शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

विद्यार्थ्यांवर अन्याय होता कामा नये...

By admin | Updated: March 15, 2016 00:34 IST

लोकमत मुलाखत

लोकमत मुलाखत
जळगाव- अलीकडे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. असे व्हायला नको... हैद्राबाद विद्यापीठात रोहित वेमुलाचे प्रकरण घडले. त्यानंतरचे जेएनयुमधील कन्हैया कुमारचे प्रकरण समोर आले. सर्वत्र विद्रोह, देशद्रोह..., अशी चर्चा सुरू झाली... पण विद्रोह, देेशद्रोह आणि आक्रोश असे वेगवेगळे मुद्दे आहेत. जातीपाती, सामाजिक नाकेबंदीमुळे आक्रोश होत आहे. हे सर्वांनी समजून घेतले पाहीजे. विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, असे मत कवी, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
मंजुळे हे सोमवारी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासंबंधी आले असता त्यांच्याशी संवाद साधला.
प्रश्न- रोहित वेमुला, कन्हैया कुमारच्या प्रकरणाकडे आपण कसे पाहता?
मंजुळेे- रोहित वेमुला व कन्हैया कुमार यांच्याबाबत जे घडले ते चुकीचे आहे. असा अन्याय इतरत्र कुणावर व्हायला नको. विद्यार्थी हा देशाचा महत्त्वाचा घटक असतो. त्याचे स्वातंत्र्य हिरावून घेणे योग्य वाटत नाही.

प्रश्न- आपल्या फॅण्ड्री सिनेमामागील स्फूर्ती कुणाची आहे?
मंजुळे- मी जातीने वडार आहे. पण आपल्याकडे जातीपातीच्या भिंती आहेत. अशी नाकेबंदी आहे की त्यात अडकवून ठेवले जाते. तुच्छ वागणूक व इतर असे वाईट प्रकार होतात. शाळेत बास्केटबॉल खेळताना माझा एका मुलीस हात लागला. तिने मला फॅण्ड्री म्हटले... तिच्यातला तो मनुवाद बोलत होता. मला महिनाभर तिच्या बोलण्याचा मानसिक त्रास झाला. नंतर मी स्वत: ला सावरले. श्रमप्रतिष्ठेला आपल्याकडे महत्त्व नाही. जे स्वच्छता व इतर श्रमाची कामे करतात, त्यांना महत्त्व दिले जात नाही... हा असला अनुभव मी फॅण्ड्री साकारण्यामागे कारणीभूत ठरला आहे.

प्रश्न- आगामी प्रकल्पांबाबत काय?
मंजुळे- एप्रिल महिन्यात आमचा सैराट चित्रपट येत आहे. त्यात चार गाणी आहेत. मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला आहे. फॅण्ड्री युवकांना फारसा आवडला नव्हता. कारण त्यात गाणी नव्हती. आणखी चित्रपट क्षेत्रात नवीन नवीन विषय पुढे येत आहेत. त्यात व्यस्त आहे.

प्रश्न- खान्देशात चित्रपट साकारण्याचा मनोदय आहे काय?
मंजुळे- खान्देश हा बहिणाबाई व इतर थोर व्यक्तींचा भाग आहे. संधी मिळाली तर निश्चितच प्रकल्ह हाती घेईल, पण सध्या तरी फारसा वेळ नाही. मी ग्रामीण भागातला असलो तरी शहरात आल्यानंतर मंुबई, पुण्याबाहेर जाणे होत नाही.