शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आरक्षण बंद करूनच दाखवा - लालूप्रसाद यादव

By admin | Updated: September 22, 2015 04:05 IST

भागवत यांच्या आरक्षणावरील विधानावर राजद प्रमुख लालूप्रसाद यादव

नवी दिल्ली : भागवत यांच्या आरक्षणावरील विधानावर राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. रा.स्व. संघ आणि भाजपाने आरक्षण बंद करण्यासाठी कितीही सुनियोजित प्रयत्न केला तरी देशातील ८० टक्के दलित, आदिवासी आणि ओबीसी त्याला चोख प्रत्युत्तर देतील, असे लालूप्रसाद यादव यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे.‘ते आरक्षण बंद करण्याची भाषा करीत आहेत. आम्ही लोकसंख्येच्या आधारावर आरक्षणाची टक्केवारी वाढवू. हिंमत असेल तर त्यांनी आरक्षण बंद करूनच दाखवावे. कुणाची किती ताकद आहे हे दिसेल,’ असे आव्हानही त्यांनी दिले. आपल्या गुरूच्या (भागवत) सांगण्यावरून आरक्षण बंद करणार काय, हे तथाकथित चहावाला आणि नुकतेच मागासवर्गीय बनलेले नरेंद्र मोदी यांनी सांगावे, असेही लालूप्रसाद म्हणाले. ही धोक्याची घंटा-संजदबिहारमधील सत्तारूढ संयुक्त जनता दलाने भागवत यांच्या आरक्षणाबाबतच्या विधानाचा निषेध केला आहे. भागवत यांचे हे विधान म्हणजे आरक्षणाच्या श्रेणीत मोडणाऱ्या समाजासाठी धोक्याची घंटा आहे, असे मत संजदचे ज्येष्ठ नेते खासदार अली अनवर अंसारी यांनी एका निवेदनात म्हटले आहे. सर्वमान्य मुद्दा-रालोसपाराज्यघटनेमध्ये आरक्षणाचा अधिकार दिला असल्याने हा आता भारतातील सर्वमान्य मुद्दा आहे. त्यामुळे याबाबत आम्ही काहीही बोलणार नाही, असे रालोआचा घटक पक्ष असलेल्या रालोसपाचे सरचिटणीस शिवराजसिंग यांनी म्हटले आहे.आरक्षणाच्या प्रासंगिकतेवर काँग्रेसच्या तिवारींचे प्रश्नचिन्हआरक्षणाची गरजच असेल तर ते जातीवर आधारित न राहता आर्थिक परिस्थितीवर आधारित असायला पाहिजे, असे मत व्यक्त करून काँग्रेसचे नेते आणि माजी सूचना व प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी आरक्षण धोरणाच्या प्रासंगिकतेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. आरक्षणाबाबतचे आपले हे मत जुनेच आहे आणि १५ दिवसांपूर्वीच आपण एक लेख लिहून हे मत व्यक्त केले आहे. २१ व्या शतकात आरक्षणाची प्रासंगिकता काय आहे? आरक्षण द्यायचेच असेल तर ते जातीच्या आधारावर न देता आर्थिक परिस्थितीच्या आधारावर दिले पाहिजे.