शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

म्हणून 'या' गावातील लोकांचे होत नाही लग्न..!

By admin | Updated: February 17, 2017 09:37 IST

लखनऊजवळील गोसाइनपुरवा या गावात अद्याप वीजच पोहोचली नसल्याने तिथे कोणाचेच लग्न जमत नाही.

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 17 - नवनवे विक्रम स्थापित करत महासत्ता बनण्याच्या दिशेने पाऊल उचलणा-या भारतात आजही अशी अनेक गावे आहेत जिथे अद्याप वीजही पोहोचलेली नाही. वीजटंचाईमुळे लोकांचे जीवन हलाखीचे झालेले असतानाच याच समस्येमुळे उत्तर प्रदेशमधील एका गावातील तरूणांचे लग्नच होत नसल्याचेही समोर आले आहे.
 
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊपासून अवघ्या ८-१० किलोमीटरवर असलेल्या 'बक्शी का तालाब' जवळील एका गावात अंधाराचेच साम्राज्य आहे. गोसाइनपुरवा असे त्या गावाचे नाव असून देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष उलटल्यानंतरही गावात अद्याप वीज आलेली नाही आणि त्यामुळेच गावातील अनेक जण आजपर्यंत अविवाहीत आहेत.
 
गावातील अनेक वृद्धांच्या सांगण्यानुसार, त्यांनी आतापर्यंत वीज काय असते हे पाहिलेलेच नाही. निवडणुका जवळ आल्या की अनेक नेते गावात येऊन विजेचे आश्वासन देतात, मात्र नंतर असे गायब होतात, ते थेट पुढच्या निवडणुकीलाच दिसतात. या पोकळ आश्वासनांमुळे गावकरीही वैतागले असून महिलांनी तर यावेळी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे.  
 
या गावातील रहिवासी विनोद, आता त्याचे वय 37 वर्ष, वय उलटून जात आहे, पण अद्यापही त्याचे लग्न होऊ शकलेले नाही आणि त्याचे कारण म्हणजे 'नसलेली' वीज... जरी एखादं स्थळ आलं तरी गावात वीज नसल्याचे कळल्यावर ते लग्नाची पुढील बोलणी होत नाहीत. 
 
याच गावातील रहिवासी 70 वर्षीय रामगोपाल यांनी सांगितले की, त्यांनी आतापर्यंत गावात प्रकाश पाहिलेलाच नाही. काही वर्षांपूर्वी गावात विजेच खांब लागल्यावर लोकांच्या आशा पल्लवित झाल्या ख-या, पण त्या खांबांवर विजेच्या तारा मात्र अद्यापही लागलेल्या नाहीत. काही लोकांचे शहरातही घरं आहे, त्यांची लग्न लगेच जमतात, पण अन्य गावकरी मात्र अजूनही अविवाहितच आहेत.