शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

एका कॅबिनेटमागे सहा राज्यमंत्री

By admin | Updated: May 19, 2014 02:46 IST

एका खात्याचे एक कॅबिनेट मंत्री आणि एक किंवा दोन राज्यमंत्री अशी केंद्रातील प्रत्येक विभागाची रचना असते.

यदु जोशी / गजानन जानभोर , नवी दिल्ली - एका खात्याचे एक कॅबिनेट मंत्री आणि एक किंवा दोन राज्यमंत्री अशी केंद्रातील प्रत्येक विभागाची रचना असते. पण या वेळी नरेंद्र मोदी सरकारमध्ये एक कॅबिनेट मंत्री आणि त्यांच्या दिमतीला पाच किंवा सहा राज्यमंत्री अशी रचना राहू शकते. विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, पायाभूत सुविधा, उद्योग, वाहतूक, कृषी आदी क्षेत्रांशी संबंधित वेगवेगळे विभाग एकत्र करायचे आणि त्याचे कॅबिनेट मंत्रिपद एकाला देऊन त्यांच्यासोबत पाच ते सहा राज्यमंत्री द्यायचे, असे सूत्र निश्चित केले जाऊ शकते. एकाच क्षेत्राशी संबंधित वेगवेगळे विभाग असले की समन्वयाचा अभाव दिसतो आणि निर्णय लवकर होत नाहीत, हा अनुभव लक्षात घेता विभागांचे एकत्रीकरण करण्याचा विचार मोदी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अरुण जेटली यांची कोअर कमिटी करीत आहे. या नव्या रचनेमुळे कॅबिनेट मंत्र्यांची संख्या कमी होईल, असे मानले जाते. तसेच राज्यमंत्र्यांची संख्या वाढू शकते. भाजपा आणि मित्रपक्षांच्या सदस्यांची मोठी संख्या लक्षात घेता मंत्रिमंडळाची रचना करताना कसरत होणार आहे. अनेक दिग्गजांना सामावून घेण्याचे आव्हान आहे. अशावेळी मंत्र्यांची संख्या कमी करणे परवडणारे नसेल. या पार्श्वभूमीवर काही नवीन विभाग निर्माण केले जाऊ शकतात. त्याद्वारे मंत्रिमंडळातील सदस्य संख्येचे संतुलन साधले जाईल. पण राज्यमंत्र्यांच्या अधिकाराचा संकोच होणार नाही व त्यात स्पष्टता राहील याची काळजी घ्यावी लागेल. भाजपाला संघाचा ‘सल्ला’! नरेंद्र मोदी सरकार स्थापनेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कुठलीही भूमिका नसणार, असे भाजपा वारंवार सांगत असली तरी भाजपा आणि पर्यायाने मोदींना ‘सल्ला’ देण्यासाठी संघ कमालीचा उत्सुक असल्याचे चित्र आहे़ गरज पडल्यास आम्ही सरकार स्थापनेसाठी सल्ला देऊ शकतो, असे संघाने म्हटले आहे़ अर्थात भाजपा मंत्रिमंडळ वा पक्षाच्या कामकाजात आमची कुठलीही ढवळाढवळ राहणार नाही़ आम्ही ‘रिमोट कंट्रोल’च्या कुठल्याही भूमिकेत नसणार, असेही संघाने स्पष्ट केले आहे़ आम्ही कुठल्याही प्रकारे ‘रिमोट कंट्रोल’ची भूमिका साकारणार नाही़ पण गरज भासल्यास आम्ही सल्ला देऊ शकू, असे संघ प्रवक्ते राम माधव यांनी जयपूर येथे बोलताना स्पष्ट केले़ लोकसभा निवडणुकीत जनतेला देशाच्या स्थितीबाबत जागृत करणे, मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती करणे, या जबाबदार्‍या आम्ही पार पाडल्या़ आमचे हे कार्य पूर्ण झाले़ आता आम्ही पुन्हा चरित्र निर्माण, व्यक्तिविकास आणि देशसेवा या आमच्या संघटनेच्या मूळ कार्याकडे वळू़ दैनंदिन राजकारण, सरकार गठन, मंत्रिमंडळ गठन यात आमचा कुठलाही हस्तक्षेप राहणार नाही़, असे संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी सांगितले. मी येथे वरिष्ठांची भेट घेण्यास आलो आहे. संघ मंत्रिमंडळ स्थापण्यासारख्या बाबींमध्ये लक्ष घालत नाही, असे नायडू म्हणाले. केशवकुंज येथे अमित शहा शनिवारी जवळपास दोन तास होते.