शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून 'या' गावातील लोकांचे होत नाही लग्न..!

By admin | Updated: February 17, 2017 09:37 IST

लखनऊजवळील गोसाइनपुरवा या गावात अद्याप वीजच पोहोचली नसल्याने तिथे कोणाचेच लग्न जमत नाही.

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 17 - नवनवे विक्रम स्थापित करत महासत्ता बनण्याच्या दिशेने पाऊल उचलणा-या भारतात आजही अशी अनेक गावे आहेत जिथे अद्याप वीजही पोहोचलेली नाही. वीजटंचाईमुळे लोकांचे जीवन हलाखीचे झालेले असतानाच याच समस्येमुळे उत्तर प्रदेशमधील एका गावातील तरूणांचे लग्नच होत नसल्याचेही समोर आले आहे.
 
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊपासून अवघ्या ८-१० किलोमीटरवर असलेल्या 'बक्शी का तालाब' जवळील एका गावात अंधाराचेच साम्राज्य आहे. गोसाइनपुरवा असे त्या गावाचे नाव असून देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष उलटल्यानंतरही गावात अद्याप वीज आलेली नाही आणि त्यामुळेच गावातील अनेक जण आजपर्यंत अविवाहीत आहेत.
 
गावातील अनेक वृद्धांच्या सांगण्यानुसार, त्यांनी आतापर्यंत वीज काय असते हे पाहिलेलेच नाही. निवडणुका जवळ आल्या की अनेक नेते गावात येऊन विजेचे आश्वासन देतात, मात्र नंतर असे गायब होतात, ते थेट पुढच्या निवडणुकीलाच दिसतात. या पोकळ आश्वासनांमुळे गावकरीही वैतागले असून महिलांनी तर यावेळी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे.  
 
या गावातील रहिवासी विनोद, आता त्याचे वय 37 वर्ष, वय उलटून जात आहे, पण अद्यापही त्याचे लग्न होऊ शकलेले नाही आणि त्याचे कारण म्हणजे 'नसलेली' वीज... जरी एखादं स्थळ आलं तरी गावात वीज नसल्याचे कळल्यावर ते लग्नाची पुढील बोलणी होत नाहीत. 
 
याच गावातील रहिवासी 70 वर्षीय रामगोपाल यांनी सांगितले की, त्यांनी आतापर्यंत गावात प्रकाश पाहिलेलाच नाही. काही वर्षांपूर्वी गावात विजेच खांब लागल्यावर लोकांच्या आशा पल्लवित झाल्या ख-या, पण त्या खांबांवर विजेच्या तारा मात्र अद्यापही लागलेल्या नाहीत. काही लोकांचे शहरातही घरं आहे, त्यांची लग्न लगेच जमतात, पण अन्य गावकरी मात्र अजूनही अविवाहितच आहेत.