शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
4
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
5
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
6
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
7
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
8
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
9
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
10
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
11
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
12
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
13
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
14
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
15
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
16
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
17
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
18
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
19
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
20
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान

'26/11च्या हल्ल्यानंतर अशी भूमिका घ्यायला हवी होती'

By admin | Updated: September 29, 2016 17:18 IST

भारताने पाकिस्तानने केलेल्या उरी हल्ल्यानंतर आता घेतलेली भूमिका ही २६/११ च्या हल्ल्यानंतरच घ्यायला हवी होती.

-सुधीर जटार

भारताने पाकिस्तानने केलेल्या उरी हल्ल्यानंतर आता घेतलेली भूमिका ही २६/११ च्या हल्ल्यानंतरच घ्यायला हवी होती. त्यामुळे आता यासाठी उशीर झाला असे म्हणत असतानाच हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. भारतीय सैन्य अशा प्रकारच्या कारवाईसाठी कायम तयार असते. परंतु आतापर्यंत राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसत आला आहे. आतापर्यंत शत्रू सैन्याने आपल्या एका गालात मारली तर आपण दुसरा गाल पुढे करत होतो, मात्र ही भूमिका अतिशय चुकीची आणि देशासाठी घातक ठरली आहे. आता भारताने घेतलेल्या भूमिकेमुळे भारताचा मान देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावरही निश्चितच वाढणार आहे. येत्या काळातही भारताने आता स्वीकारलेले धोरण कायम ठेवल्यास ते निश्चितच फायदेशीर ठरू शकेल. आताही भारताने घेतलेल्या भूमिकेत आंतरराष्ट्रीय सीमा पार केलेल्या नसून केवळ नियंत्रण रेषा पार केली आहे. यातही आपण आता पाकिस्तानवर हल्ला केला नसून दहशतवाद्यांवर हल्ला केला आहे हे समजून घ्यायला हवे. हे दहशतवादी तालिबान आणि अल कायद्याचे असल्याचे याआधीही अनेकदा स्पष्ट झाले आहे. मात्र आताच्या कारवाईत दोन पाकिस्तानी अतिरेकी कसे सापाडले हा प्रश्न आहे. त्यामुळे हे पाकिस्तानी अतिरेकी या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत नव्हते ना हेही पहायला हवे. त्यामुळे दहशतवादी भारताला वारंवार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. तरीही भारताने आपली भूमिका मागे न घेता त्यावर ठाम रहायला हवे. येत्या काळात कारगिलप्रमाणे युद्ध होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र भारतीय सैन्याने आता अतिशय दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. काश्मिरमध्ये ज्या भागात आता कारवाया चालू आहेत तो भाग अतिशय जोखमीचा असून अतिशय काळजीपूर्वक पाऊले टाकावी लागणार आहेत. लेखक संरक्षण विषयातील तज्ज्ञ असून त्यांनी १९७७ ते ८१ या काळात काश्मिर खोऱ्यातील सैन्यात त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आाहे. तसेच १९७१ मध्ये जम्मू- काश्मीर येथील पूंच येथे झालेल्या युद्धातही त्यांचा सहभाग होता. संरक्षण विषयातील अनेक शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे कामही ते मागील अनेक वर्षांपासून करत आहेत.- लेखक संरक्षण विषयातील तज्ज्ञ आणि मेजर जनरल(निवृत्त) आहेत