शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कुशल भारत साकारू

By admin | Updated: June 12, 2014 05:39 IST

जगात देशाची ओळख ‘स्कॅम इंडिया’ (घोटाळ्यांचा देश) अशी नव्हे, तर ‘स्किल्ड इंडिया’ (कुशल भारत) अशी असायला हवी़

नवी दिल्ली : जगात देशाची ओळख ‘स्कॅम इंडिया’ (घोटाळ्यांचा देश) अशी नव्हे, तर ‘स्किल्ड इंडिया’ (कुशल भारत) अशी असायला हवी़ नव्या सरकारचे हेच ध्येय आहे़ राष्ट्रपतींच्या मुखातून निघालेला शब्द माझ्या सरकारसाठी पवित्र बंधन आहे आणि तो निभवण्यास मी आणि माझे सरकार कटिबद्ध आहे़ विरोधक संख्येने कितीही असो, सरकार त्यांना घेऊन पुढे जाईल़ मुस्लिमांसह सर्वांचा विकास आणि गरिबी निर्मूलन हे माझ्या सरकारचे कर्तव्य आहे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतील आपल्या पहिल्या भाषणात दिली़मोदींच्या संसदेतील पहिल्या भाषणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते़ आज बुधवारी लोकसभा व राज्यसभेत मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर दिले़ भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) सरकार गरिबांसाठी जगेल आणि गरिबांसाठी काम करेल, असे आश्वासन त्यांनी संपूर्ण जनतेला दिले़ माझ्यासारख्या नवख्या व्यक्तीला संसद समजून घेईल, अशी मी आशा करतो़, अशा शब्दांत मोदींनी लोकसभेतील आपल्या भाषणाला सुरुवात केली़ संसदेत बसलेले माझे वरिष्ठ कुठल्याही पक्षाचे का असेना, त्यांचा आशीर्वाद आम्हाला अहंकारापासून वाचवेल़ विरोधकांची संख्या कितीही असो, पण मला तुमच्याशिवाय पुढे जायचे नाही़ कारण आपल्याला संख्याच्या बळावर नव्हे तर ऐक्याच्या बळावर पुढे जायचे आहे,अशा नम्र शब्दांनी सुरुवात करीत, मोदींनी अनेक मुद्यांना हात लावला़

२०२२ पर्यंत देशातील प्रत्येक कुटुंबाला घर, घराघरांत वीज, पाणी आणि शौचालय यासाठी रालोआ सरकार यथाशक्ती प्रयत्न करेल़ आम्ही टीकेचे स्वागत करू कारण लोकशाहीत टीका बळ देते़ आम्ही थोरलेपणाचा आव मिरवणारे नाही़ आम्ही संवादात्मक संघवादावर विश्वास ठेवतो़ याच नात्याने राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील शब्द आमच्यासाठी प्रमाण आहेत़ ते खरे करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे मोदी म्हणाले़बलात्कारांवर मौन पाळाराजकीय पक्षांना बलात्कारासारख्या महिलांच्या सन्मानाशी जुळलेल्या मुद्यावर राजकारण करणे शोभनीय नाही़ तेव्हा बलात्काराचे मनोवैज्ञानिक विश्लेषण थांबवा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात दिला़ महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांंवर काही नेत्यांनी केलेल्या ताज्या वादग्रस्त वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते़ महिलांचा आदर आणि सुरक्षा आपणा सर्वांचे प्रथम कर्तव्य असले पाहिले़ बलात्काराच्या घटनांवर आक्षेपार्ह वक्तव्ये करणे शोभनीय आहे? आपण मौन बाळगू शकत नाही का? आपल्याला आत्मचिंतनासोबतच अशा घटनांविरुद्ध कारवाईही करायला हवी, असे ते म्हणाले़विरोधकांवर ताशेरे