शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

धक्कादायक ! केंद्र सरकारच्या विविध विभागात तब्बल 8 लाख 72 हजार पदे रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 20:00 IST

केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, मार्च 2020 पर्यंत केंद्र सरकारच्या विविध विभागातील एकूण रिक्त पदांची संख्या 8.72 लाख एवढी आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, मार्च 2020 पर्यंत केंद्र सरकारच्या विविध विभागातील एकूण रिक्त पदांची संख्या 8.72 लाख एवढी आहे.

नवी दिल्ली - देशातील बेरोजगारीच्या आकड्यांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं सांगण्यात येत. विशेष म्हणजे कोरोनामुळे लाखो लोकांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. त्यामुळे, नोकरीच्या 100 जागांसाठी हजारोंच्या संख्येने अर्ज येतात. त्यात, सरकारी नोकरी असेल तर ही संख्या आणखी वाढते. एमपीएससी परीक्षेच्या 300 ते 400 जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या 3 ते 4 लाखांच्या घरात असते. त्यामुळे, रोजगार ही मोठी समस्या बनली आहे. मात्र, संसदेत पेन्शनमंत्री जितेंद्रसिंह यांनी एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, मार्च 2020 पर्यंत केंद्र सरकारच्या विविध विभागातील एकूण रिक्त पदांची संख्या 8.72 लाख एवढी आहे. केंद्र सरकारच्या सर्वच विभागातील मंजूर पदांची संख्या 40 लाख 4 हजार 941 एवढी आहे. त्यामध्ये, 31 लाख 32 हजार 698 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे, रिक्त पदांची संख्या 8 लाख 72 हजार 243, एवढी असल्याचे सिंह यांनी राज्यसभेत सांगितले. विशेष म्हणजे ही आकडेवारी मार्च 2020 पर्यंतची असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

मंत्री सिंह यांनी 3 प्रमुख भरती एजन्सीद्वारे गेल्या 5 वर्षात करण्यात आलेल्या भरतींची आकडेवारी देण्यात आली. त्यानुसार, 2016-17 ते 2020-21 या कालावधीत युपीएससी 25,267 उमेदवारांची भरती केली आहे, तर स्टाफ सिलेक्शन कमिशनने 2 लाख 14, 601 उमेदवारांची भरती केली आणि रेल्वे बोर्डाने 2 लाख 4,945 उमेदवार भरती केले आहेत. 

टॅग्स :jobनोकरीCentral Governmentकेंद्र सरकार