शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

सपात फूट; शिवपाल यांचा नवा पक्ष

By admin | Updated: May 6, 2017 01:17 IST

आपण नवा धर्मनिरपेक्ष पक्ष काढणार असून, मुलायमसिंह यादव या पक्षाचे प्रमुख असतील, अशी घोषणा समाजवादी पार्टीचे नेते शिवपाल यादव

लखनौ : आपण नवा धर्मनिरपेक्ष पक्ष काढणार असून, मुलायमसिंह यादव या पक्षाचे प्रमुख असतील, अशी घोषणा समाजवादी पार्टीचे नेते शिवपाल यादव यांनी शुक्रवारी केली असून, त्यामुळे सपातील दरी आणखी रुंदावली आहे. अखिलेश यादव यांनी तीन महिन्यांत पक्षाची सूत्रे मुलायमसिंह यादव यांच्याकडे न दिल्यास आपण नवा धर्मनिरपेक्ष पक्ष स्थापन करू, असा इशारा शिवपाल यांनी अलीकडेच दिला होता. अलीकडेच झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवपाल जसवंतनगरची जागा कायम राखली आहे. सामाजिक न्यायालयासाठी समाजवादी सेक्युलर मोर्चा या नव्या पक्षाची स्थापना करण्यात येईल आणि नेताजी (मुलायमसिंह) त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, असे शिवपाल यांनी इटावा येथे पत्रकारांना सांगितले. इटावा यादव कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. शिवपाल यांच्या घोषणेनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना अखिलेश यांनी आपल्याला प्रसिद्धीमाध्यमांद्वारे याची माहिती मिळाल्याचे सांगितले. ‘मला हे प्रसिद्धीमाध्यमाद्वारे कळाले. जर असा पक्ष स्थापन झाला असेल, तर ते देशासाठी चांगलेच आहे,’ असेही ते म्हणाले. अखिलेश सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. इटावा येथील एका नातेवाईकाच्या घरी शिवपाल यांची मुलायमसिंह यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर शिवपाल यांनी मुलायमसिंह नव्या पक्षाचे अध्यक्षपद भूषवणार असल्याचे घोषित केले.  सख्खे भाऊ असलेल्या या दोन नेत्यांनी नवा पक्ष स्थापन करण्याबाबत चर्चा केली. नव्या पक्षाची भविष्यातील वाटचाल कशी राहील हे शिवपाल यांनी स्पष्ट केले नाही. हा पक्ष सपाविरुद्ध निवडणूक लढवेल की, सर्व समाजवाद्यांना एकत्र आणून सपाला बळकट करील, हे स्पष्ट होऊ शकले नाही. सर्व समाजवाद्यांना एका मंचावर आणण्यासाठी मुलायमसिंह यादव मोहीम सुरू करण्याच्या विचारात असल्याचे सांगण्यात येते. अखिलेश यांनी पक्षाची सूत्रे मुलायमसिंह यांच्याकडे देण्याचे वचन दिले होते. ते त्यांनी आता पाळावे आणि आम्ही सर्व जण सपाला बळकट करूत. मी त्यांना तीन महिन्यांची मुदत दिली आहे. त्यांनी तीन महिन्यांत नेताजींकडे सूत्रे न दिल्यास आपण नवा धर्मनिरपेक्ष पक्ष स्थापन करू, असे शिवपाल यांनी बुधवारी म्हटले होते. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चुलते शिवपाल आणि पुतण्या अखिलेश यांच्यात मोठा वाद झाला होता. सपाचे उत्तर प्रदेश अध्यक्ष म्हणून अखिलेश यांच्या जागेवर शिवपाल यांची नियुक्ती झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यांनी शिवपाल यांना मंत्रिमंडळातून वगळले होते. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या झालेल्या धुळधाणीला अखिलेश आणि शिवपाल यांच्यातील सत्तासंघर्ष कारणीभूत असल्याचे सपातील अनेकांना वाटते. अखिलेश यांच्या नेतृत्वाखाली सपाचा उत्तर प्रदेशात दारुण पराभव झाला. काँग्रेससोबत युती करूनही सपाची दयनीय अवस्था झाली. सपा काँग्रेस युतीला ५४ आणि भाजपप्रणित रालोआला ३२५ जागा मिळाल्या.