राज्यात सहा शेतकर्यांच्या आत्महत्या
By admin | Updated: August 28, 2015 23:37 IST
नापिकी, कर्जबाजारीपणा : विदर्भ, मराठवाड्यातील घटनामुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसांत सहा शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. त्यात विदर्भ व मराठवाड्यातील प्रत्येकी तीन शेतकर्यांचा समावेश आहे. कर्जबाजारीपण, नापिकी व दुष्काळ ही त्यांच्या आत्महत्येची कारणे आहेत. यवतमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्यात दगडथर येथील अशोक रामराव जटाळे (२९) यांनी गुरुवारी विष प्राशन केले. त्यांच्याकडे आठ ...
राज्यात सहा शेतकर्यांच्या आत्महत्या
नापिकी, कर्जबाजारीपणा : विदर्भ, मराठवाड्यातील घटनामुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसांत सहा शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. त्यात विदर्भ व मराठवाड्यातील प्रत्येकी तीन शेतकर्यांचा समावेश आहे. कर्जबाजारीपण, नापिकी व दुष्काळ ही त्यांच्या आत्महत्येची कारणे आहेत. यवतमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्यात दगडथर येथील अशोक रामराव जटाळे (२९) यांनी गुरुवारी विष प्राशन केले. त्यांच्याकडे आठ एकर कोरडवाहू जमीन असून त्याच्यावर राष्ट्रीयकृत बँकेचे ९० हजार रुपयांचे कर्ज आहे. शेतातील कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव झाल्याने तेे चिंतेत होता. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी व वृद्ध आई आहे.चंद्रपूर सिंदेवाही तालुक्यातील कळमगाव येथील दिलीप कामडी यांनी शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील सेलडोह येथील मंगेश रामाजी राऊत (२८) यांनी गुरुवारी शेतात विष प्राशन केले. त्यांच्यावर बँकेचे सव्वा लाख रुपयांचे कर्ज होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. आठच दिवसांपूर्वी गावात भाऊसाहेब धनोरे यांनी आत्महत्या केली होती. मराठवाड्यात प्रभाकर गणपतराव खांडे (६५, मच्छिंद्रनाथ चिंचोली, जि. जालना), कौतिकराव आनंदा ठाले (३७, वाडी बु., जि. जालना) आणि पुंडलिक मरीबा गवलवाड (५५, कोळनूर, जि. नांदेड) यांनी आत्महत्या केली. खांडे यांना तीन एकर शेती आहे. दरवर्षी शेतात खर्च जास्त आणि उत्पन्न कमी, अशी त्यांची स्थिती होती. त्यांच्यावर ५० हजार रुपये कर्ज आहे. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, सूना व नातवंडे असा परिवार आहे. खांडे यांची दोन्ही मुले दरवर्षी उसतोडीसाठी जातात. पत्नी व सुनाही रोजंदारी करतात. परंतु त्यानंतरही संसाराचा गाडा सुरळीत चालत नसे. भोकरदन तालुक्यातील वाडी बु. येथील कौतिकराव यांच्यावर ३ लाखांचे कर्ज होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. पुंडलिक गवलवाड यांच्या नावावर ३५ हजार रुपयांचे पीक कर्ज होते़ त्याचे नूतनीकरण करण्यासाठी त्यांनी खासगी सावकाराकडूनही कर्ज काढले होते़ त्यंाच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)