शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

'26/11च्या हल्ल्यानंतर अशी भूमिका घ्यायला हवी होती'

By admin | Updated: September 29, 2016 17:18 IST

भारताने पाकिस्तानने केलेल्या उरी हल्ल्यानंतर आता घेतलेली भूमिका ही २६/११ च्या हल्ल्यानंतरच घ्यायला हवी होती.

-सुधीर जटार

भारताने पाकिस्तानने केलेल्या उरी हल्ल्यानंतर आता घेतलेली भूमिका ही २६/११ च्या हल्ल्यानंतरच घ्यायला हवी होती. त्यामुळे आता यासाठी उशीर झाला असे म्हणत असतानाच हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. भारतीय सैन्य अशा प्रकारच्या कारवाईसाठी कायम तयार असते. परंतु आतापर्यंत राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसत आला आहे. आतापर्यंत शत्रू सैन्याने आपल्या एका गालात मारली तर आपण दुसरा गाल पुढे करत होतो, मात्र ही भूमिका अतिशय चुकीची आणि देशासाठी घातक ठरली आहे. आता भारताने घेतलेल्या भूमिकेमुळे भारताचा मान देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावरही निश्चितच वाढणार आहे. येत्या काळातही भारताने आता स्वीकारलेले धोरण कायम ठेवल्यास ते निश्चितच फायदेशीर ठरू शकेल. आताही भारताने घेतलेल्या भूमिकेत आंतरराष्ट्रीय सीमा पार केलेल्या नसून केवळ नियंत्रण रेषा पार केली आहे. यातही आपण आता पाकिस्तानवर हल्ला केला नसून दहशतवाद्यांवर हल्ला केला आहे हे समजून घ्यायला हवे. हे दहशतवादी तालिबान आणि अल कायद्याचे असल्याचे याआधीही अनेकदा स्पष्ट झाले आहे. मात्र आताच्या कारवाईत दोन पाकिस्तानी अतिरेकी कसे सापाडले हा प्रश्न आहे. त्यामुळे हे पाकिस्तानी अतिरेकी या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत नव्हते ना हेही पहायला हवे. त्यामुळे दहशतवादी भारताला वारंवार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. तरीही भारताने आपली भूमिका मागे न घेता त्यावर ठाम रहायला हवे. येत्या काळात कारगिलप्रमाणे युद्ध होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र भारतीय सैन्याने आता अतिशय दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. काश्मिरमध्ये ज्या भागात आता कारवाया चालू आहेत तो भाग अतिशय जोखमीचा असून अतिशय काळजीपूर्वक पाऊले टाकावी लागणार आहेत. लेखक संरक्षण विषयातील तज्ज्ञ असून त्यांनी १९७७ ते ८१ या काळात काश्मिर खोऱ्यातील सैन्यात त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आाहे. तसेच १९७१ मध्ये जम्मू- काश्मीर येथील पूंच येथे झालेल्या युद्धातही त्यांचा सहभाग होता. संरक्षण विषयातील अनेक शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे कामही ते मागील अनेक वर्षांपासून करत आहेत.- लेखक संरक्षण विषयातील तज्ज्ञ आणि मेजर जनरल(निवृत्त) आहेत