शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

हे युद्ध तयारीचे संकेत का ?

By admin | Updated: September 29, 2016 14:23 IST

भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून दहशतवादी तळांवर कारवाई केल्यानंतर उरी हल्ल्याचा बदला पूर्ण झाल्याची अनेकांची भावना आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २९ - भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून दहशतवादी तळांवर कारवाई केल्यानंतर उरी हल्ल्याचा बदला पूर्ण झाल्याची अनेकांची भावना आहे. मात्र त्याचवेळी केंद्र सरकारने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना भारतीय लष्कराकडून करण्यात आलेल्या या कारवाईची माहिती दिली. 
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही तातडीने दिल्लीला बोलवून घेण्यात आले आहे. ते माजी संरक्षणमंत्री होते. दुपारी चारवाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. तिन्ही सैन्य दलांनाही सर्तक रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मर्यादीत स्वरुपाच्या लष्करी कारवाईनंतर इतक्या वेगाने घडामोडी का सुरु आहेत ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 
 
भारतीय लष्कराचे डीजीएमओनी पत्रकारपरिषद घेऊन या सर्जिकल स्ट्राईक्सची माहिती देत असतानाच शेअर बाजार कोसळण्यास सुरुवात झाली.  जवळपास ४०० अंकांनी शेअर बाजार कोसळला. या सर्व घडामोडींमुळे भारताकडून संभाव्य युध्दाची तयारी तर सुरु नाही ना ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.