शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

शीखविरोधी दंगलीच्या फेरचौकशीसाठी एसआयटी स्थापन

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

नवी दिल्ली : दिल्ली आणि अन्य राज्यांमध्ये घडलेल्या १९८४ च्या शीखविरोधी दंगलीची नव्याने चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. केंद्रीय गृहमंत्रालयाने गुरुवारी सायंकाळी एसआयटी स्थापन करण्यात आल्याचा आदेश जारी केला, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. हे पथक सहा महिन्यात आपला चौकशी अहवाल सरकारला सादर करेल.

नवी दिल्ली : दिल्ली आणि अन्य राज्यांमध्ये घडलेल्या १९८४ च्या शीखविरोधी दंगलीची नव्याने चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. केंद्रीय गृहमंत्रालयाने गुरुवारी सायंकाळी एसआयटी स्थापन करण्यात आल्याचा आदेश जारी केला, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. हे पथक सहा महिन्यात आपला चौकशी अहवाल सरकारला सादर करेल.
या तीन सदस्यीय एसआयटीमध्ये दोन महानिरीक्षक दर्जाचे आयपीएस अधिकारी आणि एक न्यायिक अधिकाऱ्याचा समावेश राहील. तथापि सरकारने त्यांच्या नावाची घोषणा अद्याप केलेली नाही. सवार्ेच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जी. पी. माथुर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या कमिटीने केलेया शिफारशीवरून या एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. शीखविरोधी दंगलीची फेरचौकशी शक्य आहे काय हे तपासण्यासाठी ही कमिटी स्थापन करण्यात आली होती.
या कमिटीने गेल्या महिन्यात गृहमंत्री राजनाथसिंग़ यांना आपला अहवाल सादर केला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या या दंगलीची नव्याने चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात यावी, अशी शिफारस या कमिटीने केली होती. या दंगलीत ३३२५ लोक मारले गेले होते. त्यांपैकी एकट्या दिल्लीतच २७३३ लोकांचा बळी गेला होता. तर बाकीचे लोक उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि अन्य राज्यात मारले गेले होते. तथापि दंगलीच्या नेमक्या किती प्रकरणांची फाईल पुन्हा उघडण्याची शिफारस माथुर कमिटीने केली, हे समजू शकले नाही. याआधी न्या. नानावटी आयोगाने केवळ चार प्रकरणांचीच फाईल पुन्हा उघडण्याची शिफारस केलेली होती. (वृत्तसंस्था)