शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतीय सैन्याने 40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
2
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
3
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
4
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
7
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
8
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
9
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
10
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
11
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
12
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
13
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
14
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
15
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
16
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
17
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
18
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
19
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
20
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?

स्मार्ट शहरांचा स्मार्टनेस वर्षभराहून अधिक काळानंतरच दिसेल

By admin | Updated: September 22, 2016 04:13 IST

मोदी सरकारच्या स्मार्ट सिटीज् मिशनचा प्रारंभ होउन १५ महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला.

सुरेश भटेवरा,

नवी दिल्ली- मोदी सरकारच्या स्मार्ट सिटीज् मिशनचा प्रारंभ होउन १५ महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला. जमिनी स्तरावर मात्र या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम दिसायला आणखी किमान एक वर्षाहून अधिक कालावधी लागेल, अशी कबुली खुद्द नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडूंनीच दिली आहे. पहिल्या यादीत ज्या २0 शहरांची निवड झाली त्यात महाराष्ट्रातील पुणे व सोलापूर या दोन शहरांचा समावेश आहे. १०० शहरांमध्ये स्मार्ट सिटी योजना लागू करण्याचा सरकारचा इरादा आहे. चौथ्या टप्प्यात ४0 शहरांचा समावेश होऊ शकतो.>तिसऱ्या टप्प्यातील स्मार्ट शहरेनगरविकास मंत्र्यांनी मंगळवारी एकुण ६३ शहरांच्या स्पर्धेतून तिसऱ्या टप्प्यात निवड झालेल्या २७ नव्या शहरांची घोषणा केली.त्यात महाराष्ट्रातील अनुक्रमे कल्याण डोंबिवली, नागपूर, ठाणे, नाशिक व औरंगाबाद अशा ५ नव्या शहरांचा समावेश झाला आहे. या २७ शहरांसाठी एकुण ६६ हजार ८८३ कोटी रूपये खर्च होणार आहेत. त्यातले ४२,५२४ कोटी एरिया बेस्ड डेव्हलपमेंटसाठी व ११ हजार ३७९ कोटी रूपये तंत्रज्ञानावर आधारीत पॅन सिटी सोल्युशन्सवर खर्च होणार आहेत.>१,४४,७४२ कोटी खर्चदेशात स्मार्ट सिटीज् मिशन साठी निवड झालेल्या शहरांची संख्या आता ६0 वर पोहोचली आहे. या शहरांसाठी एकुण १ लाख ४४ हजार ७४२ कोटी रूपये खर्च होणार आहेत.प्रत्येक शहराला केंद्र सरकारतर्फे ५ वर्षात ५00 कोटींची रक्कम मिळणार आहे. बाकीच्या रकमेसाठी जागतिक बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक, ब्रिक्स बँक, जपानच्या जायका बँकने अर्थपुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. खर्चाखेरीज बाकी रक्कम बाँडस व पीपीपी मॉडेलनुसार सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राच्या भागीदारीतून उभी केली जाईल.सध्या पहिल्या यादीतील शहरांमधे काही शहरात स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) व तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर)चे काम सुरू आहे. काही ठिकाणी निविदा स्तरापर्यंत ही प्रक्रिया पोहोचली आहे. एकुण ८२ प्रकल्प वेगवेगळया स्तरांवर सुरू असून या शहरात आणखी ११३ नव्या प्रकल्पांचा लवकरच शुभारंभ केला जाईल. दुसऱ्या टप्प्यात निवड झालेल्या १३ शहरांमधे एसपीव्ही तयार करून स्थानिक पातळीवर प्रक्लपांची आखणी करण्यात येत आहे. मिशनच्या निकषांनुसार या प्रकल्पांची पूर्तता तपासल्यावर त्याच्या खर्चाला मंजुरी मिळेल, असे नायडूंनी स्पष्ट केले.