शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

अमरनाथ यात्रेदरम्यान आतापर्यंत 48 भाविकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 15:37 IST

अमरनाथ यात्रा पार पडल्यानंतर परतीच्या वाटेवरच मध्य प्रदेशातील एका भाविकाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यत यात्रेदरम्यान 48 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर,दि. 19 - अमरनाथ यात्रा पार पडल्यानंतर परतीच्या वाटेवरच मध्य प्रदेशातील एका भाविकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. पोलीस अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, पवित्र अमरनाथ गुहेतील हिम शिवलिंगाचे दर्शन घेऊन पहलगाममधील नुनवान बेसकॅम्प येथे परतत असताना मंगळवारी संध्याकाळी रोमेश्वर पाटीदार यांचा मृत्यू झाला आहे.  दरम्यान, पाटीदार यांचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास केला जात आहे. 
 
अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार,  48 दिवस चालणा-या अमरनाथ यात्रेदरम्यान आतापर्यंत एकूण 48 भाविकांचा मृत्यू झाला आहे.  यासोबत नैसर्गिक कारणांमुळे  20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर  10 जुलै रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आठ भाविकांचा मृत्यू झाला होता. तर 20 भाविकांचा मृत्यू रस्ते अपघातात झाल्याची माहिती समोर आली आहे. 
 
राज्याचे राज्यापाल एन.एन.व्होरा यांनी 29 जूनपासून सुरू झालेल्या अमरनाथ यात्रेमध्ये आतापर्यंत मृत पावलेल्या व जखमी झालेल्या भाविकांसंबंधित मिळालेल्या माहितीची मंगळवारी पुन्हा एकडा पडताळणी केली.
 
दरम्यान,  अमरनाथजी श्राइन बोर्डचे सीईओ उमंग नरुला यांनी सांगितले की, दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या भाविकांच्या नातेवाईकांना देण्यात येणारी आर्थिक मदतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात्रेदरम्यान मृत पावलेल्या भाविकांना घरापर्यंत पोहोचवण्यासाठी अमरनाथजी श्राइन बोर्डनं आतापर्यंत 14.66 लाख रुपये व 1.34 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
 
आणखी बातम्या वाचा
(पनुन काश्मीर संघटनेकडून अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा जाहीर निषेध)
 
अमरनाथ यात्रेला निघालेल्या भाविकांची बस रविवारी (16 जुलै ) दुपारी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर नचलानात (जिल्हा रामबन) खोल दरीत पडून, दोन महिलांसह १७ जणांचा मृत्यू झाला होता. मृत भाविक उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, राजस्थान, हरियाणा आणि मध्य प्रदेशातील आहेत. ही बस जम्मू-काश्मीर परिवहन महामंडळाची होती. जम्मू येथून ३,६०३ यात्रेकरूंना घेऊन निघालेल्या ताफ्यात ही बस होती.