शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

‘फोनो’ प्रचाराने उडवली झोप

By admin | Updated: October 10, 2014 02:54 IST

निवडणुका जवळ येताच राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून प्रचारासाठी अनेक वेगवेगळे ‘फंडे’ आणण्यात येतात.

मुंबई : निवडणुका जवळ येताच राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून प्रचारासाठी अनेक वेगवेगळे ‘फंडे’ आणण्यात येतात. उमेदवारांकडून विधानसभा निवडणुकीतील प्रचारासाठी यंदा ‘फोनो’ प्रचारावर अधिक भर देण्यात आला आहे. मात्र आपल्या मतदारसंघातील मतदारांना फोन करून प्रचार करतानाच मतदारांची झोप उडत असल्याचे आता समोर येत आहे. ऐन दुपारी मतदारांच्या घरातील फोन वाजत असल्याने मतदार त्रस्त होत आहेत. विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरूच असून १३ आॅक्टोबर रोजी प्रचाराची अखेर होणार आहे. त्यामुळे प्रचारात आणखी जोर लावण्यात येत असून बाइक रॅली, प्रचार फेऱ्या आणि घरोघरी प्रचार करण्यावर अधिक भर दिला जात आहे. प्रत्येक उमेदवारांकडून आपला मतदारसंघ अक्षरश: पिंजून काढला जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे उमेदवारांनी ‘फोनो’ प्रचार करण्यावरही अधिक भर दिला आहे. आपल्या मतदारसंघातील प्रत्येक मतदाराशी संवाद साधण्यासाठी फोनो प्रचाराची निवड करण्यात आली आहे. यात मतदारांच्या घरातील लॅण्डलाइनवर फोन करून उमेदवाराचा पक्ष, त्याचे नाव सांगून येत्या १५ आॅक्टोबर रोजी मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. उमेदवारांकडून याचे काम काही कॉल सेंटरला देण्यात आले आहे. हा प्रचार करताना मात्र कुठल्याही प्रकारचे भान राहिलेले नसून दुपारी २ ते सायंकाळी चार या दरम्यान मतदारांच्या घरातील दूरध्वनी वाजत आहेत. त्यामुळे मतदारांची झोप उडत असून नाराजीही व्यक्त केली जात आहे. मुंबई, ठाण्यातील मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी हा फंडा निवडला असून हा प्रचार बंद होणार तरी कधी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. लोकसभा निवडणुकीतही भर दुपारी करण्यात येत असलेल्या प्रचारामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली होती. (प्र्रतिनिधी)