शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

...म्हणून पंतप्रधान मोदींनी अर्ध्यात सोडले प्रेझेंटेशन

By admin | Updated: January 14, 2017 10:34 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या अधिका-यांच्या निष्काळजी वृत्तीमुळे निराश झाले आहेत.

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 14 - पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या अधिका-यांच्या निष्काळजी वृत्तीमुळे निराश झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिका-यांनी केलेल्या प्रेझेंटेशनवर असमाधान दर्शवत पंतप्रधान मोदींनी त्यांना पुन्हा काम करायला लावत चांगले प्रयत्न करण्यास सांगितले. इतकंच नाही तर अधिका-यांच्या निष्काळजी वृत्तीवर नाराज झालेले मोदी सुरू असलेले प्रेझेंटेशनही अर्ध्यावरच सोडून निघून गेले.   
 
गेल्या आठवड्यातही मोदींनी असेच एक प्रेझेंटेशन अर्ध्यात सोडले होते. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशा पद्धतीने प्रेझेंटेशन अर्ध्यावरच सोडून जाणं असामान्य बाब आहे. कारण साधारणतः पंतप्रधान प्रेझेंटेशनदरम्यान पूर्णवेळ थांबून सर्वांचे म्हणणे बारकाईने ऐकतात, तसंच त्यानंतर होणा-या चर्चेत सहभागही घेऊन आपली मतही मांडतात.
 
त्यामुळे प्रेझेंटेशन मध्यावर सोडून निघताना, अशा पद्धतीचा निष्काळजीपणा यापुढे सहन केला जाणार नाही, असा संकेतच पंतप्रधान मोदींनी अधिकारी वर्गाला दिल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी आपल्या अधिका-यांना असेही निर्देश दिले आहेत की, त्यांनी आपल्या कार्यातील गुणवत्तेवर अधिक लक्ष द्यावे.
 
दरम्यान, सदर प्रेझेंटेशन हे  कृषी आणि संबंधित क्षेत्रातील अधिकारी सादर करत होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी अधिका-यांसमोरच प्रेझेंटेशनबाबत खूश नसल्याचे जाहीर केले. पंतप्रधानांनी अधिका-यांना क्षेत्रातील नवीन कल्पना आणि धोरणांसदर्भात सूचना आणण्यास सांगितले होते, मात्र अधिका-यांची अपूर्ण तयारी दिसल्याने पंतप्रधान मोदींनी बैठक अर्ध्यातच सोडली.  
 
'मला असे वाटत की तुम्ही पूर्ण प्रयत्न केले नाहीत. जा आणि मेहनत करून पुन्हा प्रेझेंटेशन सादर करा', असा शब्दांत मोदींनी अधिका-यांचे कान टोचले. तसेच याआधी आरोग्य, स्वच्छता व नागरी विकास मंत्रालयातील अधिकारी करत असलेले प्रेझेंटेशनच्या सुरुवातीलाच मोदी उठून गेले होते, अशी माहिती समोर आली आहे.