शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सिंगल न्यूज

By admin | Updated: September 8, 2015 02:08 IST

विशेष गौरव पुरस्कारासाठी आवाहन

विशेष गौरव पुरस्कारासाठी आवाहन
सोलापूर : विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या माजी सैनिक, विधवा व त्यांच्या इयत्ता 10 वी, 12 वीत 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षण घेत असलेल्या पाल्यांचा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने एअर मार्शल व्ही. एस. पाटकर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारप्राप्त खेळाडू, संगीत क्षेत्राशी संबंधित विभागात पुरस्कारप्राप्त तसेच नैसर्गिक आपत्तीत बहुमोल कार्य करणार्‍यांचा गौरव करण्यात येणार आहे
संबंधितांनी वैयक्तिक अर्जासमवेत विहित नमुना फॉर्म, पाल्याचा शाळेचा बोनाफाईड दाखला, मार्कशिट, साक्षांकित प्रत, माजी सैनिक, विधवा ओळखपत्र छायांकित पत्र, डिस्चार्ज बुकमधील फॅमिली डिटेलची छायांकित प्रत, आधार कार्ड, बँक पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले असल्यास प्रमाणपत्र आदींसह संबंधितांनी जिल्हा सैनिक कार्यालयाशी 20 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावा. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कार्यालयाने केले आहे.
वन्यप्रेमींना आवाहन
सोलापूर : वनसंरक्षण, संवर्धन, पर्यावरण तसेच वन्यजीव क्षेत्रात काम करणार्‍या राज्यातील सर्व स्वयंसेवी संस्थांची माहिती एकत्रित करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने जिल्?ातील उपलब्ध असलेल्या स्वयंसेवी संस्था प्रमुखांनी सोलापूर वनविभागाच्या कार्यालयातील सहपत्रामध्ये सदरील माहिती 10 सप्टेंबरपर्यंत भरून उपवनसंरक्षक, वनभवन विजापूर रोड, वनविभाग कार्यालय, सोलापूर या पत्त्यावर पाठवावी अथवा समक्ष द्यावी, असे आवाहन उपवनसंरक्षक एस. बी. बडवे यांनी एका पत्रकान्वये केले आहे.
स्वच्छता अभियानाचे मूळ नाव कायम
सोलापूर : राज्यात राबविण्यात येत असलेले संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाच्या नावात कोणत्याही स्वरूपाचा बदल झालेला नसून राज्यातील ग्रामीण भागात हे अभियान संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता तर नागरी भागात संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान या नावाने कार्यरत असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे काढण्यात आलेल्या परिपत्रकान्वये स्पष्ट करण्यात आले आहे.
राष्ट्रीय कृषी विमा योजनेस मुदतवाढ
सोलापूर : खरीप हंगाम 2015 या कालावधीत राष्ट्रीय कृषी विमा योजना राज्यातील सर्व जिल्?ात राबविण्यात येत आहे. या योजनेत शेतकर्‍यांनी मोठय़ा प्रमाणावर सहभागी व्हावे, यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या शेतकर्‍यांच्या 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत पेरण्या झाल्या आहेत. अथवा सुरू आहेत तसेच ज्या शेतकर्‍यांचे नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे असे शेतकरी यामध्ये सामील होऊ शकतात. सदरील मुदतवाढ ही उंबरठा उत्पन्न पातळीपर्यंतच देय असणार आहे. संबंधितांनी अधिक माहितीसाठी तालुका, उपविभागीय तसेच जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी आदी कार्यालयांशी तसेच भारतीय कृषी विमा कंपनी, मुंबई, विभागीय कृषी सहसंचालक, या कार्यालयाशी अथवा नजीकच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी बी. जी. बिराजदार यांनी केले आहे.