शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

राज्यात सहा शेतकर्‍यांच्या आत्महत्या

By admin | Updated: August 28, 2015 23:37 IST

नापिकी, कर्जबाजारीपणा : विदर्भ, मराठवाड्यातील घटनामुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसांत सहा शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्यात विदर्भ व मराठवाड्यातील प्रत्येकी तीन शेतकर्‍यांचा समावेश आहे. कर्जबाजारीपण, नापिकी व दुष्काळ ही त्यांच्या आत्महत्येची कारणे आहेत. यवतमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्यात दगडथर येथील अशोक रामराव जटाळे (२९) यांनी गुरुवारी विष प्राशन केले. त्यांच्याकडे आठ ...


नापिकी, कर्जबाजारीपणा : विदर्भ, मराठवाड्यातील घटना

मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसांत सहा शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्यात विदर्भ व मराठवाड्यातील प्रत्येकी तीन शेतकर्‍यांचा समावेश आहे. कर्जबाजारीपण, नापिकी व दुष्काळ ही त्यांच्या आत्महत्येची कारणे आहेत.
यवतमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्यात दगडथर येथील अशोक रामराव जटाळे (२९) यांनी गुरुवारी विष प्राशन केले. त्यांच्याकडे आठ एकर कोरडवाहू जमीन असून त्याच्यावर राष्ट्रीयकृत बँकेचे ९० हजार रुपयांचे कर्ज आहे. शेतातील कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव झाल्याने तेे चिंतेत होता. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी व वृद्ध आई आहे.
चंद्रपूर सिंदेवाही तालुक्यातील कळमगाव येथील दिलीप कामडी यांनी शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील सेलडोह येथील मंगेश रामाजी राऊत (२८) यांनी गुरुवारी शेतात विष प्राशन केले. त्यांच्यावर बँकेचे सव्वा लाख रुपयांचे कर्ज होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. आठच दिवसांपूर्वी गावात भाऊसाहेब धनोरे यांनी आत्महत्या केली होती.
मराठवाड्यात प्रभाकर गणपतराव खांडे (६५, मच्छिंद्रनाथ चिंचोली, जि. जालना), कौतिकराव आनंदा ठाले (३७, वाडी बु., जि. जालना) आणि पुंडलिक मरीबा गवलवाड (५५, कोळनूर, जि. नांदेड) यांनी आत्महत्या केली.
खांडे यांना तीन एकर शेती आहे. दरवर्षी शेतात खर्च जास्त आणि उत्पन्न कमी, अशी त्यांची स्थिती होती. त्यांच्यावर ५० हजार रुपये कर्ज आहे. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, सूना व नातवंडे असा परिवार आहे. खांडे यांची दोन्ही मुले दरवर्षी उसतोडीसाठी जातात. पत्नी व सुनाही रोजंदारी करतात. परंतु त्यानंतरही संसाराचा गाडा सुरळीत चालत नसे.
भोकरदन तालुक्यातील वाडी बु. येथील कौतिकराव यांच्यावर ३ लाखांचे कर्ज होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
पुंडलिक गवलवाड यांच्या नावावर ३५ हजार रुपयांचे पीक कर्ज होते़ त्याचे नूतनीकरण करण्यासाठी त्यांनी खासगी सावकाराकडूनही कर्ज काढले होते़ त्यंाच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)