शहरं
Join us  
Trending Stories
1
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
2
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
3
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
4
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
5
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
6
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
7
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
8
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
9
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
10
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
11
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
12
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
13
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
14
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
15
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
16
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
17
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
18
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
19
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
20
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान

म्हणून 'या' गावातील लोकांचे होत नाही लग्न..!

By admin | Updated: February 17, 2017 09:37 IST

लखनऊजवळील गोसाइनपुरवा या गावात अद्याप वीजच पोहोचली नसल्याने तिथे कोणाचेच लग्न जमत नाही.

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 17 - नवनवे विक्रम स्थापित करत महासत्ता बनण्याच्या दिशेने पाऊल उचलणा-या भारतात आजही अशी अनेक गावे आहेत जिथे अद्याप वीजही पोहोचलेली नाही. वीजटंचाईमुळे लोकांचे जीवन हलाखीचे झालेले असतानाच याच समस्येमुळे उत्तर प्रदेशमधील एका गावातील तरूणांचे लग्नच होत नसल्याचेही समोर आले आहे.
 
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊपासून अवघ्या ८-१० किलोमीटरवर असलेल्या 'बक्शी का तालाब' जवळील एका गावात अंधाराचेच साम्राज्य आहे. गोसाइनपुरवा असे त्या गावाचे नाव असून देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष उलटल्यानंतरही गावात अद्याप वीज आलेली नाही आणि त्यामुळेच गावातील अनेक जण आजपर्यंत अविवाहीत आहेत.
 
गावातील अनेक वृद्धांच्या सांगण्यानुसार, त्यांनी आतापर्यंत वीज काय असते हे पाहिलेलेच नाही. निवडणुका जवळ आल्या की अनेक नेते गावात येऊन विजेचे आश्वासन देतात, मात्र नंतर असे गायब होतात, ते थेट पुढच्या निवडणुकीलाच दिसतात. या पोकळ आश्वासनांमुळे गावकरीही वैतागले असून महिलांनी तर यावेळी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे.  
 
या गावातील रहिवासी विनोद, आता त्याचे वय 37 वर्ष, वय उलटून जात आहे, पण अद्यापही त्याचे लग्न होऊ शकलेले नाही आणि त्याचे कारण म्हणजे 'नसलेली' वीज... जरी एखादं स्थळ आलं तरी गावात वीज नसल्याचे कळल्यावर ते लग्नाची पुढील बोलणी होत नाहीत. 
 
याच गावातील रहिवासी 70 वर्षीय रामगोपाल यांनी सांगितले की, त्यांनी आतापर्यंत गावात प्रकाश पाहिलेलाच नाही. काही वर्षांपूर्वी गावात विजेच खांब लागल्यावर लोकांच्या आशा पल्लवित झाल्या ख-या, पण त्या खांबांवर विजेच्या तारा मात्र अद्यापही लागलेल्या नाहीत. काही लोकांचे शहरातही घरं आहे, त्यांची लग्न लगेच जमतात, पण अन्य गावकरी मात्र अजूनही अविवाहितच आहेत.