शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

...म्हणून चिंताग्रस्त भाजपाने बेदींना निवडले - आरएसएस

By admin | Updated: February 3, 2015 11:15 IST

दिल्लीत जनमत फारसे अनुकूल दिसत नसल्याने चिंताग्रस्त भाजपाने किरण बेदींची 'मुख्यमंत्री'पदाची उमेदवार म्हणून घोषणा केल्याची कबुली 'ऑर्गनायझर' या संघाच्या मुखपत्रात देण्यात आली.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - राजधानी दिल्लीत जनमत फारसे अनुकूल दिसत नसल्याने चिंताग्रस्त भारतीय जनता पक्षाने किरण बेदींना पक्षात आणत त्यांची 'मुख्यमंत्री'पदाची उमेदवार म्हणून घोषणा केल्याची कबुली 'ऑर्गनायझर' या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात देण्यात आली आहे. तसेच या लेखात भाजपाला धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे. किरण बेदींची भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून निवड करण्यात आल्यानंतर पक्षात व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आणि थोडा तणावही होता. त्यानंतर खुद्द संघाकडूनच बेदींच्या नेमणुकीचे कारण पुढे आले आहे. 'बेदींच्या नेमणुकीमुळे मोठ्या प्रमाणात पंजाबी मते भाजपाच्या वाट्यास येतील. दिल्लीत सध्या कायदा व सरक्षा व्यवस्थेचा स्तर घसरत असून, महिलांवरील अत्याचारांतही वाढ होताना दिसत आहे त्यापार्श्वभूमीवर आणि पोलिस अधिकारी असताना बेदी यांनी केलेल्या कामामुळे महिला वर्ग मोठ्या प्रमाणात त्यांच्या (बेदी) बाजूने मतदान करेल' अशी अपेक्षा लेखात व्यक्त करण्यात आली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी अवघ्या ४९ दिवसांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने दिल्लीकरांमध्ये फसवले गेल्याची भावना असून ते दुखावले गेले आहेत, त्यामुळे त्यांची कठीण परीक्षा आहे. मात्र असे असले रीब वर्गातून आपला अधिका पाठिंबा मिळू शकतो, अशी शक्यता असल्याचे लेखात म्हटले आहे. भाजपासाठीची स्थितीही दिल्लीत फारशी समाधानकारक नसून, ही फारशी चांगली बाब नाही, हे  लक्षात आल्यानंतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी किरण बेदींना पक्षात आणण्याचा निर्णय घेतल्याचे लेखात म्हटले आहे. तसेच भाजप नेत्यांकडून होणा-या नकारात्मक टीकेबाबातही लेखातून समज देण्यात आली आहे. ' नरेंद्र मोदींमुळे सोशल नेटवर्किंग साईट्स व सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या भाजपा नेत्यांनी ट्विटर व फेसबूकवर नकारात्मक कॉमेंट्स कमी केल्या पाहिजेत', असा सल्लाही देण्यात आला आहे.