शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

स्मार्ट शहरांचा स्मार्टनेस वर्षभराहून अधिक काळानंतरच दिसेल

By admin | Updated: September 22, 2016 04:13 IST

मोदी सरकारच्या स्मार्ट सिटीज् मिशनचा प्रारंभ होउन १५ महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला.

सुरेश भटेवरा,

नवी दिल्ली- मोदी सरकारच्या स्मार्ट सिटीज् मिशनचा प्रारंभ होउन १५ महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला. जमिनी स्तरावर मात्र या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम दिसायला आणखी किमान एक वर्षाहून अधिक कालावधी लागेल, अशी कबुली खुद्द नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडूंनीच दिली आहे. पहिल्या यादीत ज्या २0 शहरांची निवड झाली त्यात महाराष्ट्रातील पुणे व सोलापूर या दोन शहरांचा समावेश आहे. १०० शहरांमध्ये स्मार्ट सिटी योजना लागू करण्याचा सरकारचा इरादा आहे. चौथ्या टप्प्यात ४0 शहरांचा समावेश होऊ शकतो.>तिसऱ्या टप्प्यातील स्मार्ट शहरेनगरविकास मंत्र्यांनी मंगळवारी एकुण ६३ शहरांच्या स्पर्धेतून तिसऱ्या टप्प्यात निवड झालेल्या २७ नव्या शहरांची घोषणा केली.त्यात महाराष्ट्रातील अनुक्रमे कल्याण डोंबिवली, नागपूर, ठाणे, नाशिक व औरंगाबाद अशा ५ नव्या शहरांचा समावेश झाला आहे. या २७ शहरांसाठी एकुण ६६ हजार ८८३ कोटी रूपये खर्च होणार आहेत. त्यातले ४२,५२४ कोटी एरिया बेस्ड डेव्हलपमेंटसाठी व ११ हजार ३७९ कोटी रूपये तंत्रज्ञानावर आधारीत पॅन सिटी सोल्युशन्सवर खर्च होणार आहेत.>१,४४,७४२ कोटी खर्चदेशात स्मार्ट सिटीज् मिशन साठी निवड झालेल्या शहरांची संख्या आता ६0 वर पोहोचली आहे. या शहरांसाठी एकुण १ लाख ४४ हजार ७४२ कोटी रूपये खर्च होणार आहेत.प्रत्येक शहराला केंद्र सरकारतर्फे ५ वर्षात ५00 कोटींची रक्कम मिळणार आहे. बाकीच्या रकमेसाठी जागतिक बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक, ब्रिक्स बँक, जपानच्या जायका बँकने अर्थपुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. खर्चाखेरीज बाकी रक्कम बाँडस व पीपीपी मॉडेलनुसार सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राच्या भागीदारीतून उभी केली जाईल.सध्या पहिल्या यादीतील शहरांमधे काही शहरात स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) व तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर)चे काम सुरू आहे. काही ठिकाणी निविदा स्तरापर्यंत ही प्रक्रिया पोहोचली आहे. एकुण ८२ प्रकल्प वेगवेगळया स्तरांवर सुरू असून या शहरात आणखी ११३ नव्या प्रकल्पांचा लवकरच शुभारंभ केला जाईल. दुसऱ्या टप्प्यात निवड झालेल्या १३ शहरांमधे एसपीव्ही तयार करून स्थानिक पातळीवर प्रक्लपांची आखणी करण्यात येत आहे. मिशनच्या निकषांनुसार या प्रकल्पांची पूर्तता तपासल्यावर त्याच्या खर्चाला मंजुरी मिळेल, असे नायडूंनी स्पष्ट केले.