शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गरज पडल्यास आमदारांविरुद्ध कडक कारवाई करू सिसोदिया यांनी मांडली भूमिका

By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST

नवी दिल्ली : गत ४९ दिवसांच्या कार्यकाळातील आपल्या चुकांपासून धडा घेत, आम आदमी पार्टीने यापुढे ताकही फुंकून पिण्याचे धोरण अवलंबल्याचे चित्र आहे़ केजरीवाल सरकारमधील भावी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज शुक्रवारी याबाबतचे संकेत दिले़ नाहक मुद्दे उपस्थित करणारे वा शिस्तभंग करणाऱ्या आमदारांची यावेळी कुठलीही गय केली जाणार नाही़ प्रसंगी त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असे सिसोदिया म्हणाले़

नवी दिल्ली : गत ४९ दिवसांच्या कार्यकाळातील आपल्या चुकांपासून धडा घेत, आम आदमी पार्टीने यापुढे ताकही फुंकून पिण्याचे धोरण अवलंबल्याचे चित्र आहे़ केजरीवाल सरकारमधील भावी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज शुक्रवारी याबाबतचे संकेत दिले़ नाहक मुद्दे उपस्थित करणारे वा शिस्तभंग करणाऱ्या आमदारांची यावेळी कुठलीही गय केली जाणार नाही़ प्रसंगी त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असे सिसोदिया म्हणाले़
आज शुक्रवारी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते़ गतवेळी पक्षाचे २८ आमदार असताना विनोद कुमार बिन्नी यांच्या बंडखोरीने आम आदमी पार्टीच्या नाकीनऊ आणले होते़ यानंतर काही जण पक्ष सोडून भाजपात जाणार असल्याच्या अफवाही उठल्या होत्या़ आता आपचे ६७ आमदार आहे़ या आमदारांना कसे सांभाळणार? असा प्रश्न केला असता सिसोदिया यांनी उपरोक्त उत्तर दिले़
गतवर्ष आमच्यासाठी कसोटीचे वर्ष होते़ पण आम्ही या कसोटीवर खरे उतरलो आणि म्हणूनच आज आमचे ६७ आमदार आहे़ त्यांना सांभाळताना समस्या येईल, असे आम्हाला वाटत नाही़ पण काहींनी वादग्रस्त मुद्दे उपस्थित केलेच तर आम्ही त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही़ पक्षाने आमदारांची मोट बांधली आहे़ पक्ष आपल्या आमदारांसाठी काही मापदंड निश्चित करेल, त्याचे पालन होणे अपेक्षित आहे, असे ते म्हणाले़
काही आमदारांनी अगदी काही महिन्यांपूर्वी पक्षप्रवेश केला आहे़ अशास्थितीत ते आम आदमी पार्टीचे नियम पाळतील, असे कसे गृहित धरता येईल? असे विचारले असता सिसोदिया म्हणाले की, भ्रष्टाचारविरोधी आंदोलनापासून प्रेरित होऊन ते पक्षात आले आहेत़ त्यामुळे पक्षात भ्रष्टाचाराला थारा नाही, हे ते जाणून आहेत़ याशिवाय पक्षाच्या कसोटीवर ते खरे उतरलेले उमेदवार आहे़ एकंदर पक्ष आपल्या तत्त्वांबाबत कुठलीही तडजोड स्वीकारणार नाही़ पक्षशिस्त पाळली जाईल आणि निश्चितपणे आम्ही त्या स्थितीत आहोत़