाले की, विरोधकांकडून या विधेयकात एकूण ५२ सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत. सरकार त्यावर विचार करेल. चांगल्या सूचना विधेयकात समाविष्ट केल्या जातील.विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केवळ भांडवलवाद्यांना थेट लाभ पोहोचविण्याच्या मुख्य उद्देशातूनच हे विधेयक आणण्यात आल्याचा आरोप केला. त्याच वेळी रस्त्यावर उतरून संसदेपर्यंत आवाज उठविणार असल्याचा इशाराही दिला. चर्चेला सुरुवात करताना भाकपचे सी.एन. जयदेवन म्हणाले की, या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर सरकार गरिबांच्या जमिनी बळजबरीने हडपणार आहे. या विधेयकात अनेक त्रुटी असून सरकारच्या उद्देशाबाबत शंका निर्माण होते. सुधारित वटहुकूम आणण्यामागे सरकारने एवढी घाई का चालविली आहे, असा सवालही त्यांनी केला.मोदी सरकारने विकासाच्या राजकारणावरच भर दिला आहे. या सुधारित विधेयकामुळे संरक्षण, रेल्वे, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी जमीन उपलब्ध होऊ शकेल. पायाभूत संरचना व्यवस्थित करण्याला सरकारने प्राधान्य दिले आहे, असे भाजपचे कीर्ती आझाद यांनी स्पष्ट केले. ‘सबका साथ, सबका विकास’ हा नारा देणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्या शेतकऱ्यांच्या पोटावर लाथ मारण्याचा प्रयत्न चालविला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)