शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

सिद्धू यांचा खासदारकीचा राजीनामा!

By admin | Updated: July 19, 2016 04:55 IST

‘‘चूक की बरोबर या युद्धामध्ये तुम्हाला काहीसे स्वार्थी राहण्यापेक्षा तटस्थ राहणे परवडणारे नसते. पंजाब राज्याचे हित हे सर्वोच्च आहे’’

हरीश गुप्ता,

नवी दिल्ली- ‘‘चूक की बरोबर या युद्धामध्ये तुम्हाला काहीसे स्वार्थी राहण्यापेक्षा तटस्थ राहणे परवडणारे नसते. पंजाब राज्याचे हित हे सर्वोच्च आहे’’, अशी भूमिका घेत भाजपचे राज्यसभा सदस्य नवज्योतसिंग सिद्धू यांनी सोमवारी सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पक्षाला मोठा धक्का दिला. सिद्धू पक्ष लगेचच सोडणार का हे स्पष्ट नाही तसेच त्यांनी भविष्यात काय करायचे हेही सांगितलेले नाही. मात्र त्यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनातून त्यांच्या प्रवासाबद्दल काही संकेत मिळतात.सिद्धू यांना पंजाबच्या पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सक्रिय भूमिका बजवायची आहे आणि भाजप त्यांना राज्यसभेत आणि टीव्ही शोजमध्ये बंदिस्त करू इच्छिचे हे स्पष्ट आहे. परंतु त्यांनी अचानकच राजीनामा देऊन पक्षाला धक्का दिला. पक्षाने त्यांचा राजीनामा रोखण्याचे केलेले सगळे अपयशी ठरले.तथापि, नवज्योत सिंग सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर यांनी याआधीच भाजप सोडला असून बहुधा त्या आम आदमी पार्टीत (आप) प्रवेश करतील. नवज्योत कौर यांनी भाजपचा राजीनामा फेसबुक पेजवर टाकला होता. भाजपने अकालींबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यावर नवज्योत कौर यांनी त्याला स्पष्टपणे विरोध केला होता. परंतु भाजपच्या नेत्यांनी अकालींबरोबर ‘तरून जाऊ किंवा बुडून’ असे ठरविले होते. राज्यसभेत सिद्धू यांना राष्ट्रपतींकडून होणाऱ्या नियुक्तीद्वारे पाठविण्याचा निर्णय झाल्यावर त्यांनी संताप व्यक्त केला होता. भाजपने त्यांना राजकीय भूमिका देण्याचे आश्वासन देऊनही ते पाळले नाही. सिद्धू हे आम आदमी पार्टीसाठी निवडणुकीत प्रचार करताना दिसू शकतात व नंतर ‘आप’तर्फे त्यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून समोर आणले जाऊ शकते. ‘आप’चे पंजाबमधून लोकप्रिय भगवान मान यांच्यासह चार खासदार असले तरी मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्याकडे उमेदवार नाही. ‘आप’साठी सिद्धू हे योग्य ठरतात.‘पंजाबचे लोक बदल बघू इच्छितात,’ असे सिद्धू राजीनामा देण्यापूर्वी वार्ताहरांशी बोलताना म्हणाले होते परंतु कोणालाही ते सदस्यत्व सोडतील अशी शंकाही आली नाही. नंतर त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात आपले पद हे ‘ओझे’ असल्याचे सूचित करून पक्षाबद्दलची आपली नाराजीच व्यक्त केली. ‘पंजाबकडे जाणारी प्रत्येक खिडकी बंद केल्यामुळे उद्देशच पराभूत झाला. आता केवळ ओझे राहिले असून ते आणखी पुढे वाहून न्यायचे नाही, असे मी ठरविले आहे’, असे नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले. सिद्धू हे माजी क्रिकेटपटू व समालोचक म्हणून प्रसिद्ध आहेत.सिद्धू यांनी उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांच्या कार्यालयात जाऊन राजीनामा सादर केला. राजीनामा तत्काळ स्विकारला जावा अशी त्यांची इच्छा होती परंतु अन्सारी यांनी पुन्हा एकदा विचार करा, असे त्यांना म्हटले. परंतु सिद्धू यांची तशी इच्छा नव्हती. पक्षाचे नेते मुक्तार अब्बास नक्वी यांनी या घडामोडी रोखण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला उशीर झाला होता.२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत अमृतसर मतदार संघातून अरूण जेटली यांच्यासाठी सिद्धू यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती त्यामुळेही ते नाराजच होते. खरे तर सिद्धू या मतदार संघाचे दहा वर्षांपासून प्रतिनिधित्व करीत होते. जेटली यांना मात्र पराभवाला तोंड द्यावे लागले होते.सिद्धू यांच्या राज्यसभा सदस्यत्वाच्या राजीनाम्याचे आम्ही स्वागत करतो. तुम्हाला आणखी काही विचारावेसे वाटेल म्हणून सांगतो की तो निर्णय अचानक झालेला आहे, असे आपचे नेते संजय सिंग वार्ताहरांशी बोलताना म्हणाले.>भाजपच्या श्रेष्ठींनी मंत्रिमंडळात शीख समाजातून प्रतिनिधी म्हणून दार्जिलिंगचे खासदार एस. एस. अहलुवालिया यांना संधी दिल्याबद्दलही सिद्धू नाराज होते. साहजिकच त्यांनी काही दिवस जाऊ दिले व संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होताच पहिल्या दिवशी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.