शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
6
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
7
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
8
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
9
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
10
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
11
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
12
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
13
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
14
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
15
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
16
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
17
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
18
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
19
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
20
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!

२०१६ विधानसभा निवडणूकतील काही लक्षवेधी घटना

By admin | Updated: May 19, 2016 16:24 IST

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी या पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील लक्षवेधी घटना...

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ -  पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी या पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला असून केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाने ईशान्य भारतातील महत्वाचे राज्य असलेल्या आसाममध्ये मुसंडी मारली असून तेथील काँग्रेसचे राज्य खालसा झाले आहे. तर पश्चिम बंगाल व तामिळनाडूमध्ये अपेक्षेप्रमाणेच ममता बॅनर्जी व जयललिता यांची सत्ता कायम राहिली आहे. 
( इथे पाहा २०१६ विधानसभा निवडणूक निकाल) 
 
या पाच राज्यांच्या निवडणूक निकालातील काही लक्षवेधी घटना : 
१) पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी या पाचही राज्यांत काँग्रेसची कामगिरी खालावली आहे. लोकसभा निवडणूक, महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीनंतर काँग्रेसला पराभवाचा आणखी एक मोठा धक्का बसला आहे. देशातील २९ पैकी फक्त सहा राज्यात सध्या काँग्रेस सत्तेत असून केरळ, आसाममधील सत्ताही काँग्रेसने गमावली आहे. 
 
२) केरळमध्ये राष्ट्रवादीचा दे धक्का : महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचा पक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केरळच्या राजकारणात चंचू प्रवेश केला आहे, कुट्टनाड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार थॉमस चांडी विजयी झाले, तर दुसरीकडे इलथूर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार ए के ससींद्रन यांनी जनता दल युनायटेडच्या (जेडीयू) किशन चंद यांचा  मतांनी पराभव केला.
 
३) देशभरात हळूहळू पण ठामपणे भारतीय जनता पक्षाचा विस्तार होत आहे. सध्या देशात भाजपा ९ राज्यांमध्ये सत्तेवर असून ४ राज्यांमध्ये भाजपा भागीदारीमध्ये सत्तेत आहे. 
 
४) स्थानिक नेतृत्व ठरले महत्वाचे : दिल्ली व बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवापासून भाजपाने धडा शिकला असून निवडणूक जिंकण्यासाठी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा पुरेसा नाही हे त्यांना उमजले आहे. स्थानिक निवडणूका याही अतिशय महत्वाच्या असून त्यासाठी खंबीर स्थानिक नेतृत्व व मुख्यमंत्रीपदाचा प्रबळ दावेदार असणंही तितकंच महत्वाचे असल्याचे भाजपाने हेरले आहे. आसाममध्ये सर्वानंद सोनोवाल यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करून, हे त्यातूनच आलेलं शहाणपण होतं आणि त्याचा निकाल सर्वांसमोर आहे. तब्बल १५ वर्षांनंतर काँग्रेसने आसाममधील सत्ता गमावली आहे. 
 
५) राजकारणाला वयाची मर्यादा नाही : भारतीय परंपरेनुसार ६० व्या वर्षानंतर लोकांनी सर्व मोहमायांचा त्याग करून वानप्रस्थाश्रमाचे आचरण केले पाहिजे, भारतीय राजकारणात मात्र हा नियम बिलकूल लागू होत नाही. सव्वाशे कोटी भारतीयांमधील निम्मी लोकसंख्या ही तरूणांची असतानाही भारतीय राजकारण अद्यापही वयोवृद्धांचीच चलती असल्याचे चित्र दिसत आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे केरळात पुन्हा सत्तेवर आलेला डाव्यांचा एलडीएफ आणि त्यांचे नेतृत्व करणारे व्ही. एस. अच्युतानंदन. ९३ वर्षी अच्युतानंदन यांनी आपल्या करिष्म्याचा जोरावर केरळमध्ये पुन्हा एकदा सत्ता मिळवली असून १४० सदस्यांच्या केरळ विधानसभेत डाव्यांना ८५ पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. 
 
७) श्रीसंतचा राजकारणातही नो-बॉल: क्रिकेटच्या मैदानात फिक्सिंगच्या आरोपामुळे दरवाजे बंद झाल्यानंतर राजकारणाच्या पीचवर भाजपकडून खेळायला उतरलेल्या श्रीशांत पहिल्याच निवडणुकीत बाद झाला. भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणा-या श्रीशांतचा काँग्रेस नेते व्ही.एस.शिवकुमार यांनी पराभव केला. 
 
८) गेल्या अनेक वर्षांपासून केरळ विधानसभेत प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करणा-या भाजपला ओ राजागोपाल यांच्या रुपाने पहिले यश मिळाले आहे. ओ राजागोपाल केरळच्या नेमॉम विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले.  
 
९) महाभारतातील द्रौपदीचा राजकारणात पराभव - पश्चिम बंगालमध्ये उत्तर हावडा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणा-या रुपा गांगुली यांचा पराभव झाला. क्रिकेटपटू लक्ष्मीरतन शुक्लाने त्यांचा पराभव केला. द्रौपदीच्या भूमिकेसाठी त्या ओळखल्या जातात.